Saturday, August 30, 2025

रायगड मित्र मंडळ प्रणित रायगड ग्रुप यशवंत नगर येथे गणेशोत्सव

 

खोपोली / मानसी कांबळे :- गणपती ही संघटनेची देवता आहे. ऋग्वेदात ब्रह्मणस्पती देवतेची स्तुती केलेली आहे. तो सर्व गणांचा अधिपती आहे, असे त्यात म्हटले आहे. भाद्रपद शुक्ल चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत महाराष्ट्रात गणेशोत्सव साजरा होत असतो. दरवर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षी सुद्धा 27 ऑगस्ट 2025 ते 2 सप्टेंबर 2025 रोजी लाडक्या बाप्पाचे आगमन झाले असून रायगड मित्र मंडळ प्रणित रायगड ग्रुप यशवंत नगर येथे 27 ऑगस्ट 2025 रोजी ढोलताशाच्या गजरात गणपतीचे आगमन झाले. गणेश चतुर्थीला गणेशाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. श्री गणेशाच्या प्रतिष्ठापना विधीमध्ये पार्थिव मूर्तीचे स्नान, अभिषेक, वस्त्र, चंदन, फुले, पत्री, नैवेद्य आदी सोळा उपचारांनी पूजा केली. यशवंत नगर परिसर तसेच आजुबाजुच्या परिसरातील भाविक गणपतीच्या दर्शनासाठी येत आहेत.

या गणेशोत्सवाला माजी नगरसेवक आनंद नायडू, मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत आठवले, उपाध्यक्ष संतोष नायडू, सनी पुजारी, सूरज परदेशी, प्रकाश मचकुरे, सुजल गायकवाड, भीमा मचकुरे, इरफान शेख, तुषार साळुंखे, उस्मान शेख, सतीश साळुंखे, निखिल शितोळे, ओंकार पवार, सत्यम गिरी, गणेश गोसावी, ऋषिकेश लोखंडे, फैयाज खंडुलवाले, संजय कुमावत, शंकर पवार, शिवा पुजारी, राहुल पालांडे, समीर मचकुरे, अशपाक शेख, अंज्या दोडमणी, रवी दोडमणी, निलेश परदेशी यांनी आयोजन केले असून त्यासाठी संपूर्ण टीम मेहनत घेत आहे. भाविकांनी जास्तीत जास्त संख्येने लाडक्या बाप्पाच्या दर्शनास येण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.





श्रीपत सूर्यवंशी शिळफाटा खोपोली येथे गणरायाचे आगमन

 

खोपोली /मानसी कांबळे :- गणपती ही संघटनेची देवता आहे. ऋग्वेदात ब्रह्मणस्पती देवतेची स्तुती केलेली आहे. तो सर्व गणांचा अधिपती आहे, असे त्यात म्हटले आहे. भाद्रपद शुक्ल चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत महाराष्ट्रात गणेशोत्सव साजरा होत असतो. दरवर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षी सुद्धा 27 ऑगस्ट 2025  ते 2 सप्टेंबर 2025 रोजी लाडक्या बाप्पाचे आगमन झाले असुन शिळफाटा नवनाथ कॉलनी येथे श्रीपत गणपत सुर्यवंशी, संतोष श्रीपत सूर्यवंशी यांच्या घरी 27 ऑगस्ट 2025 रोजी ढोलताशाच्या गजरात गणपतीचे आगमन झाले. गणेश चतुर्थीला गणेशाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. श्री गणेशाच्या प्रतिष्ठापना विधीमध्ये पार्थिव मूर्तीचे स्नान, अभिषेक, वस्त्र, चंदन, फुले, पत्री, नैवेद्य आदी सोळा उपचारांनी पूजा केली. यशवंत नगर परिसर तसेच आजुबाजुच्या परिसरातील भाविक गणपतीच्या दर्शनासाठी येत आहेत.

यावेळी गणेश चतुर्थीला गणेशाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. श्री गणेशाच्या प्रतिष्ठापना विधीमध्ये पार्थिव मूर्तीचे स्नान, अभिषेक, वस्त्र, चंदन, फुले, पत्री, नैवेद्य आदी सोळा उपचारांनी पूजा करून मोदकाचा नैवेद्य देण्यात आला. आरती घेऊन आलेल्या लोकांना महाप्रसाद देण्यात आला. श्रीपत गणपत सूर्यवंशी, संतोष श्रीपत सूर्यवंशी, भावना संतोष नायडू सूर्यवंशी लाडक्या बाप्पाच्या दर्शनास येण्याचे आवाहन केले आहे.

Friday, August 29, 2025

भारतीय जनता पार्टीच्या कामगार आघाडीच्या तालुका उपाध्यक्षपदी स्वप्नील फराट यांची नियुक्ती

 

खालापुर/ दिपक जगताप :- भारतीय जनता पार्टी खालापुर तालुका पूर्व मंडळात विविध पदाधिकाऱ्यांची नवनियुक्ती जाहीर करण्यात आले असता यामध्ये ओबीसी मोर्चा खालापूर तालुका, कामगार आघाडी खालापूर तालुका व ट्रान्सपोर्ट आघाडी खालापूर तालुका याची नवी कार्यकारणी जाहीर करण्यात आल्याने नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

       भाजपाचे नेते तथा आमदार प्रशांत ठाकूर, भाजपा जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी व खालापूर तालुका अध्यक्ष सनी यादव यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच ओबीसी मोर्चा खालापुर तालुका अध्यक्ष भरत महाडिक यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी मोर्चाच्या तालुका सरचिटणीसपदी महेश निरगुलकर, उपाध्यक्ष दिनेश  जंगम, उपाध्यक्ष योगेश महाडिक, चिटणीस रोणित म्हात्रे चिटणीस भगवान गणेशकर, कोषाध्यक्ष रोहित बोरीटकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर कामगार आघाडीचे तालुका अध्यक्ष निलेश साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली कामगार आघाडीच्या तालुका उपाध्यक्षपदी मोहन घाडगे व स्वप्नील फराट यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Thursday, August 28, 2025

आंदोलक नवी मुंबईत दाखल होण्यास सुरुवात

 


मराठा आंदोलन : एपीएमसीत मुक्कामाची सोय

 महापालिका-सिडकोकडून अद्याप सहकार्य नाही

वाहनांमुळे खोपोली व खालापुरात वाहतूक कोंडी 

खोपोली / मानसी कांबळे :- मराठा आरक्षणासाठी आंदोलनाची भूमिका ठाम ठेवत मनोज जरांगे पाटील आणि आंदोलनकर्ते मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. राज्यभरातून लाखो मराठ्यांनी त्यांना पाठींबा दिला असून अनेकजण या आंदोलनात सहभागी होताना दिसत आहेत. शुक्रवार, 29 ऑगस्ट रोजी आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील बेमुदत आंदोलनाला सुरुवात करणार आहेत. त्यांचा ताफा लवकरच मुंबईत पोहचणार आहे. आंदोलक खोपोली, खालापूर मार्गे नवी मुंबई व मुंबईत प्रवेश करीत आहेत.

हजारों मराठा आंदोलक बोरघाटातून खोपोलीत उतरल्याने खोपोली शहर व शिळफाटा येथे काही प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. सकल मराठा मोर्चाच्या निमित्ताने वाहतुकीचे नियोजनाचे अवलोकन करण्यासाठी खालापूर तालुक्याचे तहसीलदार अभय चव्हाण, निवासी नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांच्यासमवेत खोपोलीचे पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांनी दौरा केला होता. तसेच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर खालापूर उपविभागीय पोलिस अधिकारी डॉं. विशाल नेहूल यांच्या मार्गदर्शनाखाली खोपोली पोलिस निरीक्षक सचिन हिरे, खालापूर पोलिस निरीक्षक सचिन पवार, रसायनी पोलिस निरीक्षक संजय बांगर आदींनी वाहतूक व कायदा सुव्यवस्थेची काळजी घेतली.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरातून निघालेल्या आंदोलनकर्त्यांचा लोंढा नवी मुंबईमार्गे मुंबईकडे रवाना होणार आहे. गुरुवार, २८ ऑगस्ट मध्यरात्रीपासून आंदोलक नवी मुंबईत दाखल होऊ लागले असून, शुक्रवारी पहाटेपर्यंत मोठ्या संख्येने आंदोलनकर्ते येण्याची शक्यता आहे. या सर्व आंदोलनकर्त्यांच्या राहण्या-जेवणाची जबाबदारी सकल मराठा समाजाने स्विकारली आहे. वाशी एपीएमसी कांदा-बटाटा बाजार परिसरातील लिलाव गृहात मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली असून येथे जेवण, न्याहारी, पाणी आणि स्नानगृहाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. याकरीता एपीएमसी प्रशासन आणि पोलिस यंत्रणेकडून सहकार्य मिळत आहे. मात्र नवी मुंबई महानगरपालिका आणि सिडको प्रशासनाकडून अद्याप कोणतेही सहकार्य न मिळाल्याने सकल मराठा समाजाकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. 

मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील आझाद मैदानावरील आंदोलनाला मुंबई पोलिसांनी सशर्त परवानगी दिली आहे. त्यामुळे मराठवाडा, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातून आंदोलक मोठ्या संख्येने नवी मुंबईत दाखल होत आहेत. समाजमाध्यमांच्या माध्यमातून आंदोलक आपला प्रवास, हवामान, वाहतूक कोंडी आदी माहिती सतत शेअर करीत असून, कितीही अडचणी आल्या तरी मुंबई गाठणारच, असा उत्साह आंदोलनकर्त्यांमध्ये दिसून येत आहे.

Monday, August 25, 2025

सौ.आश्विनी खंडागळे ठरल्या पहिल्या आगळ्यावेगळ्या वाढदिवसाच्या पैठणी विजेत्या..

 

खोपोलीत महिलांसाठी अनोखा उपक्रम : पाताळगंगा नदी पूजनासह एकत्रित वाढदिवस सोहळा संपन्न.

खालापूर/दिपक जगताप :- सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात अग्रेसर असलेल्या सहज सेवा फाउंडेशन तर्फे खोपोली येथे शनिवार दिनांक 23 ऑगस्ट 2025 रोजी महिलांसाठी आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला. दर महिन्याला वाढदिवस असणाऱ्या महिलांचा पाताळगंगा नदीकिनारी नदी पुजन व आरतीनंतर सामूहिक वाढदिवस सोहळा साजरा करण्यात आला.सुरुवातीस सामूहिक नदी पूजन व आरती करण्यात आली. यानंतर ऑगस्ट महिन्यात वाढदिवस असणाऱ्या महिलांना सौ. रेखा भालेराव यांच्या हस्ते औक्षण करण्यात आले. ऑगस्ट महिन्यात वाढदिवस असणाऱ्या महिलांचा सामूहिक केक कापून आनंद साजरा करण्यात आला.यावेळी लकी ड्रॉ द्वारे काढलेल्या ड्रॉ मध्ये आश्विनी खंडागळे या विजेत्या ठरल्या.विजेत्या महिलेस खोपोली नगरपालिकेच्या मा.नगरसेविका निर्मला शेलार यांच्या हस्ते पैठणी बक्षीस म्हणून देण्यात आली.

महिलांच्या सामाजिक सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी या उपक्रमाची आखणी करण्यात आली असून, सहज सेवा फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी व सहभागी सर्वांनी या नवीन प्रयोगाबाबत उत्साह व्यक्त केला आहे.

या उपक्रमासाठी सहज सेवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ.शेखर जांभळे,सचिव अखिलेश पाटील,खजिनदार संतोष गायकर, खालापूर तालुका अध्यक्ष मोहन केदार,महिला अध्यक्षा निलम पाटील,सह सचिव नम्रता परदेशी,युवा अध्यक्षा सागरिका जांभळे आणि मार्गदर्शिका सीमा त्रिपाठी तसेच दमयंती कोळी,मनीषा नरांगळे,हरजिंदरकौर धंजल,प्रविणा बुटाला,वेदा साखरे,मुस्कान सय्यद,अंजली शर्मा,संगिता शुक्ला,रेखा भालेराव,सुनील घावटे यांनी अथक सक्रिय मेहनत घेतली.

या उपक्रमातील लकी ड्रॉसाठी पैठणी साडी प्रायोजक म्हणून द्वारकाधीश साडी सेंटर, शीळफाटा यांचे सहकार्य लाभले असून, वाढदिवस केकसाठी द केक शॉप, खोपोली (संचालिका शिल्पा भाविक शेडगे) यांचे योगदान आहे.

दर महिन्याला नदी पूजन व आरती सोबत खालापूर तालुक्यातील महिलांचा सामूहिक वाढदिवस या माध्यमातून साजरा होणार असल्याने या अभिनव उपक्रमात स्थानिक पातळीवर महिलांनी मोठ्या प्रमाणात भाग घ्यावा असे आवाहन सहज सेवा फाउंडेशनच्या महिला अध्यक्षा निलम पाटील व मार्गदर्शक सीमा त्रिपाठी यांनी केले आहे.

सालवड येथे विज वाहिनी कोसळून चिमुकल्याचा मृत्यू

 


जबाबदार अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी 

कर्जत तालुका विज ग्राहक संघर्ष समिती व शिवसेना ठाकरे गटाचा आंदोलनाचा इशारा 

 कर्जत/नरेश जाधव :- कर्जत तालुक्यातील सालवड गावात दि.२४ ऑगस्ट २०२५ रोजी विज वाहिनी अंगावर पडून केवळ ९ वर्षांच्या शिव रुपेश भोसले या निरागस चिमुकल्याचा मृत्यू झाला आणि संपूर्ण तालुक्यात संतापाचा भडका उडाला. गावकऱ्यांनी ही दुर्घटना केवळ अपघात नसून महावितरणच्या निष्काळजीपणाचे थेट परिणाम असल्याचे ठासून सांगितले आहे. दोन दिवसांपूर्वीच विज वाहिनीची दुरुस्ती झाली असताना थातुरमातुर व निष्काळजी कामामुळेच हा बळी गेला असून यासाठी असिस्टंट इंजिनिअर सिंग थेट जबाबदार आहेत, असा रोष व्यक्त करण्यात आला आहे. मात्र इतक्या गंभीर घटनेनंतरही पोलीस प्रशासनाने केवळ एडीआर दाखल करून मामला दडपण्याचा प्रयत्न केल्याने नागरिकांचा संताप आणखी भडकला आहे.

       सोमवार, दि.२५ ऑगस्ट रोजी कर्जत तालुका विज ग्राहक संघर्ष समिती व शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने कर्जत पोलीस ठाण्यावर धडक देत वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले तसेच महावितरणचे उपकार्यकारी अभियंता चंद्रकांत केंद्रे यांना निवेदन सादर केले. या निवेदनात असिस्टंट इंजिनिअर सिंग तसेच ठेकेदार यांच्यावर तातडीने सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. यासोबतच मृत बालकाच्या कुटुंबाला शासनाच्या परिपत्रकानुसार २० लाख रुपयांची नुकसानभरपाई त्वरित देण्यात यावी तसेच तालुक्यातील जीर्ण अवस्थेत असलेल्या विज तारा, पोल व उपकरणे एका महिन्याच्या आत बदलण्यात यावीत, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.

      निवेदनात पुढे स्पष्ट करण्यात आले आहे की, ऑगस्ट २०२४ मध्ये विज ग्राहक संघर्ष समितीने आठ दिवस साखळी उपोषण करून या मागण्या मांडल्या होत्या. त्यानंतरही वेळोवेळी निवेदने देण्यात आली, परंतु महावितरणने कोणतेही पाऊल उचलले नाही. हा निष्काळजीपणा आणि ढिलाई आज एका चिमुकल्याच्या मृत्यूचे कारण ठरला असून याला महावितरणच जबाबदार आहे. गेल्या काही महिन्यांत विजेचा शॉक लागून नागरिक आणि जनावरे मृत्युमुखी पडले असून, अशा सर्वांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणीही या निवेदनातून करण्यात आली आहे.

       कार्यकर्त्यांनी इशारा दिला आहे की, एका महिन्यात या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर तीव्र आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल आणि त्यातून उद्भवणाऱ्या कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नास पोलीस प्रशासन व महावितरण पूर्णपणे जबाबदार असेल. या निवेदनावेळी विज ग्राहक संघर्ष समितीचे सदस्य, सालवड ग्रामस्थ तसेच शिवसेना ठाकरे गटाचे नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते. यामध्ये ॲड. कैलास मोरे, रंजन दातार, प्रशांत सदावर्ते, अमिर मणियार, सतिश मुसळे, संजय कर्णिक, प्रशांत उगले, मुकुंद भागवत, नरेश जाधव, प्रभाकर गंगावणे, जगदिश दगडे, कैलास म्हामले, शरद वावळ, आशिष कोल्हे, पुंडलिक (बंधु) पाटील, रमेश कदम, आरिल मुजावर, हेमंत सुरावकर, अनिल भोसले, बाबु घारे, नितिन सावंत, विनोद पांडे, संतोष पाटील, बाजीराव दळवी, उत्तम कोळंबे आदींचा समावेश होता.

Sunday, August 24, 2025

फिट इंडिया मोहिमेंतर्गत कर्जत खालापूर रस्त्यावर सायकलथॉनमध्ये शेकडो सायकलपटूंचा सहभाग.

 


रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षिका आंचल दलाल यांनी स्पर्धेला दाखवला हिरवा झेंडा. 

खालापूर/ दिपक जगताप :- भारत सरकारच्या निर्देशानुसार व फिट इंडिया मोहिमेअंतर्गत रायगड जिल्हा पोलीस आयोजित सायकलथॉन 2025 चे आयोजन खालापूर तालुका पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून करण्यात आले. या अभूतपूर्व अशा सायकल स्पर्धेच्या उद्घाटनानिमित्त रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षिका श्रीमती आंचलदलाल यांची विशेष उपस्थिती होती. पळस दरी ते हॉलिडे बँक्वेट हॉल अंजरूण या दरम्याच्या दहा किलोमीटर एवढ्या अंतराच्या स्पर्धेस त्यांनी हिरवा झेंडा दाखवला. 

सायकल इंडियाचे सायकल पटू, हौशी सायकल पटू, पोलिस अधिकारी आणि कर्मचारी, होमगार्ड, विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी यांचा शेकडोच्या सहभागातून सायकलथॉन स्पर्धेचा उत्साह ओसंडून वाहत होता. 

खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झालेल्या सायकलथॉन स्पर्धेत अविनाश पोळ यांनी 20.22 सेकंदात दहा किलोमीटरचे अंतर पार करून प्रथम क्रमांक मिळवला तर अनुक्रमे आर्यन सणस आणि विश्वजित पाटील यांनी काही सेकंदाच्या फरकाने दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला. त्यांचे कौतुक आणि अभिनंदन करण्यात आले त्याच बरोबर वय वर्ष 6 ते 60 पेक्षा अधिक वयाच्या सायकलपटूंनी स्पर्धेत चुरस दाखविल्याबद्दल सर्वांना प्रशस्तीपत्रक देण्यात आले. 

खालापूर तालुक्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल मेहुल, कर्जत तालुक्याचे उप विभागीय पोलीस अधिकारी राहुल गायकवाड, निवासी उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी नारनवर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन पवार - खालापूर, सचिन हिरे - खोपोली, संजय बांगर - रसायनी, संदीप भोसले - कर्जत, सरिता चव्हाण - अलिबाग हॉलिडे बँक्वेट हॉलचे मालक अब्दुल अजीज बारुदगर, अझीम कर्जीकर, यांनी सायकलथॉन स्पर्धेच्या आयोजनात विशेष भूमिका बजावली. हेल्प फाउंडेशन, सायकल इंडिया, यशवंती हायकर्स, खोपोली व्यापारी असोसिएशन, करियर कोचिंग क्लासेस इत्यादी संस्थांचा यावेळी सन्मान करण्यात आला. 

प्रसिद्ध अशा रायगड पोलिस दलाच्या बँड कलाकारांनी सादर केलेल्या संगीताच्या पार्श्वभूमीवर, जगदीश मरागजे यांच्या सूत्र संचलनाच्या साथीने हॉलिडे बँक्वेट हॉलमध्ये विविध मान्यवरांच्या उपस्थितीत समारोपाचा कार्यक्रम संपन्न झाला. सुसज्जय यंत्रणा, शिस्तबद्ध आयोजन आणि उस्फुर्त सहभागाने सायकलथॉन स्पर्धेस विशेष दर्जा प्राप्त झाल्याची भावना पोलीस अधीक्षिका आंचल दलाल यांनी व्यक्त केली.

कोट्यावधींचा खर्च तरी शहरात स्वच्छतेची बोंबाबोंब ?

 


 रिकाम्या तळ्यात, कचऱ्याचा साठा...बहिरा म्हणतो वार्ता काय, आंधळा म्हणतो नाचते गाय...खोपोली शहरात नक्की चाललंय तरी काय ?

खोपोली / खलील सुर्वे :- खोपोली शहरात समस्यांचा डोंगर उभा आहे...कचरा, पाणी, खड्डे, अस्वच्छता आणि बेसुमार भष्ट्राचार, अशा परिस्थितीत मुख्याधिकारी रायगड जिल्ह्यातील' बेस्ट सिओ' ठरले आहेत. नेमका पुरस्कार मिळाला कसा... पुरस्कार देतांना कोणत्या कामाचे मोजमाप झाले आणि पुरस्कार घ्यायला गेले कसे ? हा खरे तर संशोधनाचा विषय आहे. पण मिळाला, तो मिळाला...त्यासाठी खोपोली करांनी साहेबांचे अभिनंदन करायलाच हवे...आणि पुरस्कारातून बाहेर येवून साहेबांनी आता खोपोली शहरातील समस्यांचा डोंगर भुईसपाट करावा, अशी अपेक्षा खोपोलीकर सुज्ञ जनतेतून होत आहे. 

स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्यामुळे विविध आजार पसरतात, आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो आणि पर्यावरणाचीही हानी होते. यामध्ये वैयक्तिक स्वच्छता न राखणे, परिसर अस्वच्छ ठेवणे, प्लास्टिकचा वापर आणि कचरा योग्य ठिकाणी न टाकणे...संसर्गजन्य रोग, हवामानातील बदल आणि एकूणच जीवनशैलीवर गंभीर परिणाम होतात. खोपोली शहरात अनेक शाळांसमोर घाणीचे ढीग साचलेले असल्याने शाळेत जाणाऱ्या शाळकरी विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले असल्याचे बोलले जात आहे. शहरात स्वच्छता करण्यासाठी खोपोली नगर परिषदेने ठेकेदारी दिली आहे. स्वच्छतेवर लाखो, कोट्यवधी रुपये खर्च होतात. तरी शहरातील गल्लोगल्ली..पटांगण, चौकाचौकात...शाळेसमोर..रस्त्यांवर.. मोकळ्या जागेत...बस स्टॅन्डसमोर...रेल्वे स्टेशन परिसरात...रहदारी परिसरात.. दुकानांसमोर...रिक्षा स्टॅन्ड समोर...भाजी मार्केट, मटण मार्केट परिसरात... बाजार पेठ परिसरात... जिथे नजर जाईल तिथे प्लास्टिकच्या पिशव्याने चमकणारा कचरा.. नटलेला.. सजलेला... घाणीचा ढीग पहावयास मिळत आहे. मात्र, शहरात कुठे व कोणत्या ठिकाणी ठेकेदारी दिलेला ठेकेदार स्वच्छता करतो ? लोकप्रतिनिधीचा बंगला परिसर स्वच्छ झाला की शहर स्वच्छ, सुंदर व रोगराई मुक्त होतो का ? असा प्रश्न खोपोलीकरांनी उपस्थित केला आहे. 

एकेकाळी शहर स्वच्छ, सुंदर, रोगराई मुक्त असल्याने पुरस्काराने खोपोली नगर परिषदेला सन्मानित देखील करण्यात आला होते. मात्र, आता शहरात जागोजागी घाणीचे साम्राज्य पसरले असल्याचे चित्र दिसून येत असल्याने पुरस्कार मिळणे ही नशिबाची साथ...आणि जादूची कांडी तसेच साहेबी कमाल लागेल, उघड सत्य आहे. डासांना जगातील सर्वात धोकादायक किटकांपैकी एक मानले जाते. हे लहान दिसणारे कीटक दरवर्षी लाखो लोकांना डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया आणि झिकासारख्या आजारांनी आजारी पाडतात. डास नेहमी साचलेल्या पाण्यात आणि अस्वच्छतेत वाढतात. जर आपण आपल्या परिसरात स्वच्छता राखली, तर डासांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी करता येते असे मानले जात आहे. वेळेवर शहरात स्वच्छता होत नसेल घंटा गाडी येत नसेल तर नागरिकांनी किती दिवस घाण घरात ठेवावी ? या आधी शहरात ठिकठिकाणी कचराकुंडी (डस्टबीन) ठेवण्यात आले होते. घंटागाडी वेळेवर आली नाही किंवा घरातील नोकरीवर जाणारे कुटुंब उशिरा आले की घरातला कचरा कचरा कुंडीमध्ये टाकला जात होता, पण ही सुविधा राहिली नसल्यामुळे कचरा कुठे टाकायचा ? असा प्रश्न नागरिकांसमोर उपस्थित होत आहे. उघड्यावर टाकण्यात आलेला कचरा वेळेवर उचलला जात नसेल तर नगर परिषदेने प्रत्येक घराला मच्छरदाणी आणि सरकारी खाजगी रुग्णालयांमध्ये मोफत उपचार मिळणारा हेल्थ कार्ड वाटप करून द्यावा ? अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

खोपोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक खोपोली शहरात फिरून शहराचा आढावा का घेत नाही ? आपल्या कार्यालयाचे लोकसेवक...कर्मचारी वर्ग...आपल्या कामांची जबाबदारी ईमानदारी पार पडतात का? हे का पहिले जात नाही ? नगर परिषदेच्या डोळ्यांदेखत लाखो रुपये खर्च केलेला शौचालय चोरीला गेल्याच्या टीव्ही चैनलपासून ते वृत्तपत्रात बातम्या प्रसिद्ध होतात तरी चोराचा शोध का लागत नाही ? नवीन शौचालय बांधण्यासाठी निधी मंजूरी एका वार्डामध्ये होतो आणि दुसऱ्या ठिकाणी शौचालय का बनविण्यात येते ? खालापूर तालुक्यातून जाणाऱ्या एक्सप्रेस वेवर एका खासगी हॉटेल परिसरात स्वखर्चाने स्वच्छतेवर काटेकोरपणे लक्ष देत संपूर्ण परिसर स्वच्छ ठेवण्यात येतो. मात्र, शासनाकडून सर्व सोयी सुविधा देऊन लाखो, कोट्यवधी रुपये खर्च करून देखील शहरात स्वच्छता का होत नाही ? असा संतप्त सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे.

Friday, August 22, 2025

खोपोली नगर परिषदेसाठी मजुरांचा जीव स्वस्त ?

 



 तात्पुरत्या आणलेल्या मजूर सुरक्षेपासून वंचित ?

सुरक्षा साधनांशिवाय राबताहेत मजूर कामगार ?

पर्मनंट कामगारांचा जीव महत्वाचा, पण तात्पुरत्या मजुरांचा गेला तरी चालेल ? 

मुख्याधिकारी साहेब सुरक्षा फक्त पर्मनंट कामगारांसाठी आहे का ?

खोपोली / खलील सुर्वे :- खोपोली नगर परिषद कार्यालयाचे काम करण्यासाठी रोजंदारीवर तत्काळ स्वरूपात आणलेले कामगार मजुर सुरक्षा साधनांच्या कमतरतेमुळे असुरक्षित असल्याचे पहायला मिळत असून त्यांना मिळणा-या सोयीसुविधा अपु-या असल्याने त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असल्याचे दिसून येत आहे. रोजंदारी स्वरूपात कामास घेऊन तात्काळ कामापुरते त्यांचा वापर केला जात आहे. पण हे काम करतांना त्यांच्या सुरक्षिततेची काळजी खोपोली नगर परिषद मुख्याधिकारी तथा प्रशासक, संबधित विभागाचे अधिकारी व प्रशासनाला नसल्याचे दिसून येत आहे. खोपोली नगर परिषदेत पर्मनंट (कायमस्वरूपी) कामाला असणारी व्यक्तीच माणूस आहे, तात्पुरत्या स्वरूपात रोजंदारीवर आणलेले मजूर माणूस नाहीत...त्यांचा जीव महत्वाचा नाही...त्यांच्या जीवाची कोणतीच किंमत नाही...ते काम करता करता सुरक्षे अभावी मेले तरी त्याचे सोयरसुतक खोपोली नगर परिषदेच्या वरिष्ठ अधिकारी व पर्मनंट नोकरदार वर्गांला नसल्याचे दिसून येत आहे. 

या रोजंदारीवर आणलेल्या कामगार मजूरांना काम करण्यासाठी सुरक्षेची गरज लागत नाही का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. खोपोली नगर परिषद कार्यालयाच्या दादऱ्यावर कार्पेट लावण्याचे काम सुरू असतांना दोन मजूर भर पावसात काम करतांना दिसत आहेत. हे काम करतांना कार्यालयातून घेण्यात आलेली विजेच्या 

तारचे जॉईंट दादऱ्यावर पाण्यात ठेवून तारेच्या जॉईंटला प्लास्टिक पिशवीने असुरक्षितपणे बांधण्यात आले आहे. तसेच रोजंदारीवर आणलेल्या कामगार मजुरांच्या पायात चप्पल आहे. पायात सेफ्टी शूज...हातात हॅन्ड ग्लोज..डोक्यात हेल्मेट, डोळ्याला सेफ्टी गॉगल (चष्मा) नसतांना दादऱ्यावर असलेल्या मार्बलला ड्रिलिंग मशीनने कार्पेट लावण्याचे काम भर पावसात करतांना दिसत आहेत. हे काम करण्यासाठी आणलेल्या मजुरांना सुरक्षेची गरज नाही का ? त्यांच्या पायात चपल...हातात हॅन्डग्लोज नसतांना पाण्यात काम करत्यावेळी विजेचा झटका लागून दुर्घटना झाल्यावर नगर परिषदेला जाग येईल का ? कार्यालय काम सुरू असतांना अनेक नागरिक कार्यालयामध्ये येतात. दादऱ्यावरून येता वेळी यातील कुणाला विजेचा झटका लागून त्याचा मृत्यू झाला असता तर गेलेला जीव नगर परिषदेच्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी परत आणला असता का ?खोपोली नगर परिषदेच्या उद्यान भंडार विभागाच्या अधिकाऱ्यांना सुरक्षेबाबत गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. वैयक्तिक तात्काळ आणलेल्या मजूर कामगारांचा जीव स्वस्त आहे का ? त्यांच्या सुरक्षेची काळजी घेणे नगर परिषदेची जबाबदारी नाही का ? असा सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे.


या विषयी खोपोली नगर परिषदेचे उद्यान व भंडार विभागाचे अधिकारी निलेश लोखंडे यांना दूरध्वनीवरून संपर्क साधला असता ते म्हणाले की, कार्पेटचे टेंडर काढण्यात आले होते. लेबर आपण बाहेरून वैयक्तिक हायर केले होते. नाक्यावरून लेबर घेतला तर त्याला आपण काय सुरक्षा काय सांगणार...काम करतांना तो त्याच्या जीवाची काळजी घेतोच. आपण ज्यावेळी एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला ठेका देतो टर्म्स अँड अप कंडिशन (नियम व अटी) मध्ये सगळे ठरवून देतो. परंतु मजूर आपण हायर करतो, एखादा दिवस एखादा तास, अर्धा तास किंवा दोन तास इर्मजन्सी काम असते म्हणून आपण ते मजूर घेतो. प्रत्येकाची सेफ्टी ही प्रत्येकाला पाहिजे...कामाच्या सुरक्षितेच्या ज्या बाबी आहेत, त्या आपण आपल्या कर्मचाऱ्यांना देतो. त्यांना आपण काय करायचे आहे ते सांगितले होते पण तिथे कंटिन्यूशनमध्ये कोण उभ नव्हते...त्या ठिकाणी एखादे अपघात घडले असते, त्यांना काम सांगणारे म्हणजे मी जबाबदार ठरतो. माझ्या डिपार्टमेंटचे काम आहे म्हणजे मीच बोलवले मला ही जबाबदारी कार्यालयाने दिली आहे.


खोपोली नगर परिषद कार्यालयाच्या बाहेर दादऱ्यावर भर पावसात कार्पेट बसविण्याचे काम मे, जून, जुलै व ऑगस्टचा अर्धा महिना उलटल्यानंतर इर्मजन्सी नगर पालिकेला का वाटले ? पावसाला सुरुवात होण्याआधी हे कार्पेट नगर परिषदेने का बसविले नाही ? रोजंदारीवर आणलेल्या मजुरांचा जीव मोलाचा नाही का ? कार्पेट बसविण्यासाठी इतके कोणते इर्मजन्सी आले होती की सुरक्षेवर दुर्लक्ष करून मजुरांचा जीव धोक्यात घालून काम करण्यात आले ? नगर परिषदेमध्ये अमेरिकेचे राष्ट्रपती येणार होते का ? बेजबाबदारपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर मुख्याधिकारी डॉं. पंकज पाटील कारवाई करणार का ? की तेरी भी चूप मेरी भी चूप करीत...डोळे झाकत दुर्लक्ष होणार ? असा सवाल खोपोलीकरांकडून विचारला जात आहे.

Thursday, August 21, 2025

जयराम जाधव यांचा सन्मान

 


नांदेड/जावेद अहेमद :- संघटनेतर्फे ऑल इंडिया पोस्टल एससी एसटी एम्प्लॉईज वेल्फेअर असोसिएशनचे महाराष्ट्र सर्कलचे सर्वेसर्वा, ज्यांना केवळ नाम ही काफी है असं म्हटलं जातं, आमचे आधारस्तंभ तसेच भारतीय डाक विभागाची शान जयराम जाधव सर यांची महाराष्ट्र पोस्टल वेल्फेअर बोर्डावर निवड झाल्याबद्दल त्यांचे आपल्या सेंट्रल सॉ. डिव्हिजन शाखेतर्फे अभिनंदन करण्यात आले. 

सदर प्रसंगी प्रमुख उपस्थिती आमचे रिजनल सेक्रेटरी पिराजी सदावर्ते सर यांनी दाखवली तसेच मुंबई सेंट्रल सॉर्टिंग विभागाचे सचिव आयु.सुरेश रोडेवाड मुंबई सॉर्टिंग विभागाचे अध्यक्ष आयु.अर्जुन भोसले, खजिनदार संदीप पांचाळ , नरिमल पॉईंट पोस्टमन नागनाथ कोरुळे , श्रीरंग वाजे व आदी कर्मचारी उपस्थित होते.             

Wednesday, August 20, 2025

मोठी दुर्घटना होऊ नये म्हणून 200 वर्षापूर्वीचे पिंपळाचे वृक्ष तहसीलदार अभय चव्हाण , खालापूर नगरपंचायत आणि हेल्प फाउंडेशन यांच्या मदतीने हटविले..

 

तहसीलदार अभय चव्हाण यांच्यासह नागरिक भाऊक 


खालापूर दिपक जगताप :- संपूर्ण राज्यात मुसळधार पावसाने धुमाकुळ घातला असून अशा परिस्थितीमध्ये काळजीवाहू तहसीलदार अभय चव्हाण ॲक्शन मोड मध्ये कार्यरत असून सतत फोन कॉल, व्हॉट्सॲप मेसेज यांच्या माध्यमातून खालापूर तालुक्यातील प्रत्येक ठिकाणची अपडेट घेऊन प्रसंगी स्वतः उपस्थित राहून जनतेला धीर देत सतर्क राहण्याचे आवाहन करत आहेत. आज खालापूर शहरामध्ये असणारा प्राचीन शंकर मंदिरालगत 200 वर्षापूर्वी पासून असलेले पिंपळाचे झाड पडण्याची शक्यता नागरिकांनी वर्तवली असता स्वतः निर्णय घेत खालापूर नगरपंचायत,हेल्प फाउंडेशन आपत्ती व्यवस्थापन व खालापूर नागरिक यांच्या मदतीने 200 वर्षापूर्वीचे पिंपळाचे झाड बाजूला करण्याचे उत्तम प्रकारे केले. खूप वर्षे जुने असलेले पिंपळाचे झाड कसे तोडायचे हा विचार सर्वांच्या मनात येत असताना दुसरीकडे बाजूला असलेल्या नागरिकांची घरे व लगत असलेले भगवान श्री शंकराचे मंदिर यांचे मोठे नुकसान होऊ नये या साठी तहसीलदार अभय चव्हाण यांनी नागरिकांच्या विनंती वरून ते झाड बाजूला करण्याचे उत्तम काम केले. यावेळी तहसीलदार यांच्यासह नागरिक भाऊक झालेले पहायला मिळाले.रात्रीमध्ये ते झाड पडणार अशी खात्री जाणकार व्यक्त करत होते.यावेळी खालापूर नागरिकांनी तहसीलदार यांच्या कामावर समाधान व्यक्त करत आभार मानले. विशेषता जे काम दिवसा शक्य नाही ते काम रात्रीच्या वेळी भर पावसात, वादळ वाऱ्याची तमा न बाळगता काम करणारा बाळू आखाडे याचेही खालापूर नागरिकांनी यावेळी आभार मानले.सर्वत्र जनतेची सेवा करणारे हेल्प फाउंडेशन चे गुरुनाथ साठीलकर व त्यांचे सर्व सहकारी यांचे यावेळी सहकार्य लाभले.

यावेळी तहसीलदार अभय चव्हाण,नायब तहसीलदार सुधाकर राठोड, मंडळ अधिकारी संदेश पानसरे, अशोक सुसलादे,मुख्याधिकारी कोमल कराळे, प्रवीण शेडगे सहायक अभियंता महावितरण,नगराध्यक्षा रोशना मोडवे, सभापती किशोर पवार, नगरसेवक किशोर पवार, जितेंद्र यादव कार्यालय अधीक्षक, प्रणित भोसले रचना सहाय्यक, अक्षय लोंढे कर निरीक्षक,माजी नगरसेवक अवधूत भुर्के, उमेश पडवकर, नितीन पाटील, हेमलता चिंबूलकर, नंदकुमार लोहार, दत्ता लोहार, पत्रकार दिपक जगताप , गुरुनाथ साठीलकर व त्यांची संपूर्ण हेल्प फाउंडेशन ग्रुप, महावितरण कर्मचारी, नगरपंचायत कर्मचारी , पोलिस प्रशासन आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

संसदेत 130 वा संविधान दुरुस्ती विधेयक सादर : सत्ता वापरून तुरुंगातून राज्य करणाऱ्यांना मोठा धक्का – तुषार तानाजी कांबळे

 


नवी दिल्ली/प्रतिनिधी:- संसदेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नुकतेच 130 वा संविधान दुरुस्ती विधेयक लोकसभेत सादर केले. या विधेयकानुसार प्रधानमंत्री, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री किंवा राज्य मंत्री जर गंभीर फौजदारी गुन्ह्यातील आरोपामुळे सलग 30 दिवस तुरुंगात राहिला, तर 31 व्या दिवसापासून त्याचे पद आपोआप संपुष्टात येईल. यानंतर राष्ट्रपती किंवा राज्यपाल अशा व्यक्तीला पदावरून हटविण्याचा औपचारिक आदेश देतील.

सरकारचे म्हणणे आहे की हा कायदा भ्रष्टाचार रोखण्यासाठी, राजकारणातील शुचिता वाढविण्यासाठी आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले लोक सत्ता गैरवापर करू नयेत यासाठी महत्त्वाचा आहे. नेते तुरुंगात असताना सत्तेच्या माध्यमातून पुरावे नष्ट करणे, तपासात अडथळे निर्माण करणे किंवा साक्षीदारांवर दबाव आणणे थांबावे, हा यामागचा उद्देश आहे.

मात्र या विधेयकावर संसदेत तीव्र विरोधही झाला. विरोधकांचे म्हणणे आहे की, हा कायदा राजकीय सूडबुद्धीने वापरला जाऊ शकतो. खोट्या गुन्ह्यात फसवून एखाद्या नेत्याला तुरुंगात डांबले गेले, तर तो निर्दोष असूनही त्याचे पद जाईल. यामुळे लोकशाहीची घडी विस्कळीत होऊ शकते, असा इशारा विरोधकांनी दिला.

 तुषार तानाजी कांबळे यांची प्रतिक्रिया

या विधेयकावर प्रतिक्रिया देताना तुषार तानाजी कांबळे, सचिव – महाराष्ट्र प्रदेश (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, आठवले ) श्रमिक ब्रिगेड म्हणाले :

"130 वा संविधान दुरुस्ती विधेयक हे लोकशाहीतील स्वच्छता व उत्तरदायित्व यासाठी महत्त्वाचा टप्पा आहे. आजवर असे अनेक प्रसंग घडले आहेत की नेते तुरुंगात असूनही सत्तेवर राहिले, निर्णय घेत राहिले. हे लोकशाहीच्या आरोग्यास घातक आहे. त्यामुळे जनतेचा विश्वास वाढवण्यासाठी हा कायदा योग्य दिशेने उचललेले पाऊल आहे."

कांबळे पुढे म्हणाले,"तथापि, या कायद्याचा गैरवापर होऊ नये याची खबरदारी सरकारने घेतली पाहिजे. राजकीय वैमनस्यातून जर निर्दोष नेत्यांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना तुरुंगात डांबले गेले, तर त्यांच्या पदावर गदा येऊ शकते. त्यामुळे न्यायव्यवस्था, निवडणूक आयोग किंवा स्वतंत्र समिती यांची प्राथमिक छाननी होऊनच पदच्युतीची अंमलबजावणी झाली पाहिजे."

 विधेयकाचे फायदे

गुन्हेगार पार्श्वभूमीचे नेते सत्तेपासून दूर राहतील.

भ्रष्टाचार व गुन्हेगारीवर आळा बसेल.

न्यायव्यवस्थेवर जनतेचा विश्वास वाढेल.

राजकीय शुचिता व नैतिकता टिकेल.

 विधेयकाचे तोटे

खोट्या गुन्ह्यांमध्ये निर्दोष नेतेही बळी पडू शकतात.

लोकशाहीच्या स्थैर्यावर धोका.

न्यायालयीन प्रक्रिया संथ असल्याने तातडीचा परिणाम गंभीर ठरू शकतो.

राजकीय अस्थिरतेची शक्यता.

निष्कर्ष

130 वा संविधान दुरुस्ती विधेयक हे भारतीय राजकारणाच्या इतिहासात महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. सत्ता व पदाचा गैरवापर रोखण्यासाठी हा कायदा आवश्यक वाटतो, परंतु त्याचा दुरुपयोग रोखण्यासाठी काटेकोर तरतुदी गरजेच्या आहेत.

"लोकशाहीत प्रत्येक प्रतिनिधी हा जनतेचा सेवक आहे. त्यामुळे जनतेचा विश्वास टिकवण्यासाठी स्वच्छ राजकारण आवश्यक आहे. मात्र निर्दोष नेत्यांवर अन्याय होऊ नये, ही जबाबदारी सत्ताधाऱ्यांची आहे," असे तुषार तानाजी कांबळे यांनी स्पष्ट केले.

Monday, August 18, 2025

प्रत्येक घरातून उभा राहिला पाहिजे नवा 'डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम' – आमदार श्री महेंद्र थोरवे

 

खालापुर/ सुधीर देशमुख :- ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण मिळावे आणि प्रत्येक घरातून नवे 'डॉ. कलाम' घडावेत या उद्देशाने आमदार श्री. महेंद्र थोरवे यांच्या हस्ते आज दिनांक १८ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११ वाजता रायगड जिल्हा परिषद आदर्श केंद्र शाळा, कळंब (कर्जत) येथे अत्याधुनिक संगणक प्रयोगशाळा (ई-लर्निंग क्लासरूम) चे उद्घाटन करण्यात आले.या प्रसंगी विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले तसेच प्रयोगशाळा व क्रीडांगणासाठी मोठा निधी मंजूर करण्याची घोषणा करण्यात आली. 

याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना “मोबाईलपेक्षा संगणकाचा वापर करा. ग्रामीण भागातील मुलेच देशाचे भविष्य आहेत. आज केंद्र व राज्य शासनाच्या डिजिटल उपक्रमांमुळे गावागावांत दर्जेदार शिक्षण पोहोचत आहे. त्याचा लाभ घ्या आणि प्रत्येक घरातून नवा डॉ. कलाम घडवा.” तसेच कळंब शाळा डिजिटल शिक्षणाच्या नव्या पर्वात पदार्पण करत आहे तसेच ही रायगड जिल्हा परिषदेची आदर्श केंद्र शाळा आहे व भविष्यात राहील असा व्यक्त केला.

कार्यक्रमात गटशिक्षणाधिकारी अनंत खैरे, केंद्रप्रमुख माधुरी पाटील, मुख्याध्यापक एच. के. लोहकरे, जिल्हा परिषद कमिटी अध्यक्ष रविंद्र बदे,विधानसभा संघटक शिवराम बदे, माजी सभापती राहुल विशे, सरपंच प्रमोद कोंडिलकर, यांच्यासह मान्यवर, स्थानिक ग्रामस्थ व शिंदे गट शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विद्यार्थिनींनी लेझीमच्या तालावर आमदारांचे स्वागत केले, तर विद्यार्थ्यांनी ‘पहेलगाम हादसा’ आणि ‘मिशन सिंधूर’ या सांस्कृतिक कार्यक्रमांमधून आपले कलागुण सादर केले. तसेच गावातील विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या तरुणांचा आमदारांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

नांदेडहून मुंबईपर्यंत सेवा व सामाजिक एकोप्याची गौरवयात्रा


शेख सलीमाबी चाँद साब यांना ‘महाराष्ट्र गौरव’ पुरस्कार

नांदेड/जावेद अहमद :- नांदेड जिल्ह्यातील हिप्परगा थडी येथील ग्रामीण भागातून सामाजिक सेवेची सुरुवात केलेल्या बिलोली तालुक्यातील अटकळी येथील रहिवासी शेख सलीमाबी चाँद साब (वय 32) यांचा महाराष्ट्र गौरव पुरस्कार शिवराज बहुउद्देशी विकास संस्थेतर्फे जाहीर झाला आहे.

भारतीय डाक विभागात कार्यरत असलेल्या शेख सलीमाबी गेल्या पाच वर्षे ग्रामीण डाक सेवक म्हणून काम करत, विभागाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवली आहे. त्यांनी जात आणि धर्म या सीमांच्या पलीकडे जाऊन सामाजिक एकोपा निर्माण करण्यासाठी निरंतर प्रयत्न केले. त्यांच्या या कार्याची दखल घेत ‘एक्सप्रेस’ वृत्तपत्राद्वारे हिरकणी पुरस्कार मिळाला होता. तसेच, 2023–24 मध्ये छत्रपती संभाजीनगर येथे डाक विभागाच्या वतीने उत्कृष्टता पुरस्कारही सन्मान स्वरूपात देण्यात आला आहे.

नुकतंच त्यांनी सामाजिक सद्भावनेची जागरूकता जपत रक्षाबंधन साजरे केले, ही बाब कौतुकास्पद आहे. या उपक्रमाबद्दल संस्थेच्या संस्थापक व अध्यक्ष खुशी कांबळे यांनीही आपले कौतुक व्यक्त केले आणि शेख सलीमाबी यांच्या कार्याचा सामाजिक दृष्टीकोनातून मान्यताप्राप्त सन्मान केला.

पदोत्थानाच्या परीक्षेत यश मिळवून शेख सलीमाबी हे गेल्या वर्षापासून मुंबई येथील कुर्ला पोस्ट ऑफिसमध्ये एमटीएस पदावर कार्यरत आहेत. मुंबईतही त्यांनी सामाजिक एकोप्याचे कार्य सुरू ठेवले असून स्थानिक समुदायामध्ये सकारात्मक बदल घडवून आणले आहेत.

शिवराज बहुउद्देशी विकास संस्थेच्या वतीने शेख सलीमाबी यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार प्रदान करून त्यांच्या कार्याचा सन्मान केला आहे. या पुरस्काराद्वारे सामाजिक बांधिलकी, समर्पण आणि समाजासाठी केलेल्या कार्याची दखल घेतली गेली आहे. हा पुरस्कार 24 ऑगस्ट 2025 रोजी विरार पश्चिम येथे प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे

कर्जतकरांनी अनुभवला जोश पूर्ण दहीहंडीचा थरार..

कर्जत/नरेश जाधव :- आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन व शिवसेना कर्जत शहर आयोजित दहीहंडी उत्सव दिनांक १६ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ४.०० वाजता रॉयल गार्डन शेजारी मैदान कर्जत रायगड येथे आयोजित करण्यात आला होता.

      या दहीहंडी उत्सवाला उपस्थित राहून दहीहंडी उत्सवानिमित्त आलेल्या गोविंदाशी संवाद साधला दहीहंडी उत्सव हा एकात्मतेचे प्रतीक आहे हा उत्सव संपूर्ण देशभर साजरा केला जातो. शिवसेनेचे मुख्य नेते मा.श्री.एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी गोविंदा पथकांसाठी विमा घोषित केला व प्रत्येक गोविंदाची काळजी घेण्याचा वचन दिले त्यामुळे हा दहीहंडी उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जात आहे मी सर्व गोविंदां पदकांचे त्या निमित्ताने अभिनंदन करतो आपण हा जल्लोषपूर्ण थरार या ठिकाणी अनुभवत आहात व दहीहंडीला सलामी देत आहात. तसेच कर्जतकरांनी या दहीहंडी महोत्सवाला जी साथ दिली त्याबद्दल समस्त कर्जतकरांचे देखील अभिनंदन व आभार तसेच अजय पाल व विजय पाल यांच्यासह गुंडगे मधील असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला त्याबद्दल त्यांचे देखील पक्षात स्वागत केले व येणाऱ्या काळात कर्जतचे नंदनवन करण्यासाठी आपण सर्वजण कटिबद्ध आहोत तसेच येणाऱ्या निवडणुकांमध्ये आपल्याला शिवसेनेचा भगवा फडकविण्यासाठी एकजूट व्हायचंय व कर्जत नगरपालिकेवर देखील शिवसेनेचाच भगवा फडकवायचा आहे असा ठाम विश्वास व्यक्त केला

  याप्रसंगी बोलताना नगरसेवक ॲड संकेत भासे यांनी दहीहंडी उत्सव हा सांस्कृतिक वारसा आहे आणि तो जपण्याचं भाग्य शिवसेनेच्या माध्यमातून आपल्याला लाभलं आहे. आमदार साहेबांच्या नेतृत्वात कर्जत शहराचा सर्वांगीण विकास होतो आहे. जसा दहीहंडी सणात खालच्या थरातील माणूस वरच्या थराला हात देतो, तशीच ताकद आपण सर्व शिलेदारांनी दिल्यास कर्जत शहराचा विकास नक्की साध्य होईल. आज कर्जत शहरात छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक, प्रभू श्रीराम व विठ्ठल मूर्ती ही आपली संस्कृती जपणारी प्रतीके आहेत. येत्या काळात पाणीपुरवठा, उड्डाणपूल, आरोग्य व नागरी सुविधा या प्रश्नांवर आमदार साहेबांच्या माध्यमातून मार्ग निघेल, याचा मला विश्वास आहे.या दहीहंडी उत्सवाला भेट देण्यासाठी व गोविंदा पथकांचे,उपस्थित कर्जतकरांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी आदित्य साळुंखे डोंबिवली (प्रसिद्ध गायक) कश्मिरा कुलकर्णी (सिने अभिनेत्री) भाग्यश्री मोटे (सिने तारका)यांनी उपस्थिती लावली. 

    या दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने 31 मंडळांनी आपली सलामी पूर्ण केली या दहीहंडी उत्सवातील खुल्या गटामध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक व मानाची दहीहंडी फ्रेंड्स गोविंदा पथक कळंबोली यांनी फोडली. कर्जत तालुका मर्यादित मानाची दहीहंडी सलग तिसऱ्या वर्षी फोडण्याचा मान विठ्ठल रखुमाई आनंदवाडी नेरळ या गोविंदा पथकाने पटकावला तसेच कर्जत शहर मर्यादित मानाची दहीहंडी जय अंबे भवानी जुनियर भिसेगाव या गोविंदा पथकाला मिळाला

या भव्य दहीहंडी कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या सर्व शिवसैनिकांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि उपस्थित जनतेचे आभार!"या प्रसंगी पुरुष व महिलांसाठी भव्य लकी ड्रॉ चे देखील आयोजन करण्यात आले होते. उपस्थितांमध्ये ड्रॉ घेऊन सर्वांना बक्षीसाचे वाटप देखील करण्यात आले.

      या सोहळ्यासाठी रायगड शिवसेना पदाधिकारी,महिला आघाडी, युवा सेना कार्यकर्ते व पत्रकार मित्र व असंख्य कर्जतकर उपस्थित होते.


Sunday, August 17, 2025

वावोशी गावातील टिळक परिवाराची १५० वर्षांची परंपरा असणारा कृष्ण जन्माष्टमी सोहळा उत्सवात साजरा..

 

 सोहळ्यात भाजपा नगरसेविका मृणाल पेंडसे यांची विशेष उपस्थिती..

खालापुर/सुधीर देशमुख:- वावोशी गावातील टिळक कुटुंब आयोजित पारंपरिक कृष्ण जन्माष्टमी उत्सव यावर्षीही मोठ्या भक्तिभावाने व उत्साहात साजरा करण्यात आला. तब्बल १५० ते १७५ वर्षांची परंपरा असलेला हा उत्सव टिळक कुटुंबाच्या विठ्ठल रखुमाई मंदिरात पार पडतो. मात्र ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग असल्याने हा खासगी उत्सव सामूहिक सोहळ्यात रूपांतरित झाल्याचे पाहायला मिळते.

     या प्रसंगी ह. भ. प. शेखर बुवा व्यास यांच्या कीर्तनासह पाळणा, न्हाऊ-माखू, कृष्ण लीला, टिपरी खेळ, तसेच “राधा कृष्ण जय कुंजविहारी” या भजनावर फेर अशा कार्यक्रमांना उपस्थितांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. मंद प्रकाशातील पारंपरिक काचेच्या हंड्यांमध्ये पार पडलेला कृष्णजन्म सोहळा अविस्मरणीय ठरला. यामध्ये तबलजी बल्लाळ ढवले यांनी दिलेली साथ आणि अनन्या अथर्व देव यांनी सादर केलेल्या अभंगामुळे कार्यक्रमाची रंगत अधिकच वाढली. या सोहळ्याला ठाणे येथील भाजपा महिला अध्यक्ष व नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी विशेष उपस्थिती दर्शवली. त्यांनी रविंद्र टिळक व मामा टिळक यांच्या निमंत्रणामुळे वावोशीला येण्याची संधी मिळाल्याचे सांगून, “मी देखील आता एक वावोशीकर असून यापुढे वावोशीसाठी काही करण्याची संधी मिळाली तर ती नक्कीच आवर्जून करेन,” असे मनोगत व्यक्त केले. तसेच ग्रामस्थांना जन्माष्टमीच्या शुभेच्छाही दिल्या. “परंपरा, भक्तीभाव आणि शिस्त यामुळे हा उत्सव आजही जिवंत आहे,” असे ९२ वर्षीय आजी विजया आबा टिळक यांनी आठवणी सांगताना नमूद केले. गावकऱ्यांनी व टिळक कुटुंबाने सहकार्य, सुसंवाद आणि परंपरेची सांगड घालत उत्सव यशस्वीरित्या साजरा केला. “मतभेद नाही, मनभेद नाही, फक्त परंपरा आणि उत्साह,” अशी भावना ग्रामस्थांमध्ये प्रकर्षाने दिसून आली.

गावातील ग्रामपंचायत आणि ग्रामसेवकापर्यंत आता सर्वांवर असणार केंद्र सरकारची नजर !

 

सरकारचा ऐतिहासिक निर्णय

खालापुर/सुधीर देशमुख :- तुमच्या गावातील ग्रामपंचायतमध्ये, ग्रामपंचायतच्या कारभारामध्ये सरपंच किंवा ग्रामसेवक मनमानी करतोय का? मग आता चिंता करू नका. केंद्रातील सरकारने अशा मनमानी कारभार करणाऱ्या सरपंच आणि ग्रामसेवकांचा बंदोबस्त करण्यासाठी एक नवीन सुविधा सुरू केली आहे.

या नव्या प्रणालीचा काल 15 ऑगस्ट पासून अर्थातच स्वातंत्र्य दिनापासून शुभारंभ झाला असून या नव्या प्रणालीमुळे ग्रामीण शासन व्यवस्थेत पारदर्शकता येणार असल्याचा विश्वास व्यक्त होतोय. खरे तर ग्रामपंचायतीत सरपंचाकडून तसेच तेथील ग्रामसेवकांकडून मनमानी कारभार चालवला जातोय असा आरोप सातत्याने केला जातो. गावागावांमध्ये असे प्रकार बिनधास्त सुरू आहेत. या लोकांना शासनाचा अजिबात वचक राहिलेला नाही. काही गावांमध्ये ग्रामसभाच घेतल्या जात नाहीत. ग्रामसभा फक्त कागदावर राहते. मात्र आता यापुढे अशी कोणतीच घटना होणार नाही. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआय च्या मदतीने ग्रामपंचायत आणि पंचायत समितीच्या कारभारावर करडी नजर ठेवली जाणार आहे.

यासाठी केंद्र सरकारने सभासार ही नवीन प्रणाली लॉन्च केली आहे. या नव्या प्रणालीमुळे पंचायत समितीमधील आणि ग्रामपंचायत मधील कारभार अधिक पारदर्शक होईल आणि सर्वसामान्य नागरिकांची होरपळ थांबेल अशी आशा आहे. अनेकदा ग्रामपंचायतीमध्ये तसेच पंचायत समितीमध्ये सर्वसामान्य नागरिकांची कुचंबना होते. नागरिकांची कामे वेळेवर होत नाहीत, त्यांची आर्थिक पिळवणूक सुद्धा होत असते. पण भविष्यात असे कोणतेच प्रकार आपल्याला पाहायला मिळणार नाहीत. नवीन सभासार प्रणाली ग्रामीण स्वराज्य संस्थांचे कामकाज अधिक पारदर्शक, लोकाभिमुख आणि उत्तरदायी होण्यासाठी मदत करणार आहे. अनेक गावांमध्ये ग्रामसभा होत नाहीत आणि यामुळे त्या गावाचा विकास खंडित होतो. ग्रामसभा झालीच नाही तर निधीचा योग्य वापर शक्य आहे. याचमुळे आता केंद्रातील सरकारने देशभरातील 2.68 लाख ग्रामपंचायतींमध्ये सभासार प्रणाली लागू करण्याची मोठी घोषणा केली आहे.

या नव्या प्रणाली बाबत सरकारकडून महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आली आहे. सरकारने सांगितले आहे की ही प्रणाली एआय द्वारे चालवली जाणारी एक बैठक सारांश प्रणाली राहणार आहे. या प्रणालीच्या माध्यमातून ग्रामपंचायतींच्या बैठकीचे इतिवृत्त, घेतलेले निर्णय, त्यांचे डेटा विश्लेषण या सर्व गोष्टींच्या नोंदी ठेवल्या जाणार आहेत. या कामात एआय मदत करणार आहे.

या नव्या प्रणालीमुळे बैठकींचे रेकॉर्डिंग, रिपोर्टिंग सहज शक्य होणार आहे आणि यामुळे कामांमधील पारदर्शकता वाढणार आहे. या नव्या प्रणालीमुळे ग्रामविकास निधीचा योग्य वापर झाला का, घेतलेले निर्णय अंमलात आले का, यावरही देखरेख ठेवता येणे शक्य होणार असल्याची माहिती सरकारने दिली आहे. ज्या राज्यांमध्ये सर्वाधिक ग्रामपंचायती आहेत त्या राज्यांमध्ये ही प्रणाली लागू करण्यास प्राधान्य राहील. टप्प्याटप्प्याने देशातील सर्वच राज्यांमध्ये ही प्रणाली लागू केली जाणार आहे. पुढील महिन्यापासून ही प्रणाली लागू करण्याचे काम सुरू होणार आहे.

वृंदावन अपार्टमेंट मध्ये गोकुळाष्टमी सण साजरा

 


खालापुर/सुधीर देशमुख :- गोकुळाष्टमी हा एक महत्वाचा हिंदू सण आहे, जो भगवान श्रीकृष्णाच्या जन्मदिवसाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. या दिवशी, भक्त उपवास करतात, कृष्णाची पूजा करतात आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला जातो. दरवर्षी प्रमाणे वृंदावन अपार्टमेंट मध्ये पारंपरिक सण साजरे केले जात असून आज सर्व सभासद व लहान मुले तसेच मोठ्या मुलांनी व सर्व सभासदारांनी गोकुळाष्टमी साजरी करण्यात आली. यावेळी वृंदावन अपार्टमेंट येथील मुलांनी दही हंडी फोडून तेथील वातावरण आनंदमय आणि उत्साही करत दहीहंडी हा सण साजरा केला.

गोकुळाष्टमीचे महत्व भगवंताचा जन्म

गोकुळाष्टमी हा भगवान विष्णूचा आठवा अवतार असलेल्या श्रीकृष्णाच्या जन्माचा दिवस आहे. हा दिवस भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला येतो. 

भक्ती आणि श्रद्धेचा दिवस: -

या दिवशी, भक्त उपवास करतात, कृष्णाची पूजा करतात, आणि कृष्णाच्या बाललीलांचे स्मरण करतात. यामुळे भक्तांमध्ये भक्ती आणि श्रद्धेची भावना वाढते. 

सांस्कृतिक आणि सामाजिक महत्व:-

गोकुळाष्टमी महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने साजरी केली . या दिवशी, दहीहंडी फोडणे, पारंपरिक गाणी आणि नृत्ये सादर करणे, हे या उत्सवाचे मुख्य भाग आहेत. 

धार्मिक आणि आध्यात्मिक महत्व:-

जन्माष्टमी हा दिवस आध्यात्मिकदृष्ट्या महत्वाचा मानला जातो. या दिवशी कृष्णाच्या भक्तीने, अनेक लोक आंतरिक शांती आणि आनंद मिळवतात.

सकारात्मक उर्जा:-

कृष्णाच्या जन्माच्या कथेमध्ये, वाईट शक्तींवर चांगल्या शक्तींच्या विजयाचा संदेश आहे. त्यामुळे, हा दिवस सकारात्मक उर्जा आणि आशेचा किरण घेऊन येतो.

Saturday, August 16, 2025

आमदार श्री महेंद्र थोरवे यांचा कर्जत खालापूर मतदारसंघावर करिष्मा कायम....


भिवपुरी ग्रामपंचायत हद्दीतील उद्धव बाळासाहेब गट व राष्ट्रवादीतील कार्यकर्त्यांचा शिवसेनेमध्ये जाहीर पक्षप्रवेश....

कर्जत /नरेश जाधव :- दिनांक 15 ऑगस्ट 2025 रोजी सायं 6.00 वाजता बाळासाहेब भवन, जनसंपर्क कार्यालय कर्जत येथे भिवपुरी ग्रामपंचायत हद्दीतील उद्धव बाळासाहेब गट व राष्ट्रवादीतील पक्षातील कार्यकर्त्यांनी आमदार श्री महेंद्र थोरवे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत शिवसेना पक्षात पक्षप्रवेश केला याप्रसंगी उपसरपंच हरिचंद्र निसाळ, संतोष घाडगे, प्रशांत दळवी भरत गाडे मच्छिंद्र गाडे ,रामचंद्र निसाळ ,मधु पवार ,महेंद्र गाडे ,विजय लोहट ,राजेश पठार ,अनिल पठार ,विलास नवले ,सागर दिसले ,संतोष लांगी ,संतोष सावंत ,पुंडलिक गोडे ,दशरथ मोकणे ,सुरज साळुंखे ,संदीप शिंदे ,मंगेश शिंदे ,अक्षय गाडे ,चेतन बुरगुने, गोपाळ मांडे, संजय वाघमारे ,विजय वाघमारे ,सुनील वाघमारे ,अंकुश वाघमारे ,सुधीर दाते ,मंथन सावंत ,मुकुंद सावंत ,अनिल वाघमारे ,किसन वाघमारे, रमेश बीड ,जयेश वाघमारे ,सुनील जाधव ,दत्ता वाघमारे ,श्याम मुकणे ,लहू वाघमारे ,मारुती भोसले ,गोविंद मोकणे ,अर्जुन हिलम, गणेश वाघमारे, मारुती वाघमारे ,जयवंत नवले ,अभिजीत तुरे ,तुषार गाडे ,शंकर मुकणे ,अनिल सावंत ,सुधीर मोरमारे ,सुनील मोरमारे, नागेश निसाळ, आर्यन कार्बळ ,तुकाराम कारभल,किशोर कालेकर, ऋषिकेश तुपे ,सागर तुरडे ,अनंत शितोळे ,संजय शितोळे ,संदेश शितोळे ,विलास भोईर ,शशिकांत गरुड ,विजय जाधव ,सुनील वाघमारे ,कृष्णा पवार ,विजय हीलम ,ऋतिक वाघमारे ,राकेश भोसले ,साहिल वाघमारे, नरेश मुकणे, गुरुनाथ गाडे ,आणि यश गाडे यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला 

  या प्रसंगी श्री संतोष घाडगे , नाथा आगज, दिलीप ताम्हाणे, विशाल लहोट यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी बोलताना आपण सर्वांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला त्याबद्दल सर्वांचे स्वागत केले व भिवपुरी ग्रामपंचायत आत्तापर्यंत प्रत्येक वेळी माझ्या पाठीशी उभे राहिले आहे व आता देखील ग्रामपंचायत वर आपलेच वर्चस्व आहे .भिवपुरी ग्रामपंचायतीवर शिवसेना एक संघ उभी राहिली ,त्या त्यावेळी शिवसेनेचा विजय हा निश्चित झालेला आहे .आणि या वेळेस देखील आपण येणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये व जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांमध्ये शिवसेनेचा भगवा फडकणार याचा मला ठाम विश्वास आहे .यापुढे कर्जत खालापूर मतदारसंघातील एकेक शिवसैनिक आम्ही एकत्र करणार आहोत .आणि सर्वांना एकत्र घेऊन तालुक्याचा विकास करणार आहोत. अशा प्रकारची भावना व्यक्त केली.

या पक्षप्रवेशावेळी युवा सेना जिल्हाप्रमुख प्रसाद थोरवे,कर्जत पंचायत समिती उपसभापती मनोहरदादा थोरवे,तालुका संपर्क प्रमुख दिलीप ताम्हाणे ,उप तालुका प्रमुख रामचंद्र मिणमिणे ,तालुका सह संपर्क प्रमुख अशोक आसवले,उप तालुका संघटक दिपक भोईर ,विभाग प्रमुख नाथा आगाज , उप तालुक संपर्क प्रमुख संदेश सावंत ,पंचायत समिती संघटक मनोज भोईर ,रोहिदास खडे , विशाल लोहट ,सागर गायकवाड, राजेश थोरवे आदी मान्यवर उपस्थित होते.



आमदार महेंद्र थोरवे यांनी खालापूर तालुक्यातील उजळोली ते करंबेळी ठाकूरवाडी रस्त्याची मंजुरी मिळवून दिल्याने स्थानिकांनी मानले आभार..

 


खालापुर/ सुधीर देशमुख:- तालुक्यातील ग्रामीण भाग असलेल्या उजळोली ते करंबेळी ठाकूरवाडी कडे जाण्यासाठी येथील रहिवाश्यांना रास्त न्हवता. रस्ता होता पण पायवाट त्यामुळे येथील डोंगराळ भागातील गावामध्ये राहणाऱ्या नागरिकांना गेली अनेक वर्षे जीव मुठीत घालून लांबचा प्रवास करावा लागत होता. याबाबत येथील नागरिकांनी कर्जत खालापूर विधानसभा युवासेना अध्यक्ष रोहित विचारे यांना रस्त्याची समस्या मंडळी त्यामुळे युवासेना अध्यक्ष रोहित विचारे यांनी सदरील रस्त्याची पाहणी करून माहिती घेतली असता सदरील पायवाट रस्ता हा वनविभाग मधून जात असल्याचे समजले. याबाबत रोहित विचारे यांनी कर्जत खालापूर मतदार संघाचे लोकप्रिय आमदार महेंद्र थोरवे यांना उजळोली ते करंबेळी ठाकूरवाडी कडे जाणाऱ्या रस्त्याची समस्या सांगत रस्ता करून देण्याची मागणी केली. याबाबत आमदार महेंद्र थोरवे यांनी शासनाच्या सर्व परवानगी घेऊन , महाराष्ट्र राज्य ग्रामीण विकास संस्था अंतर्गत प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून तालुक्यातील उजळोली ते करंबेळी ठाकूरवाडी रस्ता मंजूर करून कार्यारंभ आदेश मिळवून दिल्याने येथील स्थानिकांनी फटाक्याची आतिषबाजी करून एकमेकांना मिठाई भरवून आनंद व्यक्त केला व सदरील रस्त्याच्या कामाला लवकरच सुरुवात होणार असल्याने गावकऱ्यांनी आमदार महेंद्र थोरवे यांचे आभार मानले. 

यावेळी कर्जत खालापूर विधानसभा युवासेना अध्यक्ष रोहित विचारे , खरिवली पंचायत समिती विभाग प्रमुख युवासेना किरण पाटील , उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत खरीवली सुशांत विचारे , युवा सेना तालुका संपर्कप्रमुख मनीष विचारे , स्वप्निल चव्हाण , सचिन परबलकर , रामदास पालांडे , विभाग प्रमुख ज्ञानेश्वर सावंत , संकेत पालांडे , शिरीष पाटील , निलेश दिघे , निखिल पाटील , अनिल परबळकर , सम्राट गायकर , शुभम परबलकर , यश महाडिक , सुमित परबलकर , धाऊ माडे , मोहन माडे , नारायण वीर , शंकर हिरवा , गोपाळ हिरवा , चिमा हिरवा , नया हिरवा , बबन माळी , धर्मा हिरवा , बाळू हिरवा , पांडू वीर , तुकाराम मांडे , केशव मांडे , आतीश मांडे , चंद्रकांत मांडे , चंद्रकांत उघडा , हेमा हिरवा , नामदेव हिरवा , चंद्रकांत दोरे , करण माडे , रोहिदास माडे , मनोज आघान , चंद्रकांत आघान यांसह उजळोली , करंबेळी ठाकूरवाडी येथील स्थानिक उपस्थित होते..

Friday, August 15, 2025

नागरिकांना विहित वेळेत आणि सुरळीत डिजिटल सेवा द्या....

महिला व बालविकास मंत्री कु आदिती तटकरे....

रायगड /प्रतिनिधी :- रायगड जिमाका दि. 15- आधार कार्ड नोंदणी आणि प्रमाणिकरण प्रक्रियेला गती देण्यासाठी शासनाने आधारसंच उपलब्ध करून दिले आहे. तरी या सर्व संच धारकांनी वेळेत आणि सुरळीत नागरिकांना सुविधा दयाव्यात अशा सूचना महिला व बालविकास मंत्री कु आदिती तटकरे यांनी दिल्या. 

नियोजन भवन येथे महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे यांच्या हस्ते रायगड जिल्ह्यासाठी प्राप्त नवीन आधार संचाचे वाटप करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी किशन जावळे, पोलीस अधीक्षक आचल दलाल, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, उपवनसंरक्षक राहुल पाटील, उपजिल्हाधिकारी डॉ रविंद्र शेळके उपस्थित होते. जिल्ह्यात 71 संचचे वाटप यावेळी करण्यात आले. 

यावेळी मार्गदर्शन करताना कु. तटकरे म्हणाल्या, आधार कार्ड आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात खूप महत्त्वाचे कागदपत्र आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील नागरिकांना ही सेवा वेळेत आणि सुरळीत मिळण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील होते. माहिती व तंत्रज्ञान विभागाने उपलब्ध करून दिलेल्या या किट्समुळे महानगरी भागांपासून अगदी दुर्गम गावांपर्यंत प्रत्येक नागरिकाला आधार नोंदणी आणि अद्ययावत सेवा सहज मिळणार आहेत. या सर्व आधार संस्थाचालकांनी नियमाचे पालन करून सेवा उपलब्ध करून द्याव्यात असे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी आधार प्रामाणिकरण सेवा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासन करीत असलेल्या उपाययोजनाबाबत माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपजिल्हाधिकारी डॉ रविंद्र शेळके यांनी केले.

इतिहास बदलणारे पाणी कॉफी टेबल बुकचे प्रकाशन

रायगड जिल्हा माहिती कार्यालयाची निर्मिती असलेल्या महाड चवदार तळे सत्याग्रहावर आधारित कॉफी टेबल बुकचे महिला व बालविकास मंत्री कु आदिती तटकरे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. रायगड जिल्ह्यातील प्रमुख ऐतिहासिक घटना, स्थळे सर्व तरुणांईपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाने समाज माध्यमातून प्रसिद्धी करावी तसेच या पुस्तकाची ई आवृत्ती तयार करावी अशा सूचना कु. तटकरे यांनी दिल्या. 

यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे, पोलीस अधीक्षक आचल दलाल, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, उपवनसंरक्षक राहुल पाटील, उपजिल्हाधिकारी डॉ रविंद्र शेळके, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा पिंगळे आदी मान्यवर उपस्थित होते.

सार्वजनिक बांधकाम विभाग खालापूर यांच्या वतीने प्राथमिक शाळा खालापूर येथे स्तुत्य उपक्रम...

 


आरोग्य तपासणी, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा घेऊन विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्य वाटप...

खालापूर/ मानसी कांबळे :- सार्वजनिक बांधकाम विभाग पनवेल अंतर्गत सार्वजनिक बांधकाम उपविभाग खालापूर यांचे मार्फत ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त हर घर तिरंगा या उपक्रमांतर्गत रा जि प शाळा खालापूर या ठिकाणी १३ ऑगस्ट चित्रकला स्पर्धा,१४ ऑगस्ट निबंध स्पर्धा व १५ ऑगस्ट २०२५ रोजी आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले. 

चौक ग्रामीण रुग्णालयचे डॉ.राम शेट्टी, डॉ. ओव्हाळ मॅडम,डॉ.नूतन डॉ.मोहित व त्यांचे सहकारी यांनी आरोग्य शिबीर यशस्वीपणे संपन्न केले.

सकाळी 9:30 वाजता बक्षीस वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला.या वेळी विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या चेहऱ्यावर आनंद व उत्साह ओसंडून वाहत होता.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने स्तुत्य सामाजिक उपक्रम राबविल्याने पालकांनी सर्व अधिकारी वर्गाचे आभार मानले.कार्यक्रमाच विशेष आकर्षण ठरले ते खालापूर तालुक्यातील कारगिल युद्धातील व १९७१ युद्धाचे युद्धवीर, माजी सैनिक मेजर प्रकाश महाडिक, मेजर बी एन भोसले, मेजर रमाकांत मोदी, मेजर शरद विचारे, मेजर शैलेश मंगले, मेजर भरत काकडे, मेजर सुरेश पिंगळे व मेजर नरेंद्र भोसले उपस्थित होते. मेजर प्रकाश महाडिक यांनी प्रत्यक्ष १९७१ च्या युध्दातील प्रसंग सांगून सर्वांना मंत्रमुग्ध केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान उपविभागीय अभियंता मान प्रशांत राखाडे यांनी भूषवले. ह्या कार्यकारणासाठी उमेश गावंड , सचिन ओसवाल,संजय वाडेकर,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नमिता सावंत,उपाध्यक्ष योगेश पवार,सदस्य मिलिंद भोसले ,रेश्मा पवार, सुजाता खरात,सलोनी कासार, स्मिता मानकामे ,पुष्पा पवार राजू मोरे , रुपेश चौधरी यांच्यासह विद्यार्थी व पालक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्पर्धक विद्यार्थ्यांचे प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक काढून आकर्षक चषक व बक्षिस देण्यात आले. शाळेतील सर्व 84 विद्यार्थ्यांना दप्तर वाटप करण्यात आले.मुलांसाठी कॅरम बोर्ड , बुद्धिबळ सेट देण्यात आला.शाळेसाठी ब्लुटूथ साऊंड सिस्टीम भेट देण्यात आली.

कार्यक्रमाची संकल्पना सार्वजनिक खालापूरचे शाखा अभियंता सतीश गायकवाड यांची होती व ती यशस्वी करण्यासाठी शाखा अभियंता अक्षय केंजळे शाखा अभियंता,अजित महानूर सहाय्यक अभियंता,रेश्मा शिंदे कनिष्ठ अभियंता,विकास सुर्वे ,मनोज सोनवणे,युगल पवार, दौते मॅडम,प्रशांत वाघमारे, अरुण गोरे इतर कर्मचारी खालापूर शाळेचे शाळाप्रमुख सचिन कडू,सारिका गोळे व मीनल धोत्रे यांनी कार्यक्रम यशस्वी पार पाडला.शेवटी साहाय्यक अभियंता अजित महानूर यांनी आभार मानले.

Thursday, August 14, 2025

पत्रकार अनिल पवार यांची डीके फाउंडेशन ऑफ फ्रीडम अँड जस्टिस संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

 


मुंबई / मानसी कांबळे :- केपी न्यूज चैनल, दैनिक कोकण प्रजा, दैनिक कोकण प्रदेश न्यूजचे राष्ट्रीय संपादक व न्यूज जर्नालिस्ट असोसिएशनचे राष्ट्रीय सचिव, निर्भिड, धडाडीचे पत्रकार अनिल वसंत पवार यांची मानवी हक्क, अधिकार व मुल्यांसाठी लढणाऱ्या डीके फाउंडेशन ऑफ फ्रीडम अँड जस्टिस या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. 

महाराष्ट्र राज्य उपमुख्य पर्यवेक्षक फिरोज पिंजारी यांच्या शिफारशीनुसार डीके फाउंडेशन ऑफ फ्रीडम अँड जस्टिस संघटनेचे डायरेक्टर दानिश खान यांनी सदर नियुक्ती केली असून पत्रकार अनिल यांच्यावर सोलापूर जिल्ह्यात संघटन बाधणी व संघटनेच्या प्रचार, प्रसाराची जबाबदारी देण्यात आली आहे. संचालक मंडळाच्या सूचनांनुसार सोलापूर जिल्ह्यातील रिक्त पदे भरण्यासह संस्थेच्या नियमांनुसार गरीब, गरजू लोकांना न्याय देण्याचे काम अनिल पवार करतील आणि सोलापूर जिल्ह्यात संपूर्ण टीमचे पर्यवेक्षण पत्रकार पवार करतील, असे नियुक्ती करतांना डायरेक्टर दानिश खान यांनी सांगितले. 

दरम्यान, नवनियुक्त सोलापूर जिल्हाध्यक्ष पत्रकार अनिल पवार म्हणाले की, डीके फाउंडेशन ऑफ फ्रीडम अँड जस्टिस संघटनेच्या तत्वानुसार मी सोलापूर जिल्ह्यात संघटनेची बांधणी व प्रचार, प्रसार करेल. तसेच संघटनेने माझ्यावर टाकलेली जबाबदारी मी पूर्ण कसोशीने पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहिल, असेही पत्रकार पवार म्हणाले. या निवडीबद्दल सर्व स्तरातून सोलापूर जिल्हाध्यक्ष अनिल पवार यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

डॉं. शरीफ बागवान यांची डीके फाउंडेशन ऑफ फ्रीडम अँड जस्टिस संघटनेच्या उत्तर महाराष्ट्र विभाग अध्यक्षपदी नियुक्ती

 

डॉं. शरीफ बागवान यांची डीके फाउंडेशन ऑफ फ्रीडम अँड जस्टिस संघटनेच्या उत्तर महाराष्ट्र विभाग अध्यक्षपदी नियुक्ती

मुंबई / मानसी कांबळे :- महाराष्ट्र बागवान वर्कींग कमिटीचे संस्थापक अध्यक्ष, बीव्ही (BV) न्यूज 24 चे मुख्य संपादक व न्यूज जर्नालिस्ट असोसिएशनचे राष्ट्रीय संयोजक डॉं. शरीफ बागवान यांची मानवी हक्क, अधिकार व मुल्यांसाठी लढणाऱ्या डीके फाउंडेशन ऑफ फ्रीडम अँड जस्टिस या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संघटनेच्या उत्तर महाराष्ट्र विभाग अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. 

महाराष्ट्र राज्य उपमुख्य पर्यवेक्षक फिरोज पिंजारी यांच्या शिफारशीनुसार डीके फाउंडेशन ऑफ फ्रीडम अँड जस्टिस संघटनेचे डायरेक्टर दानिश खान यांनी सदर नियुक्ती केली असून डॉं. शरीफ बागवान यांच्यावर उत्तर महाराष्ट्रातील जळगांव, धुळे, नंदुरबार, नाशिक, अहिल्यानगर आदी जिल्ह्यात संघटन बाधणी व संघटनेच्या प्रचार, प्रसाराची जबाबदारी देण्यात आली आहे. संचालक मंडळाच्या सूचनांनुसार उत्तर महाराष्ट्र विभागातील रिक्त पदे भरण्यासह संस्थेच्या नियमांनुसार गरीब, गरजू लोकांना न्याय देण्याचे ते काम करतील आणि उत्तर महाराष्ट्रातील संपूर्ण टीमचे पर्यवेक्षण देखील डॉं. शरीफ बागवान करतील, असे नियुक्ती करतांना डायरेक्टर दानिश खान यांनी सांगितले. 

दरम्यान, नवनियुक्त उत्तर महाराष्ट्र विभाग अध्यक्ष डॉं. शरीफ बागवान म्हणाले की, डीके फाउंडेशन ऑफ फ्रीडम अँड जस्टिस संघटनेच्या तत्वानुसार मी उत्तर महाराष्ट्रातील जळगांव, धुळे, नंदुरबार, नाशिक, अहिल्यानगर आदी जिल्ह्यासह राज्यभरात संघटनेची बांधणी व प्रचार, प्रसार करेल. तसेच उत्तर महाराष्ट्र व खान्देशात संघटना बांधण्याची माझ्यावर टाकलेली जबाबदारी मी पूर्ण कसोशीने पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहिल, असेही डॉं. बागवान म्हणाले. या निवडीबद्दल सर्व स्तरातून उत्तर महाराष्ट्र विभाग अध्यक्ष डॉं. शरीफ बागवान यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


पत्रकार खलील सुर्वे यांची डीके फाउंडेशन ऑफ फ्रीडम अँड जस्टिस संघटनेच्या महाराष्ट्र राज्य मंडळ कोकण अध्यक्ष नियुक्ती

 

रायगड / मानसी कांबळे :- साप्ताहीक खालापूर वादळ चे मुख्य संपादक...केपी न्यूज चैनल, दैनिक कोकण प्रजा, दैनिक कोकण प्रदेश न्यूजचे उपसंपादक...न्यूज जर्नालिस्ट असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष निर्भीड पत्रकार खलील सुर्वे यांची मानवी हक्क, अधिकार व मुल्यांसाठी लढणाऱ्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संघटना डीके फाउंडेशन ऑफ फ्रीडम अँड जस्टिस संघटनेच्या महाराष्ट्र राज्य मंडळ कोकण अध्यक्ष नियुक्ती करण्यात आली. 

महाराष्ट्र राज्य उपमुख्य पर्यवेक्षक फिरोज पिंजारी यांच्या शिफारशीनुसार डीके फाउंडेशन ऑफ फ्रीडम अँड जस्टिस संघटनेचे डायरेक्टर दानिश खान यांनी सदर नियुक्ती केली असून पत्रकार खलील सुर्वे यांच्यावर महाराष्ट्र राज्यात संघटन बाधणी व संघटनेच्या प्रचार, प्रसाराची जबाबदारी देण्यात आली आहे. संचालक मंडळाच्या सूचनांनुसार रायगड जिल्ह्यांमधील रिक्त पदे भरण्यासह संस्थेच्या नियमांनुसार त्या सर्व काम करतील आणि महाराष्ट्रातील संपूर्ण टीमचे पर्यवेक्षण करतील, असे नियुक्ती करतांना डायरेक्टर दानिश खान यांनी सांगितले. 

दरम्यान, नवनियुक्त महाराष्ट्र राज्य मंडळ कोकण अध्यक्ष खलील सुर्वे म्हणाले की, डीके फाउंडेशन ऑफ फ्रीडम अँड जस्टिस संघटनेच्या तत्वानुसार मी महाराष्ट्र राज्यात संघटनेची बांधणी व प्रचार, प्रसार करेल. तसेच संघटनेने माझ्यावर टाकलेली जबाबदारी मी पूर्ण कसोशीने पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहिल, असेही सुर्वे म्हणाले. या निवडीबद्दल सर्व स्तरातून महाराष्ट्र राज्य मंडळ कोकण अध्यक्ष खलील सुर्वे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

कर्जत रेल्वे पोलिसांची प्रामाणिक कामगिरी

 


हरवलेली पिशवी व 21 हजार रुपये प्रवाशाला परत

नरेश जाधव / कर्जत: - प्रामाणिकपणा आणि कर्तव्यनिष्ठेचा उत्तम आदर्श घालून देत कर्जत रेल्वे पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी हरवलेली पिशवी व त्यातील 21 हजार रुपये मालकाला सुखरूप परत केले. या कामगिरीबद्दल प्रवाशांनी कर्जत रेल्वे पोलिसांचे मनःपूर्वक आभार मानले.


मिळालेल्या माहितीनुसार, दि. 14 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 9.00 ते रात्री 9.00 या वेळेत कर्जत रेल्वे स्टेशनवर दिवसपाळी ड्युटी सुरु असताना CRO मार्फत कळविण्यात आले की, मुंबईहून कर्जतला येणाऱ्या सकाळी 11.55 वाजताच्या लोकलच्या CSMT बाजूच्या चौथ्या जनरल डब्यात एक काळ्या रंगाची प्लास्टिक पिशवी राहिली आहे.

त्यानुसार पोलिस शिपाई (ब.क्र. 373) गोरख मासाळ, महिला होमगार्ड मोहिनी जाधव, कल्याणी काळेकर आणि प्रणाली गोळे यांनी तत्काळ गाडी तपासून पिशवी शोधून काढली. पिशवीत महत्त्वाची कागदपत्रे व रोख 21,000 रुपये सापडले.


यानंतर ठाणे अंमलदार महिला पोलिस हवालदार (ब.क्र. 2262) सुमित्रा दोंदे यांनी पिशवीतील तपशीलावरून बदलापूर, जिल्हा ठाणे येथील 69 वर्षीय प्रवासी सय्यद जावेद जफर आबीदी (मो. 8369163873) यांच्याशी संपर्क साधला. चौकशीअंती पिशवी व त्यातील रोकड त्यांना प्रत्यक्ष सुपूर्द करण्यात आली.


आपले हरवलेले पैसे व कागदपत्रे सुखरूप परत मिळाल्याबद्दल सय्यद आबीदी यांनी कर्जत रेल्वे पोलिसांचे कौतुक करत आभार मानले. या संपूर्ण कारवाईत कर्जत रेल्वे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक तानाजी खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित पोलिस व होमगार्ड यांनी प्रामाणिकपणे काम पार पाडले.

खालापूर शहरात तिरंगा यात्रा व पालखी सोहळ्याचे आयोजन...

 


खोपोली / खलील सुर्वे :- देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर खालापूर नगरपंचायत यांच्या वतीने दिनांक 14 ऑगस्ट रोजी तिरंगा यात्रा व पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी विठू नामाच्या गजरात व भारत मातेच्या जयघोषात खालापूर शहरात वातावरण न्हाऊन निघाले. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या 750 वी जयंती चे औचित्य साधत पालखीचे आयोजन करण्यात आले.

विठुरायची पालखी व हातात तिरंगा घेऊन यात्रेची सुरवात स्वामी विवेकानंद विद्या मंदिर येथून करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे महाराजांना अभिवादन करून खालापूर शहरात मार्गक्रमण करत खालापूर तहसील कार्यालय येथे यात्रेचा समारोप करण्यात आला. यात्रे दरम्यान विठू नामाच्या गजर व भारत माता की जय, वंदे मातरम् आणि जय हिंदच्या घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले होते.

या रॅलीत खालापूर नगराध्यक्षा रोशना मोडवे, सभापती किशोर पवार, नगरसेविका लता लोते, नगरसेविका उज्ज्वला निधी, नगरसेविका सुनीता पाटील, नगरसेवक राजेश पारठे, मुख्याधिकारी कोमल कराळे, नायब तहसीलदार मिलिंद तिऱ्हेकर, पोलिस निरीक्षक सचिन पवार, प्रणित भोसले नगरपंचायत रचना सहाय्यक, जितेंद्र यादव नगरपंचायत कार्यालय अधीक्षक, अक्षय तोंडे करनिरीक्षक, सिद्धेश देशमुख लेखापाल व लेखापरीक्षक, दिलीप गायकवाड स्वच्छता निरीक्षक,अशोक सुसलादे सहाय्यक महसूल अधिकारी, गणेश मुंढे, योगराज महाजन, मंडल अधिकारी सचिन वाघ, मंडल अधिकारी भरत सावंत, दिपाली पवार, कविता साळवी, अमोल वाघ, एस आर पाटील मुख्याध्यापक, रोकडे सर, म्हेत्रे सर, माळी सर, सतीश राणे सर, रेश्मा मोटे मुख्याध्यापक, स्वाती शिंदे मॅडम, रामकृष्ण घाडगे सर, अतिश कांबळे सर, सम्यक गायकवाड सर, दिनेश भोईर पोलिस हवालदार, किरण शेळके पोलीस हवालदार, रमेश उघडा पोलिस हवालदार, अश्विनी पापल पोलिस हवालदार, स्वाती चीरमे पोलिस शिपाई, आशिष पाटील पोलीस शिपाई, उद्योजक महेश राठी यांच्या सह विद्यार्थी विद्यार्थिनी, खालापूर नगर पंचायत कर्मचारी वर्ग, स्वामी खालापूर तहसील कर्मचारी, स्वामी विवेकानंद विद्या मंदिर खालापूर शाळा, जी जे इंग्रजी मिडीयम हायस्कूल खालापूर, खालापूर पोलिस स्टेशन कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Wednesday, August 13, 2025

नारंगी ग्रामपंचायत मध्ये विकास कामांची बोंबा बोंब......

 

तरीही सरपंचाला उत्कृष्ट सरपंच म्हणून पुरस्कार..... मिळाला कसा ?

 खालापूर/सुधिर देशमुख:- नारंगी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या पंचशील नगर व आदिवासी वाडी येथील नागरिकांनी आज सकाळी गावात जाणारा रस्ता अडवून

 बैठा आंदोलन वृध्द ,महिला ,तरुण वर्ग व गावातील रहिवाशी यांनी मिळून नारंगी ग्रामपंचायतिच्या विरोधात घोषणा दिल्या ,पंचशिल नगर भागातील मुख्य रस्ता मंजूर होऊन एक वर्ष व सात महिने झाले अनेक वेळा मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन म्हणून एकवीस नारळ आजपर्यंत फुटले .आजच्या घडीला रस्त्याची अवस्था इतकी खराब आहे पावसाळ्यात चिखल आणि खड्या मुळे रहदारी ही मोठे आव्हान बनली आहे शाळकरी मुले, वृध्द, आणि महिला वर्गाना प्रचंड त्रास होत आहे.तसेच संपूर्ण परिसरात रोड वर लाईट न चालू असल्याने रात्रीच्या वेळी अंधाराचे साम्राज्य पसरले आहे त्यामुळे अपघात,चोरी, आणि महिलांच्या सुरक्षाचा प्रश्न गंभीर झाला आहे.गावकऱ्यांनी वेळोवेळी तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.स्थानिक ग्रामस्थांचा विशेष करून महिलांचा उद्रेग दिसून आला.यावेळी प्रशासनाविरोधात बोलताना लोकांनी आपल्या व्यथा मांडल्या,प्रशासन नेहमी तक्रार घेऊन येणाऱ्या लोकांना आश्वासन रुपी चॉकलेट दाखवतात व नागरिकांना पुढील तीन दिवसात काम चालू होईल अशी ग्वाही देतात.

नारंगी ग्रामपंचायतीचे स्थानिक वॉर्ड सदस्य हे प्रशासनाविरोधात नागरिकांबरोबर आंदोलनात दिसून आले.नारंगी ग्रामपंचायत जनतेला रस्ते, वीज, स्वच्छ पाणी,ह्यासारख्या मूलभूत गरजा व सुविधा देऊ शकत नाही आणि त्याच ग्रामपंचायतीच्या सरपंचाला दोन वर्षाचा कालावधी झाला नाही तरीही उत्कृष्ट सरपंच म्हणून पुरस्कार कोणत्या गुणवत्तेवर व कामांवर देण्यात आला असा गंभीर सवाल आंदोलनातील नागरिकांनी बोलून दाखविले.

रायगडचा तिरंगा अदिती तटकरेच्या हाती! राज्य सरकारचा भरतशेठना झटका, शिवसेना संतप्त

 


रायगडच्या ध्वजारोहणावरून शिवसेना-राष्ट्रवादी आमनेसामने

राज्य सरकारचा धक्का, आदिती तटकरेच फडकावणार तिरंगा

 खालापुर/सुधीर देशमुख:- रायगडच्या पालकमंत्रिपदावरून पेटलेला शिवसेना विरुद्ध अजित पवार गटाचा राष्ट्रवादी काँग्रेसचा वाद आता स्वातंत्र्यदिनी तिरंगा कोण फडकावणार, या प्रश्नावर येऊन ठेपला होता. अखेर राज्य सरकारच्या एका परिपत्रकाने हा वाद थेट ‘धगधगत्या’ टप्प्यावर पोहोचवला आहे.

         15 ऑगस्टच्या ऐतिहासिक दिवशी जिल्हा मुख्यालयात ध्वजारोहणाचा मान आदिती तटकरे यांना देण्यात आला आहे. यामुळे हा मान मिळेल, अशी आतुरतेने वाट पाहणारे शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांना जबर धक्का बसला आहे. शिवसेनेतील अनेक नेते व मंत्री “भरतशेठच फडकावतील रायगडचा तिरंगा” असा जाहीर सूर लावून बसले होते. पण, शासनाच्या या निर्णयाने त्यांची स्वप्ने क्षणात चुराडा झाली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच पालकमंत्रिपदावर स्थगिती दिल्याने, "स्वातंत्र्यदिनी तिरंगा कोण फडकावणार?" या प्रश्नावर संपूर्ण रायगडची नजर होती. मात्र सरकारच्या या परिपत्रकाने तिरंगा तटकरे यांच्या हाती दिला आणि शिवसेना-राष्ट्रवादी संघर्षाचा ज्वालामुखी आणखी भडकवला आहे. रायगडमध्ये आता स्वातंत्र्यदिनाच्या उत्सवाइतकाच राजकीय स्फोटाचा काउंटडाऊन सुरू झाला आहे!

Tuesday, August 12, 2025

हाळ खुर्द गावातील पाण्याची टाकी घेतेय अखेरचा श्वास ?

 


मुख्य कॉलमला तडे गेल्याने कोसळण्याची भिती? 

टाकी कोसळल्यास हाळ वासियांचे होणार हाल ? दुर्घटना घडल्यावर प्रशासनाला जाग येणार का ?

खोपोली/खलील सुर्वे :- ग्रामपंचायतीच्या काळात रहिवाशांची तहान भागवून जीवनदायिनी ठरलेली पाण्याची टाकी आज मोडकळीस आली असून, शेवटच्या घटका मोजत आहे. टाकीच्या मुख्य कॉलमला तडे गेल्याने टाकीशेजारी राहणाऱ्या लोकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे रहिवाशांमध्ये भीतीचे सावट पसरले असून, संबंधित प्रशासन दुर्घटना घडण्याची वाट पाहणार आहे का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे. अंदाजे २००३ मध्ये हाळ गावातील रहिवाशांची तहान भागविण्यासाठी पाण्याच्या टाकीचे बांधकाम करण्यात आले होते. या टाकीची अंदाजे ५० हजार लिटर पाणी साठवण्याची क्षमता असल्याचे समजते. मात्र, प्रत्येक वेळी कर्मचारी व स्थानिकांनी तोंडी ग्रामपंचायत व प्रशासकीय अधिकारी यांना वस्तुस्थिती सांगितल्यानंतर सुद्धा टाकी पाडण्याविषयी कुठलीही कारवाई झाली नसून उलट दररोज पाणी भरले जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. पाण्याच्या टाकीला अंदाजे २२ वर्षाचा कालावधी होऊन गेला असल्याची चर्चा आहे. ऊन व पावसाच्या तडाख्याने टाकी मोडकळीस आली आहे. अंदाजे मुख्य एक ते दोन कॉलमची झीज होऊन भरमसाठ वजन पेलण्याची क्षमता नसून, स्लॅब व कॉलमच्या आतील लोखंडी सळ्या उघड्या पडल्या असल्याचे दिसून येत आहेत.

हाळ ग्रामपंचायत कार्यालयच्या जवळच्या अंतरावर ही धोकादायक टाकी उभी आहे. टाकीच्या बाजूच्या जागेत स्थानिक रहिवाशांची घरे असून लहान मुले येथे खेळताना दिसतात. टाकीची अवस्था लक्षात घेता ती कधी कोसळून पडेल याची शाश्वती नाही. त्यामुळे टाकीच्या बाजूला घरांसाठी आलेले विजेची तारे तुटून मोठी जीवितहानी होण्याचा धोका निर्माण झाला आहे. कधी काळी जीवनदायिनी ठरलेली पाण्याची टाकी उद्या हाळकरांचा काळ ठरणार नाही, याची दक्षता घेऊन संबंधित प्रशासनाने पाण्याची टाकी पडायची किंवा दुर्घटना घडण्याची वाट न पाहता, योग्य ती कार्रवाई करावी, अशी मागणी होत आहे. स्थानिक प्रशासन पत्र व्यवहार करीत वेळ काढत हाळ वासियांचे जीव धोक्यात घालत असल्याचे दिसून येत आहे. 


हाळ खुर्द ग्रामपंचायतीची पाण्याची टाकी पाहिल्यावर कुठे थांबावे...कुठे जावे...कुठे धावावे...टाकी कोसळ्यास कसे जीव वाचवावे...अंगावर पडल्यावर काय होणार ?असे अनेक विचार समोर येवून अंगाला कपडा सुटून पायाघालून जमीन सरकते. टाकीच्या कॉलमला तडे...स्लॅबचे व कॉलमच्या लोखंडी सळ्या गंजलेल्या अवस्थेत दिसून येत असतांना या टाकीत पाणी भरण्यासाठी...सोडण्यासाठी...70 वर्षाच्या तरुणाला ठेवण्यात आले असून आज पाण्याच्या टाकीची अवस्था न पाहता पाणी भरले जात असल्याचे ग्रामस्थांमधून बोलले जात आहे. पाण्याची टाकी धोकादायक अवस्थेत असून कोसळण्याच्या वाटेवर असून अखेरचे श्वास घेत असल्याचे चित्र असतांना हाळ वासियांच्या जीवाची कोणतीच काळजी प्रशासनाला राहिलेली नाही का ?टाकी एखाद्या वेळी मध्यरात्रीच्या सुमारास लगत असणाऱ्या राहत्या घरावर तसेच ये-जा करणाऱ्या तसेच कोणत्या तरी धार्मिक सप्ताहाच्या वेळी कोसळल्यावर पाच लाखांची मदत घोषित करण्यासाठी प्रशासनाचे बेजबाबदार अधिकारी, लोकप्रतिनिधी धावत येणार का ? हे अधिकारी, लोकप्रतिनिधी गेलेले जीव परत आणणार का ? प्रशासनाला जाग येणार तरी कधी ? असा संतप्त सवाल ग्रामस्थांमधून उपस्थित होत आहे.

भावी नगरसेवकासाठी सक्षम कार्य व नेतृत्व गुण

 


नागरिकांच्या समस्येला धावून जाणारा " शिवसेना ठाकरे गटाचा कट्टर शिवसैनिक " प्रमोद दादा खराडे !  

मुद्रे ( खुर्द ) परिसरात विश्वसनीय जनसंपर्क......

कर्जत/प्रतिनिधी :- नागरिकांच्या " समस्येला " धावून जाणारा व " सामाजिक बांधिलकीची " जाणीव ठेवणारा अतिशय नम्र स्वभावाचे , सर्वांचा आदर ठेवणारे कर्जत नगर परिषद हद्दीतील मुद्रे खुर्द येथील " प्रमोद दादा खराडे " लोकप्रतिनिधी होण्यासाठी विश्वसनीय जनसंपर्क व सक्षम गुण असलेला " शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे " पक्षाचे कट्टर " शिवसैनिक " आहेत , हे त्यांच्या आजवरच्या कार्यावरून दिसत आहे. 

          प्रमोद दादा खराडे हे तरुण पणापासून " शिवसेनेचे " कट्टर शिवसैनिक आहेत. " हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे " यांच्या विचाराने प्रेरित होऊन शिवसेनेच्या " ज्वलंत अग्निकुंडात " त्यांनी झेप घेत २० टक्के राजकारण व ८० टक्के समाजकारण करत कट्टर शिवसैनिक म्हणून प्रामाणिकपणे काम करत आहेत.सुरुवातीच्या काळात शिवसैनिक म्हणून नागरिकांच्या अनेक समस्या सोडवण्याची धडपड त्यांनी आपल्या प्रभागा बरोबरच कर्जतमध्ये केली.अनेक आंदोलने,मोर्चे,रस्ता धरणे यांत अग्रेसर राहून नागरिकांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी ते " आक्रमक " राहिले . त्यांची हिच धडाडी बघून कालांतराने त्यांना मुद्रे खुर्द " शाखाप्रमुख " पद देण्यात आले. याकाळात देखील त्यांनी अनेक कामे केली , आपल्या प्रभागातील नागरिकांच्या समस्या , व्यायाम शाळेचा प्रश्न , छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचा प्रश्न , उल्हास नदी स्वच्छता , स्मशानभूमी , रस्ते , पाणी , वीज यामध्ये त्यांची मुख्य भूमिका राहिली . तरुणांना " मैदानी खेळाची " आवड असावी म्हणून " कबड्डी " खेळाला प्राधान्य देत तरुणांचा कबड्डी संघ तयार केला व प्रमोद दादा खराडे यांनी मुद्रे खुर्द कबड्डी संघाचे अध्यक्षपद देखील भूषवले.

         कोरोनाच्या काळामध्ये अनेक नागरिकांना घरपोच गरजेच्या वस्तू पोहोचविले , यावेळी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता हे काम त्यांनी केले. त्यांच्या या धडाडीच्या कार्याची पोच पावती म्हणून " शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे " यांच्या आदेशाने " उपजिल्हाप्रमुख नितीन दादा सावंत " यांनी पक्ष वाढीसाठी डॅशिंग शिवसैनिक व सर्वांना मदतीला धावणारे प्रमोद दादा नाना खराडे यांची " कर्जत उपशहरप्रमुख " पदी नेमणूक करण्यात आली.

         कर्जत नगर परिषदेच्या येणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कुठल्या पक्षाबरोबर युती करणार की नाही..? की स्वबळावर निवडणुका लढणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे मतदार ठाम असल्याने नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी शिवसेना ठाकरे पक्षाचे मोठं महत्त्व राहणार आहे . म्हणूनच त्यांची उमेदवारी मुद्रे प्रभागात महत्वाची ठरणार असून जो आदेश पक्ष प्रमुख देतील ते नम्रपणे पाळणारे प्रमोद दादा खराडे हे निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार असून पक्ष काय भूमिका घेते , याकडे आता सर्वांचेच लक्ष लागून आहे . भावी नगरसेवकासाठी असलेले कार्य व नेतृत्वगुण असल्याने नागरिकांच्या " हाकेला " धावून जाऊन समस्या सोडविणाऱ्या अशा " लढवय्या नेतृत्वास " नगर परिषदेत लोकप्रतिनिधी म्हणून निवडून जाणे योग्य ठरेल. नगरसेवक म्हणून पक्षाने त्यांना संधी देऊ केल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला अधिक गतिशील करून पक्षाचा " भगवा झेंडा " पालिकेवर नक्कीच डौलाने फडकण्यास शिवसैनिक प्रमोद दादा नाना खराडे यांचा हातभार असेल,यांत शंकाच नसेल.

सुरक्षेचे बंध आणि स्नेहबंधन; कर्जत पोलीस ठाण्यात रक्षाबंधन

 


कर्जत महिला आघाडीचा अनोखा रक्षाबंधन सोहळा

कर्जत शहर महिला आघाडी अध्यक्ष सौ. शर्वरी कांबळे यांचा पुढाकार 

नरेश जाधव / कर्जत:- आज दिनांक 11 ऑगस्ट रोजी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा कर्जत शहराध्यक्ष सौ. शर्वरी संतोष कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली कर्जत पोलीस ठाण्यात रक्षाबंधनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.

रोजच्या जीवनात पोलीस बांधव आपल्या कुटुंबापासून दूर राहून जनतेच्या रक्षणासाठी अहोरात्र कार्यरत असतात. जेव्हा नागरिक आपापले सण-उत्सव साजरे करतात, तेव्हा हे पोलीस बांधव आपले कर्तव्य पार पाडत असतात. त्यांच्या या निस्वार्थ सेवेसाठी आणि भाव-भगिनीच्या नात्याचा सन्मान राखण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही सौ. शर्वरीताई कांबळे यांच्या पुढाकाराने रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमास वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. भोसले साहेब तसेच इतर पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी पोलीस बांधवांना राखी बांधून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी सौ. शर्वरी कांबळे यांनी आपल्या भाषणात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या वेळी पोलीस बांधवांनी प्रत्येक महिलेच्या पाठीशी भावाप्रमाणे उभे राहून तिचे रक्षण करावे, असे आवाहन केले.

सदर कार्यक्रमास भारतीय जनता पार्टीच्या महिला पदाधिकाऱ्यांची लक्षणीय उपस्थिती होती. यामध्ये माजी प्रदेश उपाध्यक्षा सौ. कल्पनाताई दास्ताने, रायगड जिल्हा उपाध्यक्षा सौ. स्नेहाताई गोगटे, कर्जत तालुका चिटणीस वर्षाताई सुर्वे, तालुका उपाध्यक्षा सौ. रजनीताई गायकवाड, तालुका सरचिटणीस सौ. राधा बहुतुले, शहर उपाध्यक्षा सौ. मनीषाताई अथणीकर, सौ. धनश्री जोशी, सौ. सुमनताई यादव, सौ. स्मिताताई औरंगाबादकर तसेच सर्व महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

रक्षाबंधनाच्या या उपक्रमामुळे पोलीस व नागरिक यांच्यातील आपुलकीचे बंध अधिक दृढ झाले असून, हा उपक्रम भावी पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल.