Friday, October 31, 2025

देगलूर नगर परिषदेच्या निवडणुकीत अनुभवी युवकांना संधी मिळाली पाहिजे - सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद अमीर

 

                                    

 नांदेड /जावेद अहमद :- आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये देगलूर नगर परिषदेच्या निवडणुकीत अनुभवी युवकांना सर्वच राजकीय पक्षांनी सामाजिक कार्याच्या अनुषंगाने जे युवक अनेक वर्षापासून सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत ते लोकांच्या अडीअडीचणी सोडवितात सदैव सामाजिक कार्यात तत्पर असतात.


 अनुभवी युवकांना सर्वच राजकीय पक्षांनी संधी द्यावी असे प्रतिपादन देगलूर येथील सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद अमीर यांनी केले आहे. हल्ली उठ सूट कोणीही युवक आपल्याला पक्षाकडून तिकीट भेटावं यासाठी प्रयत्न करीत आहेत. अनुभवी युवांना जर राजकीय पक्षांनी संधी दिली तर शहराचा विकास होईल. सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद अमीर यांनी सांगितले.

खोपोली नगर परिषदेत जनसेवा की जनछळ ?

 


* जन्म-मृत्यू दाखल्यांत मनमानी, नागरिकांवर अरेरावीचे सावट

* लिपिकांच्या वागणुकीवर प्रश्नचिन्ह ; तक्रारी असूनही प्रशासन मौन

खोपोली / खलील सुर्वे :- खोपोली नगर परिषदेमधील नागरी सुविधा केंद्राचा उद्देश नागरिकांना सहज, सुलभ आणि सन्मानपूर्वक सेवा देण्याचा आहे, पण प्रत्यक्षात या केंद्रात नागरिकांशी अरेरावी, दुर्लक्ष, विलंब व मनमानी अशी चित्रे दिसत असून, “लोकसेवक की लोकत्रासक ? असा प्रश्न नागरिक उपस्थित करू लागले आहेत.

खोपोली नगर परिषद नागरी सुविधा केंद्रातील जन्म-मृत्यू दाखला विभागातील कर्मचारी कैलास देशमुख यांच्या मनमानीच्या तक्रारी अनेक नागरिकांनी केल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी पत्रकार संघटनेच्या वतीने लेखी तक्रार देखील करण्यात आली होती. 


जन्म-मृत्यू दाखले नोंदीचे योग्यरीत्या परीक्षण न करता “नोंद नाही” असे उत्तर देणे, नावातील अक्षरे वगळणे /दुरुस्तीच्या नावाखाली मनमानी बदल करणे, वरिष्ठ आदेश न पाळणे तसेच नागरिकांशी उद्धट वर्तन करणे असे आरोप त्यांच्याविरुद्ध आहेत.


* जेवणाची वेळ 1 ते 4 ? :- केंद्राच्या अधिकृत वेळेतही सेवा न देता, दुपारी 1 ते 4 दरम्यान जेवणाचा ब्रेक घेतल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. काय हे सरकारी कार्यालय आहे की प्रायव्हेट कँटीन ? असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.


* जन्म-मृत्यू दाखल्यात बेकायदेशीर दुरुस्ती ? :- परिपत्रकानुसार जन्म-मृत्यू दाखल्यात काना-मात्रा सोडून नाव बदल करता येत नाही, पूर्ण नाव बदलणे नियमबाह्य आहे. मात्र, संबंधित कर्मचारी स्वतःहून आणि मनाने नावे बदलत आहेत, असा गंभीर आरोप आहे.


* नागरिकांचा अनुभव :- दाखला काढायला गेलो तर, पहिल्यांदा एकदम ‘नोंद नाही’ असे सांगितले. नंतर ओळखीच्या व्यक्तीसोबत गेल्यावर काम दोन मिनिटांत!वृद्ध, महिला, सामान्य नागरिकांना त्रास देऊन फाईल फिरवली जाते. सरकारी कार्यालय की मनमानीचे दुकान ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.


* प्रशासन कुठे ? :- तक्रारी असूनही परिस्थितीत सुधारणा दिसत नसल्याने नगर परिषदेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. नागरिकांची मागणी आहे की, कर्मचाऱ्यांची चौकशी करावी, डिजिटल ट्रॅकिंग सिस्टीम लागू करावी, तक्रार निवारण यंत्रणा उभी करावी,  गैरवर्तन करणाऱ्या कर्मचाऱ्यांची बदली करावी, नागरिकांसाठी तक्रार निवारण हेल्पलाइन सुरू करावी.


खोपोलीतील नागरी सुविधा केंद्र नागरिकांसाठी “सुविधा केंद्र” राहणार, की “अडचण केंद्र” बनणार ? नागरिकांची एकच मागणी “काम हक्काने, वागणूक सन्मानाने हवी!” आता अपेक्षा नगर परिषद प्रशासनाची तपास करा… आणि गरज असेल तर कारवाईही करा!

दिलीप भोईरांसह 21 जणांना सात वर्षे सक्तमजुरी जिल्हा न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय


रायगड | जिल्हा प्रतिनिधी :- चोंढी नाक्यावर घातक शस्त्राने मारहाण केल्याप्रकरणी शिंदे गटातील दिलीप भोईर उर्फ छोटमशेठ यांच्यासह 21 जणांना जिल्हा न्यायालयाने दोषी ठरवत सात वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्येकी तीन हजार रुपये दंड अशी शिक्षा गुरुवारी (दि.30) सुनावली. एकूण 25 आरोपींपैकी चार आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. जिल्हा प्रमुख न्यायाधीश राजेंद्र सावंत यांनी ही शिक्षा सुनावली. या प्रकरणात विशेष सरकारी अभियोक्ता म्हणून ॲड. प्रसाद पाटील यांनी काम पाहिले. या निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते. 

मिळालेल्या माहितीनुसार, बहिरोळे येथील रुपाली थळे या चोंढी येथील व्हिटेवा कॉम्प्युटर क्लासमध्ये 11 सप्टेंबर 2012 रोजी सायंकाळी 60 मुलांचे वर्ग घेत होत्या. त्यांच्याकडे काम करणारा भूषण साबळे याला चहासाठी काही वस्तू आणण्यासाठी पाठविले होते. भूषणसोबत शाहबाज खानही गेला होता. ते दोघे बराच वेळ परत आले नाही. त्यामुळे त्यांना बाहेर पाहण्यासाठी थळे या गेल्या होत्या. त्यावेळी चोंढी नाक्यावर भूषण साबळे व शाहबाज खान यांना अतिष सुर्वे, सज्जाद मुल्ला, विक्रम साळुंखे व विक्रांत कुरतडकर ही मंडळी शिवीगाळी करुन धक्काबुक्की व मारहाण करीत होती. याबाबत मध्यस्थी करुन भूषण, शाहबाज व त्या चौघांना क्लासच्या मागे असलेल्या हॉलमध्ये नेले. त्यांच्यामधील वाद मिटवून पुन्हा क्लासमध्ये आले.

दिलीप भोईर उर्फ छोटम व त्यांचे सुमारे 25 ते 30 साथीदार हे काही हत्यारांसहीत क्लासमध्ये घुसले. ते भूषण व शहाबाजला शिवीगाळी व धक्काबुक्की करु लागले. त्यांना समजाविण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांनी थळे यांनादेखील शिवीगाळी करुन धक्काबुक्की केली. तरीदेखील त्यांना पुन्हा समजावून क्लासच्या बाहेर जाण्यास सांगितले. दिलीप भोईर, राहुल दिलीप भोईर, विकम साळुंके, विक्रांत कुडतरकर उर्फ विकी, विशाल साळुंके, सज्जाद मुल्ला यांनी क्लासचे बॅनर फाडून तोडफोड केली. दिलीप भोईर यांनी त्यांच्या हातातील तलवारीने रुपाली थळे यांना मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी हाताने अडविण्याचा प्रयत्न केला. परंतु, थळे यांच्या उजव्या हाताच्या करंगळीस दुखापत झाल्याने रक्त आले. भूषण व शहाबाज यांनी थळे यांना त्यांच्या धक्काबुक्कीतून सोडविण्याचा प्रयत्न केला. दिलीप भोईर व त्यांच्या साथीदारांनी भूषण, शहाबाज व थळे यांना बाहेर खेचून रस्त्यावर आणून मारहाण केली. त्यावेळी रुपाली थळे यांचे पती विजय थळे, त्यांचे मित्र अविनाश म्हात्रे व शिवाजी ईटकर त्याठिकाणी आले. त्यांनी या मारहाणीतून रुपाली थळेंसह अन्य मंडळींना सोडविण्याचा प्रयत्न केला. दिलीप भोईर यांनी विजय थळे यांना खाली पाडून त्यांच्या डोक्यावर तलवारीने वार करून त्यांना गंभीर जखमी केले. राहुल भोईर यांनी लोखंडी शिगेने त्यांच्या पाठीवर एक झोड घातली. विक्रम साळुंके यांनी रुपाली थळे यांच्या उजव्या हातावर शिगेचा फटका मारला. विकी कुडतरकर याने स्टम्पने पाठीत झोड घातली. विशाल साळुंके याने उजव्या मांडीवर लोखंडी शिगेने झोड घातली. मकरंद भोईर याने एका लाकडी दांडक्याने कमरेवर झोड घातली. दरम्यान, सोडविण्यास आलेल्या रुपाली थळे यांच्या नणंद मनिषा मनोहर घरत यांनादेखील धक्काबुक्की, शिवीगाळी व मारहाण केली. त्यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण कोणीतरी खेचून नेले आहे.


याप्रकरणी मांडवा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी अलिबाग येथील न्यायालयात त्यांच्याविरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. चोंढी नाक्यावर घातक शस्त्राने मारहाण केल्या प्रकरणाचा निकाल अखेर तेरा वर्षांनंतर लागला. न्यायालयाने दिलीप भोईर यांच्यासह 21 जणांना गुरुवारी सायंकाळी शिक्षा सुनावली आहे. त्यामध्ये शिंदे गटातील दिलीप उर्फ छोटम विठ्ठल भोईर, विक्रम वामन साळुंखे, विक्रांत विश्वनाथ कुडतरकर, मकरंद रवींद्र भोईर, विकेश वसंत ठक्कर, भरत अभिमान्य खळगे, गणेश रमेश म्हात्रे, संतोष वामन साळुंखे, सज्जाद शगीर मुल्ला, गणेश बळीराम भोईर, विवेक विश्वनाथ कुडतरकर, शिशिर शंकर म्हात्रे, हेमंत अनंत केळकर, जयवंत शामराव साळुंखे, विरेश रमेश खेडेकर, प्रभाकर रामचंद्र गवाणकर, प्रसाद दत्ता शिवदे, अशोक शांताराम थळे, मनोज जगन्नाथ थळे, राजेंद्र काशिनाथ ठाकूर, विजय राजाराम ठाकूर यांचा समावेश आहे.

Thursday, October 30, 2025

खोपोलीत नागरिकांच्या एकतेचा विजय!

 सभागृहापासून रस्त्यावरच्या लढ्यापर्यंत


* डंपिंग ग्राउंड हटवून पर्यटन स्थळाची घोषणा

* सुभाषनगरवासीयांनी लिहिला नवा इतिहास


खोपोली / मानसी कांबळे :- “एकता हीच शक्ती” हा केवळ बोधवाक्य नसून सुभाषनगर परिसरातील ग्रामस्थांनी तो प्रत्यक्षात सिद्ध केला आहे. खोपोलीतील डंपिंग ग्राउंडच्या विरोधात नागरिकांनी सुरू केलेला संघर्ष अखेर यशस्वी ठरला असून, संबंधित जागेवर कचरा डेपो रद्द करून पर्यटन स्थळाचा आराखडा मंजूर झाल्याची माहिती नगरसेवक मंगेश नारायण दळवी यांनी दिली.

सुभाषनगर परिसरात कचरा डेपोसाठी प्रस्ताव दाखल झाला होता. दुर्गंधी, प्रदूषण, आरोग्याच्या धोक्याचा प्रश्न आणि नागरिकांच्या नाराजीला खतपाणी घालणारा हा निर्णय रद्द करण्यासाठी नागरिक गेली अनेक महिने संघर्ष करीत होते. अखेर सर्व ग्रामस्थ एकत्र आले आणि आवाज बुलंद केला व निर्णय बदलला.

* जनतेच्या एकतेचा पराक्रम :- “आम्ही हक्क मागितला, सरकारने ऐकले” डंपिंग ग्राउंडविरोधातील चळवळीचे नेतृत्व स्थानिक नागरिकांसोबत नगरसेवक मंगेश दळवी यांनी केले. त्यांचा ठाम दावा आहे की, आपण एकत्र आल्यानंतर काय होऊ शकते याचे हे उदाहरण आहे. निवेदने, बैठका, स्थानिक प्रशासनाशी चर्चा, सोशल मीडिया मोहिम आणि लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा या सर्वांचा परिणाम अखेर मिळाला आहे.


* डंपिंग ग्राउंड ऐवजी ‘पर्यटन स्थळ’ :- खोपोली परिसर पर्यटन नकाशावर वेगाने पुढे सरकत आहे. या ठिकाणी आता पर्यटन विकास आराखड्याचा समावेश करण्यात येणार असल्याने परिसराचे रूपांतर घडणार आहे. हे केवळ एका निर्णयाचे उलटणे नाही तर खोपोलीकरांच्या भविष्याचा मार्ग बदलणारी घटना आहे.

100 कोटीचा भुयारी गटार प्रकल्प, पण शहराच्या माथी उचलली चिखल-खड्ड्यांची शिक्षा!

 


* खोपोलीत विकासाचा दावा, वास्तवात रस्ते व्हेंटिलेटरवर 

 दोन वर्षे उलटली, काम अजूनही अर्धवट ; नागरिकांचा संताप उसळला

खोपोली / खलील सुर्वे :- खोपोली शहरातील बहुचर्चित 100 कोटींच्या भुयारी गटार प्रकल्पाने शहरवासीयांच्या संयमाची परीक्षा घेतली आहे. ठेकेदाराने रस्ते खोदून पाईप टाकले, मात्र त्यानंतर त्या जागेची दुरुस्ती न केल्याने शहरातील रस्ते खड्ड्यांच्या छत्रछायेखाली गेले आहेत. रस्त्यावर मोठमोठे दगड, मातीचे ढीग, चिखल आणि पावसाच्या पाण्यात साचणारे प्रदूषण यामुळे खोपोलीकर त्रस्त झाले आहेत. योजनेला सुरुवात होऊन साधारण दोन वर्षांचा काळ उलटला, तरीही काम वरकरणी ‘आय.सी यू.मध्ये’ आणि रस्त्यांची अवस्था ‘व्हेंटिलेटर’वर असल्याचे चित्र दिसत आहे.

* रस्ते की रणांगण ? :- शहरातील अनेक भागांमध्ये, चिंचवली शेकीन (DP रोड) सह शहरातील अनेक रस्त्याच्या अगदी मध्यभागी चर खोदण्यात आले. पूर्वी चांगल्या स्थितीत असलेले रस्ते आता खड्डे, माती आणि चिखलाने विद्रूप झाले आहेत. पाईपच्या जागी बसविलेल्या मातीचे बांधकाम खचत असल्याने चेंबर आडवे टांगलेल्या स्थितीत ‘डोके वर काढून’ दिसत आहेत. वाहनधारकांचे नाकीनऊ आले असून रस्ते टाळून वाहन चालविणे महाप्रसंग बनला आहे. खड्ड्यांमधून उडणाऱ्या चिखलाने कपडे खराब होतात, डास-मच्छरांचा प्रादुर्भाव वाढला आहे, तर वृद्ध आणि महिलांना चालणे कठीण झाले आहे.

* नागरिक त्रस्त, सवालही तितकेच कडक :- शहरातील नागरीकांचा प्रश्न थेट आहे की, काम अर्धवट असताना ठेकेदाराला बिल कसे देण्यात आले ? पाईपचा फायदा कधी मिळणार ? भुयारी गटाराचे पाणी प्रत्यक्षात शुद्ध होऊन वापरासाठी दिले जाणार का ? बांधकाम विभाग आणि मुख्य्याधिकारी नगरवासीयांसमोर हिशोब कधी मांडणार ? यासोबतच वृत्तपत्रांच्या जाहिरातींचे बिल थकवले जाते, पण ठेकेदाराच्या अर्धवट कामाला पैसे कसे देतात ? असा सवाल जनतेतून सातत्याने उपस्थित केला जात आहे.

* पातळगंगा नदीला प्रदूषणाचा धोका :- बांधकाम प्रकल्पांच्या सांडपाण्याची योग्य विल्हेवाट न लावताच ते थेट पातळगंगा नदीत सोडले जात असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे. नदीतील पाण्याची गुणवत्ता बाधित होत असून पर्यावरणीय धोकाही वाढला आहे.


* विकास की विनाश ? :- खोपोलीकर म्हणतात की, काम झाले नाही, रस्ते दुरुस्त नाही, पण बिल मंजूर...हे कोणते गणित ? पुढे ते जाहीर इशारा देतात की, प्रकल्पाचा हिशोब द्या. अन्यथा जनतेच्या न्यायालयात हाकेवर उभे राहावे लागेल!

भुयारी गटार प्रकल्पाने पायाभूत सुविधा उभारण्याऐवजी नागरिकांना त्रासच अधिक दिला आहे. कामाचा वेग, दर्जा आणि पारदर्शकता यात सुधारणा होणे अत्यावश्यक आहे. नगर परिषद प्रशासन आणि ठेकेदारांनी तातडीने पावले उचलून रस्त्यांची पुनर्बांधणी करावी, अशी नागरिकांची ठाम मागणी आहे.

पहिल्याच प्रयत्नात शिवसेनेसाठी ऐतिहासिक विजय नोंदविन्यास सज्ज...

 


संदीप राम पाटील हे खोनपा प्रभाग क्रमांक 1 मधील

( सर्वसाधारण ) नंबर 1 चा ठरणार विजयी उमेदवार :

खोपोली/प्रतिनिधी :- तरुणांच्या गळ्यातील ताईत संदीप राम पाटील हे खोपोली नगरपालिका परिषद प्रभाग क्रमांक 1 चे नंबर 1 चे उमेदवार ठरत आहेत.हक्काने मदतीला येणारा त्यांचा स्वभाव व जोडलेला प्रचंड जनसंपर्क हा त्यांच्या जमेची बाजू आहे. सुभाषनगर, जगदीशनगर,लौजी, वासरंग येथील मोठा जनसमुदाय सोबत असुन शिवसेना ( शिंदे गट ) मध्ये कुलदीपक शेंडे, दिलीप जाधव यांच्या सोबतीने त्यांचा शेकडो समर्थकासह झालेला प्रवेश हा लक्षनीय आहे.आमदार महेंद्र थोरवे यांच्या विजयात पडद्याआडून योगदान देणाऱ्या चेहऱ्यात संदीप पाटील यांचे नाव अग्रणी आहे.अजातशत्रू असलेले संदीप पाटील यांच्या रूपाने विकासाचा चेहरा स्थानिक जनतेला मिळणार असुन एव्हाना त्यांनी प्रचाराची पहिली फेरी पूर्ण केल्याची चर्चा मतदारसंघात पहावयास मिळत आहे.


अचूक निर्णयक्षमता व सर्वाना सोबत घेऊन कार्य करण्याची त्यांची तत्परता खोपोली नगरपालिका निवडणुकीत 2025 मधील पहिले सर्वसाधारण गटातील विजयी उमेदवार ठरून ऐतिहासिक चेहरा ठरतील या उत्साहाने खोपोली परिसरातील समर्थक व पक्षीय नेते कामास लागलेले आहेत.


तरुण उत्साही नेतृत्व संदीप राम पाटील यांना भरघोस मतांनी निवडून आणून गुलाल आपलाच हा नारा घेऊन युवा, महिला व ज्येष्ठ जीवाचे रान करताना दिसत आहे.

Wednesday, October 29, 2025

रामदास पाटील सुमठाणकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

 

                               

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शेकडो पदाधिकाऱ्यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश

आगामी निवडणुकांसाठी नांदेड जिल्हा पक्ष संघटनेत उत्साह

देगलूर/ प्रतिनिधी :- नांदेड हा काँग्रेस विचाराचा जिल्हा असून काँग्रेस पक्ष कार्यकर्त्यांचा पक्ष आहे तो नेत्यांचा पक्ष नाही. आजही नांदेड जिल्हा काँग्रेस विचाराचाच आहे व उद्याही काँग्रेस विचाराचाच राहिल. काँग्रेस पक्षात इतर पक्षातून येणाऱ्यांचा ओघ वाढत आहे. काल गडचिरोलीत आज नांदेड जिल्ह्यात तर उद्या जालना जिल्ह्यात पक्ष प्रवेश होत आहे.  यावेळी हर्षवर्धन सकपाळ म्हणाले कि, हा राहुल गांधी यांच्या संघर्षाचा परिणाम असून काँग्रेस विचारावर विश्वास ठेवून हे पक्ष प्रवेश होत आहेत याने पक्षाला बळ मिळत असून महाराष्ट्रात काँग्रेसला गतवैभव प्राप्त होतील. तसेच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत विरोधकांचा सुपडासाफ करा, या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या विधानावर बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत त्यांचेच दात त्यांच्या घशात जातील. 

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत देगलूरमध्ये आज अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दिव्यांग सेलचे प्रदेश कार्याध्यक्ष रामदास सुमठाणकर यांच्यासह राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रमुख नेते असलेले अविनाश नीलमवार, माजी उपनगर अध्यक्ष बालाजी रोयलावार असंख्य पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यात ४ माजी नगराध्यक्ष, २३ माजी नगरसेवक, ८ नगरसेवक, २ माजी जिल्हा परिषद सदस्य आणि माजी पंचायत समिती सभापती, माजी पंचायत समिती सदस्य यांचा समावेश आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी या सर्वांचे काँग्रेस पक्षात स्वागत केले. 

यावेळी नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण, नांदेड दक्षिणचे जिल्हाध्यक्ष हणमंतराव बेटमोगरेकर, नांदेड उत्तरचे जिल्हाध्यक्ष राजेश पावडे, ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष प्रा यशपाल भिंगे, अब्दुल सत्तार,देगलूर काँग्रेसचे शहर अध्यक्ष माजी नगरअध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार, तालुका अध्यक्षा श्वेताताई बस्वराज पाटील, कैलास येसगे,मीरा मोहियोदिन, हाफिज खान पठाण, संतोष उंनग्रतवार, युवक अध्यक्ष इलीयास बागवान, आदी मान्यवर उपस्थित होते.

खोपोलीत स्वच्छतेचा बोजवारा आणि भ्रष्टाचाराचा झोळा!

 


* वर्षाला 12 कोटी स्वच्छतेवर खर्च, तरी शहरात दुर्गंधीचा डंका!

* मुख्याधिकारी जोमात...पण जिल्हाधिकारी कोमात ? आपचे शहराध्यक्ष खान यांचा सडेतोड सवाल!

खोपोली / खलील सुर्वे :- “स्वच्छतेचे मिशन मोठे, पण शहर दुर्गंधीने गच्च!” असे चित्र सध्या खोपोली शहराचे झाले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दरवर्षी तब्बल 12 कोटी रुपये खर्च करूनही शहरात अस्वच्छतेचा ‘राजा’ मिरवतोय, आणि प्रशासन मात्र फाईलच्या सावलीत झोपलेले दिसते. खोपोलीकरांना विचारायचे आहे, हे स्वच्छतेचे पैसे गटारात गेलेत का की, अधिकाऱ्यांच्या वातानुकूलित कॅबिनमध्ये ? कधी जागे होणार. 


* 12 कोटींचा खर्च...पण शहर दुर्गंधीत बुडालंय :- नगर परिषद लेखापाल संतोष तळपे यांनी कबूल केलंय की, दरवर्षी 10 ते 12 कोटी रुपये स्वच्छतेसाठी खर्च होतात. मग प्रश्न असा की, या पैशांनी नेमके काय स्वच्छ केले जाते ? शहरात गटारे तुडुंब भरलेली, नाल्यांमधून दुर्गंधीचा महोत्सव आणि मोकाट जनावरांनी कचऱ्यावर मेजवानी लावलीय! हे सगळं पाहून खोपोलीकर म्हणतात की, स्वच्छ भारत मिशन इथे नाही, इथे ‘घाणेरडे शहर मिशन’ सुरू आहे.


* सकाळी थम लावा, दुपारी घरी पळा :- नगर परिषदेत अधिकाऱ्यांचे ‘वर्क फ्रॉम कँटीन’ सुरू आहे. सकाळी थम लावून हजेरी देतात आणि दुपारी 1 वाजता ‘लंच ब्रेक’ नावाखाली हॉटेलात डबे खातात, ते पण थेट सरकारी वेळेत, सरकारी खुर्ची सोडून! दरम्यान एसी, लाईट, फॅन, चालूच ठेवलेले म्हणजे वीज वाया, वेळ वाया आणि जनता की माया भी! हे लोकसेवक नाहीत, हे लोकांचे ‘लोकल शहेशहा’ आहेत, असा उपहास नागरिकांनी केला आहे.


* डॉंक्टर मुख्याधिकारी - पण शहर आजारी :- खोपोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी बीएएमएस (BAMS) डॉंक्टर आहेत. पण त्यांची डॉक्टरकी शहराच्या विकासाला आजारातून बरे करू शकलेली नाही. ते सर्वसामान्य नागरिकांना भेटत नाहीत, नेहमीच व्हिव्हिआयपी गराडा अन् फोन असतात. सामान्य नागरिक, पत्रकार किंवा कार्यकर्ते गेले की उत्तर एकच, साहेब आले नाहीत, आले होते पण गेले... पुन्हा कधी येतील माहित नाही!


* 'आप' शहराध्यक्ष खान यांचा रोखठोक सवाल :- आम आदमी पार्टीचे खोपोली शहराध्यक्ष ग्यासुद्दीन खान यांनी सरळ सवाल केला आहे की, जिल्हाधिकारी साहेब खोपोली नगर परिषदेतील अधिकारी जर घरी जाऊन जेवू शकतात, तर इतर सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनाही परवानगी द्या किंवा मग यांच्यावर कारवाई करा, कायदा सगळ्यांसाठी एकच असतो.


* शहरात गटार, कचरा आणि मोकाट जनावरांचे राज्य :- खोपोलीत गटारे भरलेली, कचऱ्याचे ढीग आणि त्यावर कुत्रे, मोकाट जनावरांची मिरवणूक. मार्केट परिसरात दुर्गंधी, रस्त्यांवर घाण हे दृश्य पाहून नागरिक संतापलेत. एका वृद्ध नागरिकाने सांगितले की, असे वाटते नगर परिषद स्वच्छता नाही 'रुग्णालयांसाठी रुग्ण तयार करणे’ हेच ध्येय ठेवून आहे.


* एसी, खुर्च्या, बोनस...पण काम शून्य :- नगर परिषद अधिकाऱ्यांकडे सर्व सरकारी सुविधा आहेत. एसी कॅबिन, थंड पाणी, हेल्थ इन्शुरन्स, टोलमाफी, बोनस, मोठे वेतन, घरी जावून जेवण, चहासाठी दिवसातून दहा वेळा गुडलक चौकावर जाणे, तिथे उभे राहून तासन्तास गप्पा मारणे, दुपारी जेवण व झोप घेवून आरामशीर कार्यालयात येणे…पण कामाच्या बाबतीत “संपूर्ण झोपलेले” लोकसेवक नव्हे, “लोकांवर ओझे” झालेले प्रशासन असे लोकांचे मत आहे.

“साहेबांचा एसी थंड, पण शहराचे रक्त गरम, घाणीत बुडालेली खोपोली आणि स्वच्छतेचे नाव फक्त फॉर्मवर!”


* नागरिकांची मागणी :- शहरात तातडीने स्वच्छता मोहीम राबवावी, दरवर्षी होणाऱ्या कोट्यवधींच्या खर्चाचा लेखाजोखा जाहीर करावा, जेवणासाठी घर गाठणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी, मुख्याधिकाऱ्यांची उपस्थिती नोंदवणारी नोंद सार्वजनिक करावी, अशी मागणी होत आहे. तसे निवेदन आम आदमी पार्टी व न्यूज जर्नालिस्ट असोसिएशन, डिके फाउंडेशन ऑंफ फ्रीडम अँड जस्टिस या राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या माध्यमातून लवकरच देण्यात येणार अशी माहिती देण्यात आली.





Tuesday, October 28, 2025

पेट्रोलचा दर वाढतोय…पण पंपावर सुविधा घटल्यात !

 


खालापूरच्या भारत पेट्रोलियम पंपावर ग्राहकांचा आक्रोश 


* पंपावर खड्ड्यांची राज्यश्री, डबक्यांमध्ये पेट्रोल भरा म्हणणारे कर्मचारी मोबाईलवर गप्पा मारत व्यस्त...स्थानिक प्रशासन झोपेत की ‘पंपात’ हिस्सा आहे ?


खालापूर / खलील सुर्वे :- खालापूर तालुक्यातील पेट्रोल पंपांवर सुरक्षा, सुविधा आणि स्वच्छता या तिन्ही गोष्टींची अवस्था “भारतीय रस्त्यांसारखीच...खड्ड्यांनी भरलेली!" शासनाचे नियम म्हणजे फक्त ग्राहकांसाठीच काय ? पंप मालक आणि कर्मचारी हे “सुविधा अपवाद” आहेत का ? असा सवाल नागरिकांनी थेट तहसिलदार व स्थानिक प्रशासनाला केला आहे.


* भारत पेट्रोलियमचा कृष्णा पंप की खड्ड्यांचा तलाव ? :- खालापूर तहसील कार्यालयापासून अवघ्या दोनशे मीटर अंतरावर असलेल्या भारत पेट्रोलियमच्या कृष्णा पेट्रोलियम पंपावर सध्या पाण्याचे राज्य आहे...पेव्हर ब्लॉक खचले, टेमक्या उखडल्या, आणि खड्डे इतके खोल की पंपाच्या नावाऐवजी “कृष्णा तलाव” म्हणावे असेच चित्र आहे. ग्राहक वाहन पेटवतात तेवढ्यातच गाडी खड्ड्यात बुडते आणि पेट्रोल भरण्यासाठी डबक्यांमध्ये उभे राहणे म्हणजे दररोजचा व्यायाम! गाडी स्वच्छ आणली तरी परत निघेपर्यंत माती, पाणी आणि चिखलाचे ट्रीटमेंट फ्री!


* ग्राहकांना नियम, कर्मचाऱ्यांना सवलत ? :- पंपावर मोठे बोर्ड आहेत की, “मोबाईल वापरू नका, सुरक्षितता पाळा!” पण कर्मचाऱ्यांचे चित्र बघा... एका हातात पाईप आणि दुसऱ्या हातात मोबाईल! फोनवर गप्पा, हसणे आणि मध्येच “फुल पेट्रोल टाकू का सर?” ग्राहकांना ‘धोका’ सांगणारे हेच कर्मचारी हेल्मेट नाही, मास्क नाही, आयडी कार्ड नाही, सेफ्टी शूज नाही! पण ड्रेस मात्र एकदम टापटिप - “सुरक्षितता नाही, स्टाईल आहे!”


* सुविधा फक्त बोर्डांवर - प्रत्यक्षात अंधारात ग्राहक : - शौचालय - नावालाच! आत दुर्गंध, पाणी नाही. पिण्याचा वॉटर कूलर - कूलर आहे, पण पाणी गायब! हवा भरण्याचं मशीन - बंद! मेडिकल बॉक्स - ‘बुक माय शो’वर शोधावा लागेल! कधी पेट्रोल नाही, कधी डिझेल नाही, कधी सीएनजी नाही, पण “पंप बंद” अशी सूचना मात्र लावली जात नाही! डेन्सिटी मीटर बंद, तक्रार रजिस्टर मालकाकडे अर्थात, “ग्राहक तक्रार करतो, पण तक्रार त्याच्याकडेच बंद होते!”


* फ्री सुविधा फक्त जाहिरातींत :- शासन सांगते “पंपांवर ग्राहकांसाठी मोफत सुविधा आहेत.” पण वास्तव काय मोफत काहीच नाही, उलट हवा भरण्यासाठीही पैसे द्यावे लागतात. ग्राहक त्रस्त, पण अधिकारी “रात्र झाली, बात गेली” या धोरणावर!


* शासनाची झोप - अपघाताची वाट :- या पंपाच्या अगदी जवळ तहसील कार्यालय आहे. पण अधिकार्‍यांनी एकदाही पाहणी केली का? नाही. कारण ते स्वतःच्या गाड्यांतून फक्त सरळ निघून जातात. दुर्घटना घडली की मगच “कारवाईचा पंप” सुरू होईल का ? ग्राहकांनी नियम तोडला तर दंड, पण कर्मचारी तोडले तरी माफी का? खड्डे आणि घाणीचा पंप ठेवून ‘भारत पेट्रोलियम’चा सन्मान कसा ? शासन आणि ऑईल कंपनी झोपेत आहेत का, की मुद्दाम डोळे झाकून बसली आहे ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.



देगलूर शहरात ऑनलाइन विवाह प्रमाणपत्र प्रक्रिया सुरू करण्याची नागरिकांची मागणी

 


देगलूर/जावेद अहमद :- देगलूर शहरात विवाह प्रमाणपत्रासाठी अद्यापही सुरू असलेल्या ऑफलाइन प्रक्रियेमुळे नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणीं विरोधात आता आवाज उठू लागला आहे. या प्रक्रियेला शक्य तितक्या लवकर ऑनलाइन स्वरूप दिले जावे, अशी मागणी शेख मुजममील अहमउल्ला यांनी उपविभागीय अधिकारी देगलूर यांना निवेदनाद्वारे केली आहे.


सध्या शहरात विवाह प्रमाणपत्र हस्तलिखित पद्धतीने देण्यात येत असल्याने, प्रमाणपत्रासाठी अतिरिक्त कागदपत्रांची मागणी, कार्यालयीन दौरे तसेच विविध शासकीय कार्यालयांमध्ये प्रमाणपत्र नाकारले जाणे, अशा प्रकारच्या अनेक समस्या नागरिकांसमोर निर्माण होत आहेत. विशेष म्हणजे देगलूर तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये ही प्रक्रिया ऑनलाइन स्वरूपात सुरू असतानाही, शहरात मात्र अद्याप जुनीच प्रक्रिया कायम आहे. त्यामुळे नवविवाहितांना प्रमाणपत्र मिळविण्यासाठी वारंवार फेऱ्या माराव्या लागत असून वेळ आणि खर्चात टपट वाढ होत आहे.


ऑफलाइन स्वरूपातील विवाह प्रमाणपत्र अनेक शासकीय योजनांमध्ये, मतदार नोंदणी, आधार अद्ययावतीकरण, पासपोर्ट तसेच अन्य कागदपत्रांमध्ये मान्य नसल्याने नागरिकांना अर्ज नाकारला जातो. त्यामुळे शासनाच्या डिजिटल सेवा सुलभ करण्याच्या प्रयत्नांना तडा जात असल्याची भावना व्यक्त होत आहे.


देगलूर शहरात ऑनलाइन Marriage Certificate प्रणाली लागू झाल्यास हजारो नागरिकांना मोठा दिलासा मिळेल तसेच सेवांचा वेग, पारदर्शकता आणि उपलब्धता वाढेल, असा विश्वास अर्जदारासह नागरिकांनी व्यक्त केला आहे..यावेळी शेख इम्रान देगलूरकर, शेख अकबर, मिर्झा युसुफ, सय्यद बबलू, शेख महेमूद, शेख खुर्शीद, सुफियान आदी उपस्थित होते.

गिरड - सिर्सी रस्त्यावर कार - ट्रकची भीषण धडक

 


* 24 वर्षीय तरुण चालक जागीच ठार, तीन जखमी

* तुळजापूर दर्शनावरून परततांना घडला अपघात 

* वडील, बहीण व दीड वर्षांचा भाचा गंभीर जखमी

नागपूर /  प्रतिनिधी :- दिवाळीच्या भाऊबीजेच्या आनंदावर शोककळा ओढणारी दुर्दैवी घटना गिरड - सिर्सी रस्त्यावर रविवारी रात्री घडली. तुळजापूर दर्शन करून परत येत असलेल्या एका कुटुंबाचा कार अपघातात भीषण मृत्यू झाला, तर त्याच कुटुंबातील तीन जण गंभीर जखमी झाले. हा अपघात रविवार 27 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास गिरड - सिर्सी मार्गावरील ‘सॅटीस्फॅक्शन बार’ जवळ झाला.


* अपघातात तरुण चालकाचा जागीच मृत्यू :- प्राथमिक माहितीनुसार, एम. एच. 30 ए. झेड. 5192 क्रमांकाच्या एर्टिगा कारने एम. एच. 32 क्यू. 2362 क्रमांकाच्या आयसर ट्रकला समोरून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात हिमांशू आत्माराम गोन्नाडे (वय 24, रा. आरमोरी, जि. गडचिरोली) यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रसंगी सोबत असलेले वडील आत्माराम सोनाजी गोन्नाडे (वय 58), बहीण शिवानी द्रोहीत धकाते (वय माहित नाही), भाचा एशित द्रोहीत धकाते (वय दीड वर्ष)

हे सर्व गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने कस्तुरबा हॉस्पिटल, सेवाग्राम येथे उपचारासाठी हलविण्यात आले.


* पोलिस व स्थानिकांचा तत्पर बचावकार्य :- घटनास्थळी प्रथम हॉटेल मालक तेजराम पडोळे यांनी सिर्सी पोलिस चौकीला अपघाताची माहिती दिली. माहिती मिळताच बेला पोलिस ठाण्याचे शिपाई ओम राठोड, होमगार्ड स्वप्नील पांडे, पोलिस पाटील विजय गायगवाने (बोथली), चिंटू धोंगडे (मनोरी) आणि इतर सहकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. जखमींना खाजगी ॲम्ब्युलन्सद्वारे हॉस्पिटलला रवाना करण्यात आले,

तर मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी उमरेड येथे पाठविण्यात आला. अपघातामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती, मात्र ठाणेदार चेतनसिंह चव्हाण यांनी स्वतः घटनास्थळी पोहचून वाहतूक सुरळीत करण्यास मदत केली. दरम्यान, ट्रक चालक मोहम्मद रफीक मजीद शेख (रा. अड्याळ, ता. पवनी, जि. भंडारा) यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.


* उमरेड - गिरड रस्त्याची दयनीय अवस्था :- स्थानिक नागरिकांच्या मते, उमरेड - गिरड - सिर्सी रस्ता हा सतत कोळसा वाहतुकीमुळे खराब अवस्थेत आहे. रस्त्याच्या कडेची भराव नाही, ब्रेकरवर रेडियम मार्किंगचा अभाव आहे. या कारणामुळे अपघातांची मालिका सुरू असून

रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. परिसरातील नागरिकांनी प्रशासनाकडे रस्ता दुरुस्ती आणि अपघात नियंत्रणासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.


* एक मेहनती तरुणाचा अंत :- मृत हिमांशू गोन्नाडे हे माजी पोलिस कर्मचाऱ्याचे पुत्र होते. ते तुळजापूर दर्शनावरून धराशिव मार्गे लहान बहिणीला पुण्यास सोडून आरमोरीकडे परतत असताना हा अपघात झाला.

दिवाळीच्या आनंदात बुडालेल कुटुंब क्षणात उद्ध्वस्त झाल्याने आरमोरी आणि सिर्सी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Monday, October 27, 2025

भ्रष्टाचारमुक्त भारतासाठी पत्रकारांचा संकल्प!

 


प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि सुशासन यांची शपथ

* न्यूज जर्नालिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष फिरोज पिंजारी यांचा पुढाकार

रायगड / प्रतिनिधी :- भ्रष्टाचारमुक्त आणि नैतिकतेवर आधारित भारत घडविण्याच्या दिशेने ‘न्यूज जर्नालिस्ट असोसिएशन’ ने ऐतिहासिक पाऊल टाकत ‘Integrity Pledge’ (प्रामाणिकतेची शपथ) घेतली आहे. या शपथपत्रावर संस्थापक अध्यक्ष फिरोज पिंजारी यांच्या स्वाक्षरीने समाजात प्रामाणिकतेचा आणि जबाबदारीचा संदेश देण्यात आला आहे. हा उपक्रम महाराष्ट्रातील पत्रकार आणि सामाजिक संस्थांसाठी नव्या नैतिक दिशादर्शनाचा प्रारंभ ठरत आहे.

* पत्रकारांचा प्रामाणिकतेचा संकल्प - भ्रष्टाचार नाही, जबाबदारी आणि पारदर्शकता आमचा धर्म :- पत्रकार संघटनेच्या या शपथपत्रात नमूद करण्यात आले आहे की, भ्रष्टाचार हा देशाच्या आर्थिक, सामाजिक आणि राजकीय प्रगतीसाठी मोठा अडथळा आहे. शासन, नागरिक आणि खाजगी क्षेत्र या सर्वांनी मिळून त्याचे उच्चाटन करणे ही काळाची गरज आहे. संघटनेने या शपथेतून नैतिक मूल्यांचे पालन, पारदर्शकता, न्याय्य व्यवसाय पद्धती आणि जबाबदार पत्रकारिता या तत्त्वांचे पालन करण्याचा निर्धार केला आहे.

* शपथपत्रातील प्रमुख मुद्दे :-

- आम्ही नैतिक व्यवसाय पद्धतींचा प्रसार करून प्रामाणिकतेची संस्कृती जोपासू.

- आम्ही लाच देणार नाही किंवा स्विकारणार नाही.

- आम्ही पारदर्शकता, जबाबदारी आणि निष्पक्षतेवर आधारित सुशासन अंमलात आणू.

- आम्ही संबंधित कायदे आणि नियमांचे पालन करून व्यवसायाचे संचालन करू.

- सर्व कर्मचाऱ्यांसाठी ‘Code of Ethics’ स्विकारण्यात येईल.

- कर्मचाऱ्यांना कायदे, नियम आणि जबाबदाऱ्यांची जाण करून देऊन प्रामाणिक कार्यसंस्कृती विकसित केली जाईल.

- 'Whistle Blower’ व तक्रार निवारण यंत्रणा कार्यान्वित करून भ्रष्टाचार आणि गैरप्रकार रोखले जातील.

- आम्ही हितधारक आणि समाजाच्या हक्कांचे संरक्षण करू.

* प्रामाणिकतेशिवाय लोकशाही अपूर्ण - फिरोज पिंजारी :- न्यूज जर्नालिस्ट असोसिएनचे संस्थापक अध्यक्ष पत्रकार फिरोज पिंजारी यांनी या प्रसंगी सांगितले की, पत्रकारिता ही केवळ बातम्या देण्याचे काम नाही, तर ती लोकशाहीचा चौथास्तंभ आहे आणि या स्तंभाची ताकद प्रामाणिकतेत आहे. आम्ही सर्व पत्रकारांनी आजपासून स्वतःला भ्रष्टाचारमुक्त आणि उत्तरदायी पत्रकारितेसाठी समर्पित केले आहे.

त्यांनी पुढे म्हटले की, सत्य, नीतिमत्ता आणि पारदर्शकतेचा मार्ग हा कठीण असला तरी, पत्रकार म्हणून समाजासमोर आम्ही आदर्श निर्माण करू.


* जबाबदारीचे प्रतीक, प्रेरणादायी संदेश :- हा शपथपत्र कार्यक्रम महाराष्ट्र राज्यातून घेतला गेला असून 27 ऑक्टोबर 2025 रोजी अधिकृतरित्या लागू करण्यात आला आहे. यामध्ये संस्थापक अध्यक्ष म्हणून फिरोज पिंजारी यांनी अधिकृत प्रतिनिधी म्हणून सही केली आहे. या उपक्रमाला संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष खलील सुर्वे, राष्ट्रीय संयोजक डॉं. शरीफ बागवान, राष्ट्रीय कोषाध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुधीर गोविंद माने, राष्ट्रीय महासचिव मानसी कांबळे, राष्ट्रीय सचिव अनिल पवार तसेच संघटनेचे सर्व पदाधिकारी, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, प्रशासकीय अधिकारी आणि तरुण पिढीने मोठा प्रतिसाद दिला आहे. हा उपक्रम केंद्रीय भ्रष्टाचार प्रतिबंधक आयोग (CVC) च्या ‘Vigilance Awareness Week’ या उपक्रमाशी सुसंगत आहे.




खोपोली नगराध्यक्षपदासाठी डॉं. सुनील पाटील यांचा झंझावात

 



* राष्ट्रवादीतून दमदार एन्ट्री, कार्यालय उद्घाटनाने निवडणुकीचा ज्वर चढला!

* शिंदे गटातून राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर डॉं. पाटील झाले ‘गेमचेंजर’

* ताकई येथे खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

खोपोली / मानसी कांबळे :- आगामी खोपोली नगर परिषद निवडणुकीच्या रणशिंगावर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आणि खोपोली नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष डॉं. सुनील गोटीराम पाटील यांचे नाव जोरदार चर्चेत आहे. राष्ट्रवादीत प्रवेश केल्यापासूनच डॉं. सुनील पाटील यांनी खोपोलीच्या राजकारणात नवा ‘पॉलिटिकल झंझावात’ निर्माण केला आहे.

त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन ताकई येथे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते झाले.

या उद्घाटन सोहळ्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून

नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत आता डॉं. पाटील हे ‘हॉट फेव्हरेट’ बनले आहेत.

* राष्ट्रवादीत नवसंजीवनी :- अलीकडेच शिवसेना शिंदे गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करताच डॉं. सुनील पाटील यांना प्रदेश उपाध्यक्षपद देऊन पक्षाने त्यांच्यावर विश्वास दाखवला. त्यांचा खोपोली शहरात दांडगा जनसंपर्क, उत्तम संघटनशैली आणि सर्वसामान्यांशी जवळीक यामुळे ते पक्षासाठी ‘विकासाचा चेहरा’ ठरत आहेत. जनतेसाठी राजकारण आणि विकासासाठी सत्ता, हाच आमचा मंत्र आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष डॉं. सुनील पाटील म्हणाले.


* जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन :- ताकई येथील कार्यालय उद्घाटन सोहळा हा राजकीय शक्तीप्रदर्शनाचा उत्सवच ठरला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व खासदार सुनील तटकरे,

रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे, जिल्हा युवक अध्यक्ष अंकित साखरे, तालुका अध्यक्ष संतोष बैलमारे, महिला नेत्या अश्विनी पाटील, युवा नेते मनेष यादव, रमेश जाधव, निलेश औटी, भूषण पाटील, संदीप पाटील, राहुल जाधव, सुरेखा खेडकर, वैशाली जाधव, जैबुनिसा शेख, अल्पेश थरकुडे आणि असंख्य कार्यकर्ते व महिला उपस्थित होत्या.


* खोपोली नगरपरिषदेत ‘राजकीय गणित’ बदलणार :- खोपोली नगर परिषद, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या आरक्षणाचे आराखडे जाहीर झाले आहेत.

निवडणुका कधीही जाहीर होण्याची शक्यता असताना

सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये डॉं. सुनील पाटील यांच्या प्रवेशानंतर स्थानिक राजकारणातील सत्तासमीकरणेच बदलण्याची चिन्हे दिसत आहेत. शहरातील व्यापार, शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात प्रभावी व्यक्तिमत्त्व असलेले पाटील नगराध्यक्षपदासाठी प्रबळ दावेदार ठरत आहेत.


* पुन्हा विकासाचे दिवस परत येणार :- जनतेमध्ये एक भावना स्पष्टपणे दिसत आहे की, डॉं. पाटील नगराध्यक्ष झाले तर खोपोलीचा चेहरा मोहरा बदलेल. त्यांच्या कार्यकाळात झालेल्या पायाभूत विकासकामांची आठवण आजही नागरिक काढतात. नव्या जनसंपर्क कार्यालयातून ते पुन्हा 'विकासाच्या राजकारणा’ची नवी पायाभरणी करीत असल्याचे दिसून येत आहे.

विघ्नहर्ता सार्वजनिक उत्सव मंडळ ( नियोजित ) म्हाडा वसाहत शिरढोण आधारस्तंभ व पत्रकार सामाजिक कार्यकर्ते तथा पशू प्रेमी यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा...

 


ठाणे/प्रतिनिधी :- ठाणे जिल्ह्यातील व कल्याण तालुक्यातील मौजे शिरढोण येथे सामाजिक बांधिलकी जपणारा विघ्नहर्ता सार्वजनिक उत्सव मंडळाचे आधारस्तंभ यांचा वाढदिवस म्हाडा वसाहत शिरढोण परिसरातील “ आधारस्तंभ ” म्हणून परिचित असलेले सुबोध सावंत यांनी यंदाचा आपला वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपत अत्यंत साधेपणाने आणि जनसेवेच्या माध्यमातून 43 वा साजरा केला. शुभदिनी (ता. 25 ) त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांमध्ये युवा पिढीसाठी क्रिकेट च संपूर्ण साहित्य देण्यात आले. तसेच उद्घाटन म्हाडा वसाहत येथे पार पडले. नागरिकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला.


तसेच वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्याच्या हेतूने ठिकाणी सेवा उपक्रम राबविण्यात आले. त्यात या प्रसंगी परिसरातील नागरिक, कार्यकर्ते व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक भगवान पोपळे कार्याध्यक्ष गणेश यावलकर खजिनदार गणेश महाजन सचिव गणेश पारेकर संतोष किर्ते बाळू यावलकर गणेश वटे दिनेश नागणे अक्षय चालखोर संदीप कदम अमोल कुळवेकर रांजणे प्रज्वल पाटील भितेश पवार अमोल टोपे शिवाजी चव्हाण नाना रोकडे अजिंक्य टोपे रोहित कारभारी कृष्णा फरकटे दत्ता जामकर दत्तात्रय बोर्डे सुशांत दरेकर सुशांत जाधव दिनेश पवार उमेश खराडे चेतन कदम आधारस्तंभ व पत्रकार सामाजिक कार्यकर्ते तथा पशु प्रेमी सुबोध सावंत यांनी वाढदिवस साजरा करण्याऐवजी समाजसेवेला प्राधान्य देत एक आदर्श निर्माण केला आहे. त्यांचा हा सामाजिक जाणिवेचा उपक्रम सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.

नायगाव ते शेळगाव छत्री रस्ता खड्डेमय — हजारो विद्यार्थ्यांचे जीव धोक्यात

 


नागरिकांकडून मुख्यमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांना तातडीने कारवाईची मागणी, अन्यथा मतदानावर बहिष्काराचा इशारा

नांदेड/ जावेद अहमद : - नायगाव ते शेळगाव छत्री हा मुख्य मार्ग सध्याखड्डेमय झाल्यामुळे नागरिक, शेतकरी, विद्यार्थी व नोकरदार वर्ग प्रचंड त्रस्त झाला आहे. दररोज हजारो विद्यार्थी या मार्गाने शाळा आणि महाविद्यालयात जातात. रस्त्याची अत्यंत वाईट अवस्था झाल्यामुळे अपघातांची शक्यता वाढली असून जनजीवन धोक्यात आले आहे. स्थानिक नागरिकांनी सांगितले की, “गेल्या अनेक महिन्यांपासून रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय आहे. प्रशासन व लोकप्रतिनिधी यांचे लक्ष वेधूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे आता जनतेचा संयम संपत चालला आहे.” 


शेळगाव छत्री येथील नागरिक अविनाश विठ्ठलराव अनेराये यांनी मुख्यमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री यांना ई-मेलद्वारेअर्ज पाठवून रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. त्यांनी अर्जात नमूद केले आहे की, जर रस्त्याचे काम लवकर हाती घेण्यात आले नाही तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नागरिक मतदानावर बहिष्कार टाकतील.या विषयावर सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने लक्ष घालून आवश्यक ती कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.

संरक्षित वन्यजीव प्राण्याचे मांस वाडगाव येथून जप्त!

 


अलिबाग वन विभाग आणि पोलिसांची संयुक्त कारवाई

* आरोपीला अटक ; वन्यजीव संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल

रायगड / प्रतिनिधी :- वन्यजीवांच्या संरक्षणासाठी सक्त कायदे असूनही बेकायदेशीररीत्या मांस विक्री आणि साठवणुकीच्या घटना सुरूच आहेत. अशीच एक धक्कादायक घटना अलिबाग तालुक्यातील वाडगाव येथे उघडकीस आली आहे. संरक्षित वन्यजीव प्राण्याचे सुमारे 1 किलो वजनाचे मांस बाळगल्याप्रकरणी अलिबाग वन विभागाने पोलिसांच्या मदतीने छापा टाकून एकाला अटक केली आहे. या कारवाईमुळे वन्यजीव तस्करीविरोधातील मोहिमेला मोठे यश मिळाले असून परिसरात खळबळ उडाली आहे.


* संयुक्त कारवाई - गुप्त माहितीवरून छापा :- 23 ऑक्टोबर 2025 रोजी अलिबाग पोलिस ठाण्याच्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे वाडगाव येथील जयेंद्र काशिनाथ भगत (वय 49) यांच्या घरावर छापा टाकण्यात आला. या कारवाईदरम्यान घरातून संशयास्पद वन्यजीव प्राण्याचे मांस जप्त करण्यात आले. सदर मांसाचा नमुना सिल करून प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे, ज्यातून कोणत्या प्रजातीच्या प्राण्याचे मांस आहे हे स्पष्ट होणार आहे.


* वन्यजीव संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा :- संशयिताविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 च्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अधिनियमांतर्गत संरक्षित प्राण्यांची शिकार, विक्री किंवा साठवणूक करणे हे गंभीर गुन्हा असून अशा गुन्ह्यांसाठी तीन ते सात वर्षे कारावास आणि दंडाची तरतूद आहे.


* कारवाईत सहभागी अधिकारी आणि पथक :- ही कारवाई उपवनसंरक्षक राहुल पाटील व सहाय्यक वनसंरक्षक भाऊसाहेब रतन जवरे यांच्या मार्गदर्शनाखाली परिक्षेत्र वन अधिकारी नरेंद्र सिताराम पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली. या पथकात तुकाराम जाधव, निलेश चांदोरकर, प्रभाकर भोईर, महेश नाझरकर, जयवंत घरत, दीपक मोकल, राम टाकरस, पंकज घाडी आणि राजेंद्र पवार या अधिकाऱ्यांचा समावेश होता. त्यांच्या तत्परतेमुळे आणि समन्वयामुळे कारवाई यशस्वीरीत्या पार पडली.


* अशा गुन्ह्यांवर शून्य सहनशीलता :- वन विभागाने स्पष्ट इशारा दिला आहे की, संरक्षित वन्यजीवांची शिकार, विक्री, साठवणूक किंवा मांसाचे बाळगणे हे गंभीर गुन्हे आहेत. कोणालाही कायद्यापासून सूट मिळणार नाही. अशा प्रकरणांवर कठोर कारवाई सुरू राहील.


* वन्यजीव गुन्हे दिसल्यास तत्काळ कळवा :- वन विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, जर आपल्या परिसरात वन्यजीव शिकार, मांस विक्री किंवा अवैध साठवणुकीचे प्रकार दिसले, तर त्वरित अलिबाग वन विभागाला संपर्क करा. जनतेच्या सहकार्यानेच वन्यजीव संरक्षणाचे कार्य अधिक प्रभावी होईल, असेही विभागाने म्हटले आहे.



फक्त एका तासांत कर्जत ते पनवेल प्रवास

 पनवेल–कर्जत रेल कॉरिडॉर अंतिम टप्प्यात


मार्च 2026 पर्यंत सुरू होणार नवी लाईन !

प्रवाशांचा 30 मिनिटांचा प्रवास वेळ वाचणार

आधुनिक रेल्वे तंत्रज्ञान आणि कनेक्टिव्हिटीच्या नव्या युगाकडे वाटचाल 


कर्जत / राजेंद्र शिवाजी जाधव :- पनवेल ते कर्जत हा प्रवास लवकरच अधिक वेगवान, सोयीस्कर आणि अखंड होणार आहे. कारण पनवेल - कर्जत रेल्वे कॉरिडॉर प्रकल्प आता आपल्या अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. एकूण 2,782 कोटी रुपयांचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प 79 टक्के पूर्ण झाला असून, मार्च 2016 पर्यंत तो जनतेसाठी सुरू केला जाणार आहे, अशी अधिकृत माहिती मिळाली आहे.


* फक्त एक तासात कर्जत - पनवेल प्रवास :- प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर प्रवाशांना सुमारे 30 मिनिटांचा वेळ वाचणार आहे. सध्या पनवेल - कर्जत दरम्यानचा प्रवास साधारण दीड तासांचा असतो, पण या नव्या कॉरिडॉरमुळे प्रवासाचा वेळ फक्त एक तासावर येणार आहे. या रेल्वे लाईनची एकूण लांबी 29.6 किलोमीटर असून पनवेल, चिखले, मोहोपे, चौक आणि कर्जत या पाच प्रमुख स्थानकांवर काम जवळपास पूर्णत्वास आले आहे. प्रवाशांसाठी अत्याधुनिक सुविधा, स्वच्छ प्लॅटफॉर्म, डिजिटल माहिती फलक आणि ऑपरेशनल इमारतींची उभारणी अंतिम टप्प्यात आहे.


* एमयूटीपी-3 अंतर्गत अत्याधुनिक रेल्वे अभियांत्रिकीचा नमुना :- ही संपूर्ण कामगिरी मुंबई शहरी परिवहन प्रकल्प (MUTP-3) अंतर्गत मुंबई रेल्वे विकास महामंडळ (MRVC) द्वारे राबवली जात आहे. सिव्हिल कामांमध्ये रेल्वे फ्लायओव्हर, पुल, बोगदे आणि स्थानकांची नवी रचना करण्यात आली आहे. या प्रकल्पात आधुनिक अभियांत्रिकी तंत्रज्ञानाचा वापर आणि पर्यावरणपूरक डिझाइनला प्राधान्य देण्यात आले आहे. सूत्रांकडून सांगण्यात आले आहे की, फॉरेस्ट क्लीयरन्स प्रक्रियेत पर्यावरणीय परिणाम कमीतकमी ठेवण्यासाठी विशेष काळजी घेण्यात आली आहे.


* पर्यावरणाचा समतोल राखून विकासाची दिशा :- या प्रकल्पात नैसर्गिक अडथळे टाळून रेल्वे मार्ग आखण्यात आला आहे. जंगल क्षेत्रातून जाणाऱ्या भागांमध्ये आवाजरोधक फेन्सिंग आणि पावसाळी जलनिस्सारणाच्या व्यवस्थाही करण्यात आल्या आहेत. पनवेल, मोहोपे आणि कर्जत स्टेशन परिसरात नवीन पार्किंग क्षेत्रे, प्रवासी सुविधा केंद्र आणि बॅरियर-फ्री प्रवेशद्वारे तयार करण्यात आले आहेत.

एमआरव्हीसीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विलास सोपान वाडेकर यांनी सांगितले की, पनवेल - कर्जत उपनगरी रेल कॉरिडॉर हा मुंबई महानगरीय क्षेत्रासाठी नवा श्वास ठरणार आहे. या मार्गामुळे प्रवाशांना कल्याणमार्गाचा पर्याय मिळेल आणि प्रवास वेळेत मोठी बचत होईल. केवळ प्रवास सुलभ होणार नाही, तर रायगड, नवी मुंबई आणि कर्जत परिसरातील आर्थिक गतीही वाढेल.

त्यांनी पुढे सांगितले की, ही रेल्वे लाईन या आर्थिक वर्षातच प्रवाशांसाठी खुली करण्यात येईल. हा प्रकल्प केवळ रेल्वे जोडणी नाही, तर विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात आहे.


* महत्त्वाचे मुद्दे एक नजरेत :-


- प्रकल्प खर्च: ₹ 2, 782 कोटी


- मार्ग लांबी : 29.6 किमी (पनवेल–कर्जत)


- काम पूर्णत्व : 79 %


- अंदाजे उद्घाटन : मार्च 2026


- प्रवास वेळ बचत : 30 मिनिटांपर्यंत


- प्रमुख स्थानके : पनवेल, चिखले, मोहोपे, चौक, कर्जत.





Sunday, October 26, 2025

नगरदेवळ्यात “अल-खिदमत फाउंडेशन”तर्फे 2 नोव्हेंबर रोजी भव्य इज्तेमाई निकाह सोहळा

फाउंडेशनच्या प्रतिनिधींकडून जिल्हा पोलिस अधीक्षक डॉं. महेश्वर रेड्डी यांना विशेष आमंत्रण


नगरदेवळा / फिरोज पिंजारी :- नगरदेवळा येथे येत्या 2 नोव्हेंबर 2025 रोजी “अल-खिदमत फाउंडेशन” या सामाजिक संस्थेच्या वतीने पहिल्यांदाच भव्य इज्तेमाई निकाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याचे आमंत्रण फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतेच जळगाव जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक डॉं. महेश्वर रेड्डी यांना प्रत्यक्ष भेट देऊन दिले. यावेळी सैय्यद अय्याज अली, फरीद खान, सुफियान शेख, अनिस बागवान, दानिश सय्यद, अबरार खान आदी उपस्थित होते.


* धर्म, समाज आणि ऐक्याचा संगम :- “अल-खिदमत फाउंडेशन” ही सामाजिक संस्था समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी विविध सेवा उपक्रम राबवते. आगामी इज्तेमाई निकाह कार्यक्रम हा सामाजिक एकात्मता, साधेपणा आणि मानवी मूल्ये यांचे प्रतिक ठरणार आहे. या कार्यक्रमात एकाच मंचावर अनेक जोडप्यांचे विवाह इस्लामी रीतीने संपन्न होतील.


* सामाजिक जबाबदारीची नवी व्याख्या :- फाउंडेशनचे पदाधिकारी म्हणाले की, आम्ही विवाहासारख्या महत्त्वाच्या सोहळ्याला साधेपणाने साजरा करण्याचा संदेश देत आहोत. समाजातील गरजू तरुण-तरुणींना आर्थिक सहाय्य आणि सामाजिक सन्मान मिळावा, हेच या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. या उपक्रमाद्वारे अल-खिदमत फाउंडेशन विवाहातील खर्च, सामाजिक दिखावा आणि अनावश्यक औपचारिकता कमी करून समाजात “साधेपणा आणि सौहार्द” वाढविण्याचा प्रयत्न करीत आहे.

या कार्यक्रमासाठी भडगाव-पाचोरा आमदार किशोर आप्पा पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख रावसाहेब मनोहर पाटील, जळगांव जिल्हा पोलिस अधीक्षक डॉं. महेश्वर रेड्डी, नगरदेवळा सरपंच प्रतिक्षा किरण काटकर, हिंदुस्तान गॅस एजन्सी संचालक (पाचोरा) हाजी अबुलेस हाजी अल्लाऊदिन शेख, अल-हाज जाकीर अल. लतीफ (मालेगांव), सैय्यद अयाज अली नियाज अली (जळगांव) आदी उपस्थित राहणार आहेत.



फलटण डॉंक्टर तरुणी मृत्यू प्रकरणावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया!

 


कोणताही दोषी असो - प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष, त्याला सोडणार नाही ; पण घटनेचे राजकारण करू नका - देवेंद्र फडणवीस

सातारा / प्रतिनिधी :- फलटण उपजिल्हा रुग्णालयातील तरुण महिला डॉंक्टरच्या आत्महत्येने संपूर्ण राज्य हादरले असून, या प्रकरणाने आता राजकीय वादळाचे रूप घेतले आहे. या घटनेनंतर विरोधकांकडून राज्य सरकार आणि पोलिस प्रशासनावर तीव्र टीका केली जात आहे. दरम्यान, या प्रकरणात भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे नाव जोडले गेल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखेर यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.


मुख्यमंत्र्यांचे आश्वासन - कोणालाही वाचवणार नाही :- मुख्यमंत्री तथा गृहमंत्री फडणवीस म्हणाले की, या प्रकरणात योग्य ती आणि निष्पक्ष चौकशी केली जाईल. कोणीही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष या प्रकरणात सहभागी असल्याचे पुरावे मिळाल्यास, त्याला सोडले जाणार नाही. परंतु, या घटनेचे राजकारण करणे योग्य नाही. त्यांनी पुढे स्पष्ट केले की, विरोधकांकडून या दुर्दैवी घटनेला जाणीवपूर्वक राजकीय रंग दिला जात आहे. आम्ही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, न्याय मिळवण्यासाठी सर्व आवश्यक ती पावले उचलली जातील.


* काय आहे प्रकरण ? :- फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉंक्टरने गेल्या आठवड्यात आत्महत्या केली. तिच्या तळहातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये तिने पोलिस उपनिरीक्षक गोपाल बदने याच्यावर चार वेळा बलात्कार केल्याचा, तर प्रशांत बनकर याच्यावर मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा गंभीर आरोप केला आहे. याशिवाय, तिच्या तक्रारीत भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या स्वीय सहाय्यकांकडून तिच्यावर फिटनेस सर्टिफिकेट देण्यासाठी दबाव टाकण्यात येत असल्याचाही उल्लेख आहे. यामुळे या आत्महत्येच्या प्रकरणाला राजकीय वळण मिळाले असून, विरोधकांनी थेट भाजपवर निशाणा साधला आहे.


* विरोधकांची टीका आणि सत्ताधाऱ्यांची बचावात्मक भूमिका :- शिवसेना (ठाकरे गट) नेते अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषदेत या प्रकरणात माजी खासदारांचा सहभाग असल्याचा दावा करीत, त्यांना सहआरोपी करण्याची मागणी केली आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्रकारांना प्रतिक्रिया देताना सांगितले की, सरकार न्याय देण्यास बांधील आहे. परंतु, या घटनेचा राजकीय वापर होऊ नये, कारण हे एका तरुण जीवाचे दु:खद प्रकरण आहे, असे आवाहन केले.


* तपास निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने होईल :- मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, पोलिस दलावर आमचा पूर्ण विश्वास आहे. फलटण घटनेचा तपास निष्पक्षपणे केला जाईल आणि कोणत्याही राजकीय दबावाला वाव दिला जाणार नाही. राज्य सरकार न्याय देण्यासाठी कटिबद्ध आहे.


* राज्यभरात प्रकरणावर तीव्र चर्चा :- या प्रकरणामुळे सातारा जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात संताप व्यक्त केला जात आहे. डॉंक्टर संघटना, महिला संघटना आणि नागरिकांकडून ‘न्याय मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही’ अशी भूमिका घेतली गेली आहे. तर, भाजपविरोधी पक्षांनी या प्रकरणात राजकीय दबाव आणि सत्तेचा गैरवापर केल्याचे आरोप सुरूच ठेवले आहेत.



Saturday, October 25, 2025

नदी उशाला कोरडं घशाला...सुभाषनगर ग्रामस्थ पाण्याविना त्रस्त!

 


 आठ दिवसांपासून नळ कोरडे ; कर आणि पाणीबिल भरूनही नागरिकांना मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवणाऱ्या नगर परिषद प्रशासनावर ग्रामस्थ संतप्त!

खोपोली / मानसी कांबळे :- खोपोली नगर परिषद हद्दीत येणाऱ्या सुभाषनगर परिसरातील नागरिक गेल्या आठ दिवसांपासून तीव्र पाणीटंचाईने त्रस्त झाले आहेत. “नदी जवळ, टाक्या भरल्या... पण नळ कोरडेच!” अशा शब्दांत रहिवाशांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

* बिल वेळेवर, पण पाणी वेळेवर नाही :- सुभाषनगर मधील रहिवाशांनी पाणी बिल आणि कर वेळेवर भरलेले असतानाही, नियमित पाणीपुरवठा मिळत नसल्याचा आरोप केला आहे. आम्ही प्रामाणिकपणे सर्व कर भरतो, मग आमचे पाणी कुठे जाते ? अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिली.

* नगर परिषदेच्या निष्क्रीयतेवर टीका :- या तक्रारी अनेक वेळा पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांना दिल्या गेल्या, तरीही कोणतीही कारवाई झालेली नाही. कर्मचारी फक्त उडवाउडवीची उत्तरे देतात, ‘उद्या येईल, परवा येईल’ म्हणतात, पण पाणी येत नाही, असे नागरिकांनी सांगितले. नगर परिषदेच्या प्रशासनाला प्रत्येक घराचे पाणी बिल भरले आहे की नाही हे माहीत असते, मात्र कोणत्या भागात पाणी येत नाही हे जाणून घेण्याची प्रशासनाची इच्छाच नाही, अशी तीव्र टीका रहिवाशांनी केली आहे.

प्रत्येक महिन्यात पाणीपुरवठा विस्कळीत :- सुभाषनगरमध्ये महिन्यातून एकदातरी पाणीपुरवठा खंडित होतोच. कधी पंप खराब, कधी वाल्व बंद, तर कधी वीज नसल्याचे कारण देऊन नागरिकांना तहानलेले ठेवले जाते. सुभाषनगरातील नागरिक आता संतापले असून त्यांनी इशारा दिला आहे की, जर पुढील 48 तासांत पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही,तर आम्ही नगरपरिषद कार्यालयासमोर आंदोलन करू असा इशारा दिला आहे.

भारतीय जनता पार्टी धामणी तर्फे दीपावलीच्या औचित्याने भव्य रांगोळी स्पर्धा

 


 35 हून अधिक महिलांचा उत्स्फूर्त सहभाग

सृजनशीलतेचा आणि संस्कृतीचा सुंदर संगम रंगला

खोपोली / खलील सुर्वे :- दिवाळी म्हणजे आनंद, प्रकाश आणि कलात्मकतेचा उत्सव आणि त्याच उत्सवाला अधिक रंगतदार बनवत भारतीय जनता पार्टी धामणी तर्फे भव्य रांगोळी स्पर्धा 2025 चे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेला स्थानिक महिलांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला असून 35 ते 40 महिला सहभागी झाल्या. रांगोळ्यांच्या माध्यमातून पारंपरिकतेसोबतच सामाजिक संदेश देणाऱ्या कल्पक कलाकृती साकारण्यात आल्या आणि संपूर्ण परिसर रंगीबेरंगी सौंदर्याने उजळून निघाला.

सृजनशीलतेचा उत्सव - महिलांचा उत्स्फूर्त सहभाग :- धामणी गावातील महिला कलाकारांनी आपल्या कल्पकतेचा आणि परंपरेचा सुंदर मिलाफ सादर करीत
दिवाळीच्या मंगल वातावरणात रंगांची उधळण केली.
रांगोळ्या केवळ सजावटीपुरत्या मर्यादित न राहता, त्यांनी सामाजिक संदेश, व्यक्तिचित्रे आणि राष्ट्रभक्तीपर थीम्स साकारल्या. रंग म्हणजे भावना आणि रांगोळी म्हणजे त्या भावनांचे कलात्मक प्रदर्शन, असे एका सहभागी महिलेने सांगितले.

महिलांच्या कल्पकतेला मिळाले बक्षीस :- या भव्य रांगोळी स्पर्धेत महिलांनी सादर केलेल्या कलाकृतींमुळे परीक्षकही प्रभावित झाले. 
स्पर्धेतील विजेत्यांची यादी खालीलप्रमाणे -
- प्रथम क्रमांक : वृषाली अक्षय लोते — ₹2000, सन्मानचिन्ह आणि भेटवस्तू
- द्वितीय क्रमांक : सलोनी सुधीर लोते — ₹1500, सन्मानचिन्ह आणि भेटवस्तू
- तृतीय क्रमांक : दिया संतोष महाडिक — ₹1000, सन्मानचिन्ह आणि भेटवस्तू
याशिवाय सर्व सहभागी महिलांना उत्तेजनार्थ प्रमाणपत्रे व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.

 प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस वितरण सोहळा :- या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनानंतर पार पडलेल्या बक्षीस वितरण समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. नीलम लोते (ग्रामपंचायत सदस्या, कुंभिवली), सुजाताई दळवी (भाजप माजी महिला अध्यक्षा), श्वेताताई मनवे (भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा), सुप्रियाताई तटकरे (भाजपा महिला मोर्चा उपाध्यक्षा) यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले.

 रांगोळीमधून उजळली भारतीय परंपरा :- धामणी गावात रंगविलेल्या विविध थीम्सच्या रांगोळ्यांमध्ये “स्वच्छ भारत”, “बेटी बचाओ”, “हरित गाव”, “लक्ष्मीपूजन” यांसारख्या सामाजिक आणि धार्मिक विषयांचा समावेश होता. दिवाळीचा खरा अर्थ म्हणजे एकत्र येऊन सृजनशीलतेचा सण साजरा करणे. या महिलांनी आपल्या कलेद्वारे गावाचे सौंदर्य वाढवले आणि समाजाला संदेश दिला, असे मत आयोजकांनी व्यक्त केले.

भाजप कार्यकर्त्यांचा पुढाकार आणि ग्रामस्थांचा उत्साह :- या कार्यक्रमाच्या आयोजनात धामणी भाजपा कार्यकर्त्यांचा मोठा वाटा होता. ग्रामस्थांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सांस्कृतिक उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला. रांगोळी स्पर्धा ही फक्त स्पर्धा नसून, महिलांच्या कल्पकतेचा उत्सव आहे, असा सूर उपस्थित मान्यवरांच्या भाषणात उमटला.

Friday, October 24, 2025

“बच्चों ने बनाया रायगढ़ किला, पर बगल में लगे बैनर ने भड़काई सियासी बहस!”

रायगढ़ / अमुलकुमार जैन  :- रायगढ़ ज़िले के रोहा तालुका के तळाघर महादेववाड़ी में बच्चों ने अपनी कल्पना और मेहनत से रायगढ़ किले की शानदार प्रतिकृति बनाई है। लेकिन इस किले के ठीक पास मंत्री आदिती तटकरे का बैनर लगने से अब ये कला सियासी चर्चा का केंद्र बन गई है।

‘शिव समर्थ नगर’ इलाके में बच्चों ने बड़ी लगन से रायगढ़ किले की झांकी तैयार की है। इस किले को देखने के लिए लोगों की भारी भीड़ उमड़ रही है। लेकिन बगल में लगा बैनर — जिस पर लिखा है “रायगढ़ किले और ज़िले की रखवाली करने वाली” — अब चर्चा का कारण बना हुआ है।

कुछ लोगों का कहना है कि यह मंत्री आदिती तटकरे के काम का सम्मान है, जबकि दूसरों का कहना है कि “बच्चों की रचनात्मकता में राजनीति को नहीं मिलाना चाहिए।”

एक तरफ बच्चों की कल्पकता ने सबका दिल जीत लिया है, तो दूसरी तरफ उसी किले के पास लगा बैनर रायगढ़ की सियासत में नई हलचल मचा रहा है।

 

“पेहचान प्रोजेक्ट” – आदिवासी समाजाच्या ओळखीचा प्रवास

 


खालापुर कर्जत / सुधीर देशमुख : टाटा स्टील फाऊंडेशन यांच्या उपक्रमा अंतर्गत व अश्वपरीस फाऊंडेशन, खोपोली यांच्या सहकार्याने “पेहचान प्रोजेक्ट” अंतर्गत निशुल्क जात प्रमाणपत्र वितरण व जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे.

या उपक्रमाचा शुभारंभ २३ सप्टेंबर २०२५ रोजी खोपोली येथे करण्यात आला असून, हा प्रकल्प खालापूर तालुक्यातील आदिवासी कुटुंबांना स्वतःची ओळख निर्माण करून देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आला आहे.

या प्रकल्पाचे प्रमुख उद्दिष्टे खालीलप्रमाणे आहेत :

जात प्रमाणपत्राच्या महत्त्वाबाबत जागरूकता निर्माण करणे.,लक्ष्यित कुटुंबांना प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी महसूल विभागाशी समन्वय साधणे., शासनाच्या विविध सेवा व सवलतींचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचवणे., वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणून त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणे., समान हक्क, सन्मान आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश समाजात पोहोचवणे., प्रत्येक घटकाला स्वावलंबी बनवून समाजाच्या प्रगतीसाठी एकत्र आणणे.

या उपक्रमात अश्वपरीस फाऊंडेशनचे कार्यकर्ते गावोगावी व वाड्यावाड्यांत जाऊन आदिवासी समाजाशी संवाद साधत आहेत व त्यांना शासन योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन करत आहेत.

फाऊंडेशनचे ध्येय आहे:-

आदिवासी जात प्रमाणपत्राचे प्रमुख फायदे

1. शिक्षणातील आरक्षण:

शाळा, कॉलेज, विद्यापीठे, आणि सरकारी शिक्षण संस्थांमध्ये प्रवेशासाठी आरक्षण:

प्रवेश प्रक्रियेत व शुल्कात सवलत:

विशेष शिष्यवृत्ती योजना (Scholarships) व शैक्षणिक मदत:

 सरकारी नोकरीत आरक्षण:

केंद्र व राज्य सरकारी नोकर्‍यांमध्ये ७.५% (किंवा राज्यनिहाय) आरक्षण:

स्पर्धा परीक्षांमध्ये अर्ज शुल्कात सवलत किंवा सूट:

पदोन्नतीमध्ये (promotion) काही प्रमाणात आरक्षणाची सुविधा:

गृहनिर्माण व जमीन हक्क:

आदिवासी घरकुल योजना, वनहक्क कायदा (FRA) अंतर्गत जमिनीचा मालकी हक्क.

गावठाण किंवा जंगल भागात स्थायिकतेचा कायदेशीर पुरावा म्हणून वापर.

आर्थिक व स्वयंरोजगार योजना:

लघुउद्योग सुरू करण्यासाठी आर्थिक सहाय्य:

कायदेशीर संरक्षण:

सामाजिक अन्याय किंवा भेदभाव झाल्यास न्याय मिळविण्यास मदत:

राजकीय प्रतिनिधित्व:

आरोग्य व सामाजिक सुविधा:

अशा अनेक सुविधा आदिवासी बांधवाना मिळाव्यात ह्यासाठी टाटा स्टील अग्रेसर आहे.

समाजाप्रती योगदान असावे हि भावना मनात ठेऊन हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी टाटा स्टील फाऊंडेशन सदस्य, अश्वपरीस संस्थापक अध्यक्ष इशिका शेलार, बनिता सहा, सुरेखा नायकर, कार्तिक इटी, सबीना,कुणाल काकडे, जावेद मालदार,परिसा शेलार,मारुती वाघमारे,दिलीप ढाके,विठोबा वाघमारे, गणेश वाघमारे यांच्या सक्रिय सहभागामुळेच “पेहचान प्रोजेक्ट” यशस्वी ठरत आहे आणि या उपक्रमाद्वारे आदिवासी समाजाला नवी ओळख, हक्क आणि सन्मान मिळत आहे.

जोरदार वादळ-पावसाने झोपडी जमीनदोस्त

 


सुदैवाने सर्व कुटुंब वाचले : देवतारी त्याला कोण मारी!* वावंढळ गावातील कातकरी कुटुंबाचा थरारक अनुभव ; नशिबाने वाचला जीव, पण उडाला निवारा

खालापूर / अर्जुन कदम :- खालापूर तालुक्यातील वावंढळ या आदिवासी वस्तीत काल संध्याकाळी आलेल्या अचानक वादळ-पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला. सुरेश बारकू कातकरी यांच्या झोपडीवर वाऱ्याने कहर करत क्षणात ती जमीनदोस्त केली. सुदैवाने कुटुंबातील सदस्य त्या वेळी बाहेर असल्याने मोठी जीवितहानी टळली. मात्र, झोपडी उद्ध्वस्त झाल्याने हे संपूर्ण कुटुंब आता बेघर झाले आहे.

 डोळ्यांसमोर घर कोसळले :- सुरेश बारकू कातकरी यांचे छोटेसे कुटुंब रोजंदारी करून उदरनिर्वाह करते. मोलमजुरीचा दिवस संपवून आई घरी परतली होती. रात्र झाली तशी झोपडीत उकाडा जाणवू लागल्याने ती नातवंडांना घेऊन अंगणात आली. मुले खेळत होती, आजोबा बारकू गणपत कातकरी ओसरीवर बसून त्यांचा खेळ पाहत होते. तेवढ्यातच आकाशात काळेकुट्ट ढग जमले आणि जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाची हजेरी लागली. काही क्षणांतच झोपडी हलू लागली, छपरावरील कौल व ताडपत्री उडू लागली आणि धाडकन आवाज करीत संपूर्ण झोपडी कोसळली.

 देवतारी त्याला कोण मारी :- त्या क्षणी घरातील सर्व जण अंगणात असल्याने चमत्कारिकरीत्या एकाही व्यक्तीचा जीव गेला नाही. मात्र, झोपडीचे लाकूड, चटया, कपडे आणि घरातील थोडाफार संसारपण पावसात भिजून गेला. गावकऱ्यांनी सांगितले की, जर ते घरात असते तर आज मोठे संकट ओढवले असते. देवतारी त्याला कोण मारी म्हणतात, ते खरे ठरले. वादळ आणि पावसाचा जोर कमी झाल्यावर शेजारच्यांनी सर्व कुटुंबाला बाहेर काढून तात्पुरता आसरा शेजाऱ्यांच्या घरात दिला.

 ग्रामपंचायत व महसूल प्रशासनाची तत्काळ दखल :- घटनेची माहिती मिळताच ग्रामपंचायत सदस्य नाना पवार यांनी शासकीय यंत्रणेला त्वरित कळवले. तहसीलदार अभय चव्हाण यांनी पंचनामे करण्याचे आदेश दिले असून मंडळ अधिकारी माणिक सानप व ग्रामसेवक उदय देशमुख यांनी घटनास्थळी भेट देऊन

कुटुंबाला धीर दिला. सध्या हे कुटुंब भावाच्या घरात तात्पुरते राहत आहे. शासनाच्या आपत्ती निवारण निधीतून मदत मिळविण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत.

डोळ्यांत पाणी, पण देवाचे आभार :- सुरेश बारकू कातकरी यांनी सांगितले की, दिवसभर काम करून घरी आलो, मुले अंगणात खेळत होती. झोपडी हलू लागली, आम्ही बाहेर पडलो आणि दोन मिनिटांत सगळे कोसळले. जीव वाचला, तेच आमचं भाग्य.”

गावकऱ्यांनीही तातडीने या कुटुंबाला अन्न, कपडे आणि निवाऱ्याची मदत दिली आहे.

वावंढळ गावातील ही घटना म्हणजे निसर्गाच्या प्रचंड रौद्र रूपासमोर गरीब माणसाची असहायता आणि त्याच वेळी श्रद्धा व नशिबाचा संगम दाखवणारी जिवंत कहाणी आहे. घर गेले, पण जीव वाचला हेच त्यांच्यासाठी सर्वात मोठे सणासारखे सुख आहे.

Thursday, October 23, 2025

शिवाजी जाधव : लोकांमध्ये राहून काम करणारा नेता

 


पत्रकार जाधव यांचा जनसंपर्कातून प्रभाव वाढला

 यशवंतनगर परिसरातील विकासकामांत महत्त्वाची भूमिका

खोपोली / प्रतिनिधी :- खोपोली शहरातील यशवंतनगर व शिळफाटा परिसराचा चेहरा पालटविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या स्थानिक नेत्यांपैकी पत्रकार शिवाजी जाधव यांचे नाव गेल्या काही काळात विशेष चर्चेत आले आहे. समाजकार्य, लोकसंपर्क आणि परिसरातील प्रत्येक समस्येवर थेट काम करणारा नेता म्हणून शिवाजी जाधव यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

परिसरातील रस्ते, गटारे आणि सार्वजनिक सोयीसुविधांच्या कामांत त्यांनी सातत्याने पाठपुरावा करून लोकांपर्यंत विकास पोहोचविण्याचे काम केले आहे.

स्थानिक रहिवासी सांगतात की, शिवाजी जाधव हे आमच्यातलेच आहेत. ते प्रत्येक कार्यक्रमात, सामाजिक उपक्रमात, अगदी लोकांच्या दुःखद प्रसंगातही हजर असतात. लोकांशी त्यांचा संवाद आणि आत्मीयता हीच त्यांची खरी ताकद आहे.

यशवंतनगर परिसरात आज अनेक विकासकामांना गती मिळाली असून, नागरिकांमध्ये “आपल्या भागातील बदलामागे शिवाजी जाधव यांचा मोठा वाटा आहे” अशी चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे, जाधव यांनी कोणतेही राजकीय पद नसतानाही परिसरातील विकासासाठी सातत्याने प्रयत्न करीत राहून लोकांचा विश्वास जिंकला आहे.

दरम्यान, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवाजी जाधव हे प्रभाग क्रमांक 10 मधून उमेदवारी दाखल करणार असल्याची चर्चा आहे. नागरिकांचा वाढता पाठिंबा आणि त्यांच्या प्रामाणिक कामामुळे त्यांची उमेदवारी मजबूत मानली जात आहे. “लोकांमध्ये राहून काम करणारा नेता म्हणजे शिवाजी जाधव,” असे स्थानिक नागरिक कौतुकाने म्हणतात.

परिसरात स्वच्छता, प्रकाश व्यवस्था, रस्ते दुरुस्ती आणि युवकांसाठी रोजगारनिर्मिती यासारख्या विषयांवर काम करण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न सुरू आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे यशवंतनगर परिसरात सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांमध्ये विकासाची नवी आशा जागली आहे.

युवा नेते रुपेश सुधा सुरेश देशमुख खोनपा प्रभाग क्रमांक 10 ( सर्वसाधारण ) मधील प्रबळ दावेदार

 

खोपोली/प्रतिनिधी :- आमदार महेंद्र थोरवे यांचे विश्वासू शिलेदार म्हणून ज्यांना पाहिले जाते असे युवा सैनिक रुपेश सुधा सुरेश देशमुख हे खोपोली नगरपालिका परिषद प्रभाग क्रमांक 10 चे बलाढ्य उमेदवार ठरत आहेत.हसमुख चेहरा, सर्वाना समजुन घेण्याची आकलन शक्ती आणि मदतीसाठी नेहमी तत्पर असणारे रुपेश देशमूख सर्व समाजात आवडते व्यक्तिमत्व असुन युवा वर्गात ते युथ आयकॉन म्हणून ओळखले जातात.रोट्रॅक्ट क्लब ऑफ खोपोलीच्या माध्यमातून सामाजिक कार्य केलेले असल्याने तसेच विविध सामाजिक संस्था मधुन कार्यरत असुन प्रभावी जनसंपर्क असलेले रुपेश देशमुख यांना ऍडमिन कामाची पद्धत चांगल्या प्रकारे अवगत आहे.

कमी तेथे आम्ही या उक्तीप्रमाणे पडद्यामागे मोलाची भूमिका ते नेहमीच बजावतात त्यांच्या दिलदार स्वभावामुळे अल्पवधितच त्यांनी सर्वांची मने जिंकली आहेत. आमदार महेंद्र थोरवे हे रुपेश देशमुख यांच्या चाणक्यनितीने प्रभावीत असुन पक्ष संघटन वाढविण्यात रुपेश देशमुख अग्रस्थानी असतात.

खोपोली शहरातून युवा सेनेच्या माध्यमातून कार्यरत असणारे युवा सेना सचिव रुपेश देशमुख यांच्या कामाचा प्रचंड व्याप पाहता प्रभाग क्रमांक 10 मधुन सर्वसाधारण प्रभागातून त्यांना शिवसेनेच्या उमेदवारीचे भावी नाही तर प्रभावी उमेदवार ठरतील तर युवा वर्गापासून ते ज्येष्ठ व्यक्तीपर्यंत सर्वांच्या मनातील उमदा नगरसेवक हे रुपेश देशमुख ठरतील असा आशावाद निर्माण झाला आहे.

रुपेश देशमुख यांना उमेदवारी जाहीर होणार या बाबीने त्यांना पाठिंबा देण्यासाठी समाजातील सर्च स्तर त्यांना शक्यतोपरी मदत करण्याचे आश्वासन देखील देत असुन वेळप्रसंगी विविध पक्षातील कार्यकऱ्यांनी स्वपक्ष सोडून रुपेश देशमुख यांना निवडून आणण्यासाठी चंग बांधला आहे.

नव्या दमाच्या उमेदीने मतदारसंघातील मरगळ जाऊन मतदारसंघात आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे. राजकारणात समाजकारण, अर्थकारण याची बेजोड जोड असलेले रुपेश देशमुख यांचा थक्क करणारा जीवनप्रवास त्यांना विजयाकडेच नेईल असे विजयी वातावरण मतदारसंघात पहायला मिळत आहे.

दरम्यान आमदार महेंद्र थोरवे सांगतील त्या आदेशाप्रमाणे कार्यरत असणारे रुपेश देशमुख हे सामान्य घरातील व्यक्तिमत्व इतिहास घडविण्यासाठी सज्ज झाल्याचे दिसून येत आहे.

Wednesday, October 22, 2025

आमदार महेंद्र थोरवे यांची राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे साहेब यांची दिवाळी निमित्त सदिच्छा भेट....

 


साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेला सण म्हणजे दिवाळी पाडवा आज दिवाळी पाडव्यानिमित्त शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे साहेब यांना आमदार महेंद्र थोरवे यांनी भेटून मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.


यावेळी आमदार थोरवे म्हणाले कि, साहेबांच्या सहवासात लोकसेवा विकास आणि जनहिताची नवी प्रेरणा मिळाली, दिपावली च्या शुभेच्छा देऊन जनतेच्या मनात असलेल्या अनेक लोकाभिमुख योजना पूर्ण करण्यासाठी सतत कार्यरत आहे ह्याची खात्री करून दिली.

आमदार श्री महेंद्र थोरवे यांच्याकडून आशा वर्कर्सचा दिवाळी सन्मान...

 


आशा वर्कर च्या मानधनाचा विषय येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये मांडणार .... आमदार श्री महेंद्र थोरवे

 खालापुर कर्जत /सुधीर देशमुख :- कर्जत–खालापूर मतदारसंघातील आरोग्य सेवेचा कणा मानल्या जाणाऱ्या आशा वर्कर्सचा दिवाळीनिमित्त आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. आरोग्य क्षेत्रात, विशेषतः कोरोना काळात मोलाची भूमिका बजावणाऱ्या आशा वर्कर्सच्या सेवाभाव आणि निष्ठेबद्दल आमदारांनी कृतज्ञता व्यक्त केली.

या प्रसंगी आमदार थोरवे यांनी प्रत्येक आशा वर्करला मानधन आणि मिठाई देऊन शुभेच्छा दिल्या. “ग्रामीण भागात आरोग्य सेवेसाठी तुम्ही देवदूत आहात. कठीण परिस्थितीतही सेवाभावाने काम करणाऱ्या आशा वर्कर्समुळेच सरकारची आरोग्य व्यवस्था सक्षम राहिली आहे 

आशा वर्कर्सना केवळ अल्प मानधनावर काम करावे लागते, तरीही त्या समाजातील प्रत्येक घटकापर्यंत आरोग्यसेवा पोहोचवतात. या पार्श्वभूमीवर त्यांच्या मानधनवाढीसाठी आणि आवश्यक सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून आरोग्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा सुरू असून येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये मानधनाचा मुद्दा हा सभागृहामध्ये मांडणार असल्याचे सांगितले.

“आपल्या मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाच्या आरोग्याची जबाबदारी या आशा वर्कर्स खांद्यावर घेत आहेत. त्यांच्या निष्ठेचे आणि सेवाभावाचे कौतुक करणे हे आपले कर्तव्य आहे,” असे म्हणत आमदारांनी सर्वांना निरोगी आणि आनंदी जीवनाच्या शुभेच्छा दिल्या.

आशा वर्कर्सच्या सन्मानाचा हा उपक्रम आमदार महेंद्र थोरवे यांच्या संवेदनशील आणि जनहितकारी नेतृत्वाचे उदाहरण ठरला आहे. ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेला बळकटी देणाऱ्या या ‘देवदूतांना’ समाजाचा सलाम, असा सूर या कार्यक्रमात उमटला.

Tuesday, October 21, 2025

धरण लबालब, तरी नळ कोरडेच !


नगरदेवळा ग्रामपंचायतीच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह !

पूरानंतरही पाण्याची टंचाई ; सणासुदीला नागरिकांच्या सहनशक्तीची कसोटी!

नगरदेवळा / प्रतिनिधी :- नगरदेवळा गावाने सप्टेंबर महिन्यात तुफान पावसाचा तडाखा सोसला. ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये अग्नावंती नदीच्या उगमस्थानावर मुसळधार पाऊस झाल्याने धरण अक्षरशः लबालब भरले. मात्र, धरण भरल्याने एकीकडे नदीला दोन वेळा भीषण पूर आला. इतका की मुख्य बाजारपेठेत पाणी शिरले आणि व्यवहार पूर्ण ठप्प झाले. पण आज, त्याच गावात दिवाळीसारख्या सणासुदीतही नागरिकांच्या नळाला कोरडाच प्रतिसाद मिळतोय.

पूराचे भय गेले, पण पाण्याचा तुटवडा कायम :- पूर ओसरल्यानंतर गावकऱ्यांना वाटले की आता तरी नळाला वेळेवर पाणी येईल, पण उलटे घडले. उन्हाळ्यासारखेच आता पावसाळ्यानंतरही 5 ते 10 दिवसांनी नळातून पाणी येते. काही घरांमध्ये तर दोन आठवडे पाणी दिसले नाही. धरण लबालब असूनही गावात पाण्याची टंचाई का निर्माण झाली, हा ग्रामस्थांचा ज्वलंत प्रश्न आहे.

 दिवाळीचा आनंद की त्रास ? :- दिवाळीचा सण, सुट्ट्यांचा काळ- घराघरात माहेरवाशीण मुली, मुंबई-पुणे, नाशिकहून परतलेले मुलगे, नातवंडांचा गोतावळा अशा वातावरणात पाणीपुरवठा कोसळल्याने नागरिक हैराण आहेत. साफसफाई, फराळ तयारी, स्वयंपाक, आंघोळ, कपडे धुणे या सगळ्या गरजांसाठी पाणी आवश्यक असताना ग्रामपंचायतीने पाण्याचे नियोजन न केल्याने सणासुदीचा आनंद त्रासदायक ठरला आहे.

 ग्रामपंचायतीच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह :- धरण आणि विहिरींच्या पाणीपातळीत वाढ असूनही पाणीपुरवठा नियमित न करणे म्हणजे “निसर्गाचा प्रकोप नव्हे, तर प्रशासनाचे अपयश” असाच निष्कर्ष ग्रामस्थ काढत आहेत. सणासुदीत पाण्याचा पुरवठा वाढविणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे, असे नागरिक स्पष्ट सांगतात. “धरण उशाला, पण घसा कोरडा” हीच सध्या नगरदेवळ्याची परिस्थिती आहे.

 गावासाठी दीर्घकालीन उपाययोजना हवी :- ग्रामस्थांच्या चर्चांमध्ये एकच मुद्दा आहे की, अग्नावंती नदी आणि धरण या दोन्हींचा उपयोग जर नीट नियोजनाने झाला, तर नगरदेवळा कधीच दुष्काळी राहणार नाही. धरणाचे खोलीकरण, नदीपात्रात ठिकठिकाणी कोल्हापुरी बंधारे, कृत्रिम तलाव निर्मिती आणि पूरपाण्याचा साठा यासाठी ग्रामपंचायतीने तसेच पंचायत समिती, जिल्हा परिषद, आमदार आणि खासदार यांनी एकत्रित प्रयत्न करावेत, अशी मागणी सर्व स्तरांतून होत आहे.

 विकासाच्या शर्यतीत मागे नगरदेवळा :- आधीच नगरदेवळा विकासाच्या दृष्टीने 15-20 वर्ष मागे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. गावात रस्ते, पाणीपुरवठा आणि सुविधा यांच्या बाबतीत अजूनही मोठी पोकळी आहे. आता तरी प्रशासनाने दीर्घकालीन पाणीपुरवठा नियोजन राबवून गावाला दुष्काळाच्या फेऱ्यातून मुक्त करावे, हीच ग्रामस्थांची मागणी आहे.

धरण भरलं, नदी वाहिली, पण नळ कोरडा", हे नियोजनाचे दिवाळे नाही तर काय ? ज्या गावात पाण्याच्या तुटवड्यामुळे दिवाळी ‘कोरडी’ होते, तिथे विकासाचे चक्र फिरवणार कोण ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.



विनय कदम प्रकरणात केंद्रीय मंत्री डॉं. रामदास आठवले यांचा हस्तक्षेप!

 


तुषार तानाजी कांबळे यांच्या अखंड पाठपुराव्यामुळे नॅशनल इन्शुरन्स कंपनीने दिला न्यायाचा शब्द ;

सात वर्षांच्या प्रतीक्षेनंतर न्याय मिळण्याची आशा

मुंबई / प्रतिनिधी :- विक्रोळी (पूर्व) येथील रहिवासी विनय साहेबराव कदम हे गेल्या सात वर्षांपासून सहानुभूतीच्या नियुक्तीच्या (Compassionate Appointment) प्रकरणात न्याय मिळविण्यासाठी झगडत आहेत. त्यांच्या या सातत्यपूर्ण संघर्षात आता केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉं. रामदास आठवले यांनी थेट हस्तक्षेप केला असून, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) श्रमिक ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश सचिव तुषार तानाजी कांबळे यांच्या अखंड पाठपुराव्यामुळे प्रकरणाला नवा न्यायाचा मार्ग मिळाल्याची चिन्हे आहेत.

सात वर्षांचा संघर्ष आणि प्रशासनाचा मौन प्रतिसाद :- विनय कदम यांच्या मोठ्या भावाचा, स्व. सुधीर साहेबराव कदम यांचा 2 मे 2018 रोजी अपघाती मृत्यू झाला. ते नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड येथे डेप्युटी मॅनेजर पदावर कार्यरत होते. भावाच्या निधनानंतर त्यांच्या वडिलांनी 5 जुलै 2028 रोजी कंपनीकडे विनय कदम यांना सहानुभूती नियुक्तीवर घेण्याची विनंती केली. विनय कदम यांनी 11 नोव्हेंबर 2019 रोजी सर्व आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर केला, मात्र कंपनीकडून वर्षानुवर्षे कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी 15 जुलै 2024 रोजी कंपनीकडून एक पत्र आले, ज्यात त्यांच्या अर्जास वयोमर्यादेच्या कारणावरून नकार देण्यात आला. या पत्रात दाखवलेला नवा शासन निर्णय (GR) विनय कदम यांच्या संशयाचा विषय ठरला, कारण त्यातील तारीख व मजकूर दोन्ही आधी दाखवलेल्या जीआरपेक्षा भिन्न होते.

 कंपनीचा विरोधाभासी GR आणि अनुसूचित जाती आयोगाची कारवाई :- न्याय मिळविण्याच्या प्रयत्नात विनय कदम यांनी 3 मार्च 2025 रोजी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडे तक्रार दाखल केली. आयोगाने 27 मार्च 2025 रोजी कंपनीला स्पष्टीकरण मागवले, मात्र कंपनीने दिलेल्या उत्तरात अनेक विसंगती आढळल्या.

विनय कदम यांनी यावर 9 जून 2025 रोजी प्रतिजवाब दाखल केला आणि या विरोधाभासांचा ठळक उल्लेख केला. आयोगाने 15 ऑगस्ट 2025 रोजी कंपनीला ३० दिवसांच्या आत सविस्तर उत्तर सादर करण्याचे आदेश दिले. परंतु, सर्वांच्या धक्क्यासाठी, 1 सप्टेंबर 2025 रोजी आयोगाने उत्तर न मिळताच प्रकरण बंद केले.

 तुषार तानाजी कांबळे यांचा ठाम आणि लढाऊ पुढाकार :- या अन्यायाची माहिती तुषार तानाजी कांबळे यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तात्काळ पुढाकार घेतला. प्रकरणाची गंभीरता ओळखून त्यांनी थेट केंद्रीय मंत्री डॉं. रामदास आठवले यांच्याशी संपर्क साधला. ना. आठवले यांनी नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (मुंबई कार्यालय) चे चीफ बिझनेस मॅनेजर उदयकुमार महानती यांना दूरध्वनीवरून सूचना देत “विनय कदम यांना योग्य तो न्याय देण्यात यावा” असे स्पष्ट आदेश दिले.

यानंतर तुषार कांबळे यांनी स्वतः कंपनीच्या मुंबई कार्यालयात जाऊन उदयकुमार महानती यांची प्रत्यक्ष भेट घेतली. त्यांनी सांगितले की हे प्रकरण त्यांच्या अधिकारात नसून कोलकाता मुख्यालयाच्या अखत्यारीत येते.श्र क्षणाचाही विलंब न करता तुषार कांबळे यांनी केंद्रीय मंत्री आठवले यांचे पत्र घेऊन थेट कोलकात्याला धाव घेतली.

 कोलकात्यातील उच्चस्तरीय बैठक - न्यायाचा शब्द मिळाला :- नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या मुख्यालयात (न्यू टाऊन, कोलकाता) तुषार कांबळे यांनी जनरल मॅनेजर अमित सतीश आणि एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर श्रीदेवी नायर यांची भेट घेतली. त्यांनी मंत्री महोदयांचे अधिकृत पत्र सादर करून संपूर्ण प्रकरण सविस्तर मांडले. कंपनीने जारी केलेल्या जीआरमधील विसंगतींचे पुरावे दाखवून “विनय कदम यांना न्याय मिळालाच पाहिजे” अशी ठाम मागणी केली. या बैठकीत दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी “प्रकरणाची सखोल चौकशी करून न्याय्य निर्णय घेण्यात येईल” असे आश्वासन दिले.

तुषार तानाजी कांबळे यांनी या संदर्भात सांगितले की, मी विनय कदम यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय गप्प बसणार नाही. न्याय मिळेपर्यंत ही लढाई मी चालू ठेवणार आहे. त्यांच्या या ठाम भूमिकेमुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

 न्यायासाठीचा संघर्ष आणि सामाजिक नेतृत्वाचा नवा आदर्श :- या प्रकरणाने एक गोष्ट पुन्हा अधोरेखित केली आहे की, संवेदनशील नेतृत्व आणि प्रामाणिक प्रयत्न असतील तर न्याय मिळतोच. केंद्रीय मंत्री डॉं. रामदास आठवले यांच्या सहानुभूतीपूर्ण हस्तक्षेपामुळे आणि तुषार तानाजी कांबळे यांच्या अथक, जबाबदार आणि लढाऊ भूमिकेमुळे विनय कदम प्रकरणात न्याय मिळण्याची आशा आता अधिक बळकट झाली आहे.



Monday, October 20, 2025

सौ. शिल्पा कैलास पाटील यांना रायगड जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त

 

खालापुर कर्जत/सुधीर देशमुख :- अलिबाग – रायगड जिल्हा परिषदेच्या नारंगी तोंडली केंद्र शाळेच्या केंद्रीय मुख्याध्यापक सौ. शिल्पा कैलास पाटील यांना “आदर्श शिक्षक सन्मान २०२३-२४” पुरस्काराने कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले व आदिती ताई तटकरे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. हा सन्मान सोहळा सोमवार, दिनांक १३ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी २.३० वा. RCF हॉल, कुरूळ, अलिबाग येथे संपन्न झाला.

सौ. शिल्पा कैलास पाटील यांनी आपल्या शिक्षक कारकिर्दीची सुरुवात राजीप शाळा चांभार्ली येथून केली. आठ वर्षे त्यांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासावर भर देत उल्लेखनीय काम केले. त्यानंतरच्या बारा वर्षांच्या काळात त्यांनी राजिप शाळा होराळे येथे कार्यरत राहून आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी विशेष प्रयत्न केले. सलग तीन वर्षे शाळेचा शंभर टक्के शिष्यवृत्ती निकाल लावण्याचा मान त्यांच्या नेतृत्वाखाली शाळेला मिळाला.

मुख्याध्यापक म्हणून काम करत असताना शाळेच्या विविध क्षेत्रांतील उत्कृष्ट कामगिरीमुळे अनेक पुरस्कार मिळवले. 

सन २०२३ पासून त्यांनी केंद्रीय मुख्याध्यापक म्हणून नारंगी तोंडली केंद्र शाळेचा पदभार स्वीकारला. ग्रामपंचायत व परिसरातील कारखान्यांच्या सहकार्याने अनेक शैक्षणिक साधनसामग्री देणगी स्वरूपात मिळवून शाळेचा प्रचंड कायापालट केला.

त्यांच्या नेतृत्वाखाली शाळेने “माजी मुख्यमंत्री सुंदर शाळा स्पर्धेत” तालुक्यात द्वितीय क्रमांक मिळवून रोख दोन लाख रुपयांचे बक्षीस प्राप्त केले. तसेच “परिसर भाग” उपक्रमात तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवण्याचा मान शाळेने पटकावला.

आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न करून अनेक विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवून दिले. या सर्व कार्यामागे त्यांच्या कुटुंबीयांचे तसेच आदर्श शिक्षक माजी मुख्याध्यापक कै. अर्जुन कानू पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि प्रेरणा लाभली.

तसेच सौ. शिल्पा कैलास पाटील यांना त्यांच्या सहकारी शिक्षकवृंदांचे वेळोवेळी सहकार्य आणि पाठबळ मिळत राहिले, हे त्यांनी कृतज्ञतेने नमूद केले.

सौ. शिल्पा पाटील यांचा हा सन्मान त्यांच्या समर्पित कार्याची आणि शिक्षण क्षेत्रातील योगदानाची खरी पावती ठरला आहे.

खोपोली नगर परिषदेत ‘महासामना’ रंगणार !

 

 शिवसेना, राष्ट्रवादी, भाजप, महाविकास आघाडी - सगळेच रिंगणात

उमेदवारीच्या स्पर्धेत ‘कौन कुणाचा, आणि कुणाचा कोण?’

खोपोली / फिरोज पिंजारी :- खोपोली नगर परिषद निवडणुकीचा बिगुल वाजला आहे आणि शहरात राजकीय तापमान चांगलेच चढले आहे. नगराध्यक्ष पद सर्वसाधारण असल्याने इच्छुकांची रांग एवढी लांब झाली की, उमेदवार ठरवणे म्हणजे आता निवडणुकीपूर्वीचे युद्ध ... असे स्थानिक राजकीय वर्तुळात म्हटले जात आहे.

एकीकडे शिवसेना शिंदे गट, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, भाजप आणि महाविकास आघाडी अशा सगळ्याच गटांनी आपल्या घोडदौडीला सुरुवात केली आहे.

कौन कुणाचा आणि कुणाचा कोण ? :- शिवसेना शिंदे गटात उमेदवारीसाठी चुरस तीव्र झाली आहे. माजी उपनगराध्यक्ष कुलदीपक शेंडे, माजी उपनगराध्यक्ष राजू गायकवाड, वैद्यकीय आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉं. शेखर जांभळे ही नावे जोरदार चर्चेत आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून माजी नगराध्यक्ष डॉं. सुनील पाटील, माजी नगराध्यक्ष दत्तात्रेय मसुरकर, गटनेते मंगेश दळवी ही नावे चर्चेत आहेत. भाजपकडून युवा नेते विक्रम साबळे आणि अश्विनीताई पाटील या दोघांमध्ये स्पर्धा रंगली आहे.

महाविकास आघाडी अजूनही शांत आहे, पण शांततेच्या मागे वादळ दडलेले असते, हे राजकारणात सर्वश्रुत आहे. काँग्रेस, शिवसेना (उद्धव ठाकरे गट), राष्ट्रवादी (शरद पवार गट), शेतकरी कामगार पक्ष (शेकाप), आम आदमी पार्टी (आप), रिपाई (आठवले), वंचित बहुजन आघाडी सगळ्यांचे राजकारणी सध्या फक्त फोनवर आणि मांडवात आहेत.

 एकच शहर, दोन शिवसेना - राजकीय नाटकाचा पहिला अंक सुरू :- राजकीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आमदार महेंद्र थोरवे यांच्या शिवसेनेने कुलदीपक शेंडे यांना उमेदवारी दिल्यास डॉं. शेखर जांभळे हे दुसऱ्या शिवसेनेत म्हणजेच महाविकास आघाडीकडून उमेदवार होऊ शकतात, अशी चर्चा आहे. 

म्हणजेच एकाच शहरात दोन शिवसेना - एक अधिकृत, एक आघाडीवाली!

दरम्यान, राष्ट्रवादीचे सुधाकर घारे आणि भाजपचे विक्रम साबळे यांनीही आपापले तंबू ताणले आहेत. “मलाच उमेदवारी हवी!” असा आवाज सध्या प्रत्येक पक्षाच्या दालनात घुमतोय.

 कुणाच्या गळ्यात माळ टाकावी ? पक्षश्रेष्ठींचीही चक्रावलेली अवस्था :- राजकीय पातळीवर सगळेच इच्छुक नेते पक्षश्रेष्ठींना भेटीगाठी घेत आहेत. कोणी स्वतःला पक्षनिष्ठ मनवतो, तर कोणी समाजसेवक म्हणून पुढे सरसावतो. पक्षश्रेष्ठींची मात्र अवस्था बिचारी...गळ्यात कोणाची माळ टाकावी ? हा प्रश्न त्यांच्याही चेहऱ्यावर स्पष्ट दिसतोय.

चौरंगी नाही, आता पचरंगी लढत रंगण्याची चिन्हे :- या सगळ्या गदारोळात, खोपोली नगर परिषद निवडणूक चौरंगी नव्हे तर पचरंगी होण्याची चिन्हे स्पष्ट आहेत. आमदार महेंद्र थोरवे यांची शिवसेना, सुधाकर घारे यांची राष्ट्रवादी, विक्रम साबळे यांची भाजपा, महाविकास आघाडीचा उमेदवार आणि स्वतंत्र लढतीला सज्ज असलेले डॉं. शेखर जांभळे...या सर्वांमध्ये “महासामना” रंगण्याची तयारी सुरू आहे.

निवडणूक नाही, राजकीय महाभारत :- स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, खोपोलीत निवडणूक नव्हे, महाभारतच सुरू झाले आहे. प्रत्येकजण अर्ज घेऊन फिरतोय आणि म्हणतोय - मीच उमेदवार! दरम्यान, शहरात गट, उपगट, छुपी आघाड्या आणि गुप्त बैठका यांचा खेळ जोमात आहे. उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतरच ‘कोण कुणाचा आणि कुणाचा कोण?’ हा खरा खेळ समोर येईल.