अनोखा संकल्प अनोखी वचनपूर्ती,रुक्मिणी फाउंडेशनचा उपक्रम.
खालापुर/सुधीर देशमुख:- अनेकजण आपल्या आयुष्यात संकल्प करतात तर अनेकजण समाजाला आश्वासन देत असतात. मात्र ते पूर्णतःवस नेण्याची जबाबदारी त्यांना पेलवत नसल्याने ते आपले आश्वासन अर्धवट सोडतात आणि त्यातूनच जनतेची भ्रमनिराशा होते.मात्र रुक्मिणी फाउंडेशनने जनतेला दिलेला शब्द पाळत आपण दिलेले आश्वासन पूर्णतःवास नेण्याकडचे पहिले पाऊल आज टाकले आहे.खालापूर तालुक्यातील निसर्गाच्या सांनिध्यात वसलेले होनाड ग्रामपंचायत हद्दीतील चिंचवळी गोहे हे गाव.या गावातील नागरिक अनेक समाजपयोगी कार्यक्रम वर्षभर राबवीत असतात.त्यांना साथ देत गावातील तरुणवर्ग दरवर्षी एकता चषकाचे आयोजन करीत असते.गावातील तरुनांची एकता या सामन्यातून सर्वांना दिसत आली आहे.याच सामन्या दरम्यान संपूर्ण सामन्यात जेव्हडे शटकार खेळाडू मारतील तेव्हडी झाडे रुक्मिणी फाउंडेशनकडून लावण्यात येतील असे आश्वासन रुक्मिणी फाउंडेशनचे संस्थापकीय अध्यक्ष राज रमेश पाटील यांनी उपस्थिताना दिले होते.याच आश्वासनाची वचनपूर्ती करीत होनाड ग्रामपंचायतीचे सरपंच प्रकाश पाटील आणि वनविभाग अधिकारी भगवान दळवी यांच्या उपस्थितीत वृक्ष लागवडीचा पहिला टप्पा पूर्ण करीत वृक्षरोपण केले.यावेळी वृक्षरोपण करताना खोदलेला खड्डा आणि रोपाची विधिवत पूजा होनाड ग्रामपंचायतीचे सरपंच प्रकाश पाटील यांच्या हस्ते करून शिवसेना उपतालुका प्रमुख प्रवीण पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून वृक्षरोपण केले.त्याचप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य गणेश पाटील,वर्षा पाटील,आशा पाटील,पोलीस पाटील दिनेश पाटील यांच्या हस्ते वृक्षरोपण करीत ही रोप वाढविण्याची जबाबदारी त्यांना देण्यात आली.तसेच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या हस्तेही वृक्षरोपण करण्यात आले.अध्यक्ष राज पाटील यांच्या कुटुंबियांनीही या उपक्रमात सहभाग घेत वृक्षरोपण केले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले सरपंच प्रकाश पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना,रुक्मिणी फाउंडेशनचे भरभरून कौतुक करीत वृक्षरोपण ही काळाची गरज बनली आहे.


0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home