हमसे टकराएगा मिट्टी में मिल जाएगा अशी घोषणा बाजी देत खालापुर तहसील कार्यालय समोर भीमशक्तीचे ठिय्या आंदोलन !
ठिय्या आंदोलन स्थगित पण लढा सुरू ठेवणार .... गोपाळ यशवंतराव तंतरपाळे .
खालापुर/प्रतिनिधी :- कुंभिवली येथील मौजे वीरगाव व मौजे चिंचवली खोपोली येथील शेतकऱ्यांची फसवणूक ज्ञानेश्वर गायकवाड व सहकाऱ्यांनी केल्याचा आरोप भीमशकी संघटनेने केला आहे.या विरोधात सोमवार दिनांक 14 जुलै रोजी खालापूर तहसील कार्यालया समोर ठिय्या आंदोलन करत दोषींवर कारवाई झाली नाही तर आत्मदहनाचा इशारा भीमशक्ती संघटनेचे सरचिटणीस गोपाळ तंतरपाळे यांनी दिला आहे.रात्री उशिराने खालापूर तहसीलदार यांच्या मध्यस्थीने भीमशक्तीचे ठिय्या सध्या तरी आंदोलन स्थगित केले असून पुढील लढा सुरू राहील असे आंदोलन कर्त्यानी सांगितले व हमसे टकराएगा मिट्टी में मिल जाएगा अशी जोरदार घोषणा बाजी आंदोलन कर्त्यानी केली.
तसेच याबाबत ज्ञानेश्वर गायकवाड यांनी खुलासा देताना सांगितले की भीमशक्ती संघटनेचे सरचिटणीस गोपाल तंतरपाळे हे गोरगरीबांना ज्ञाय मिळवून देण्यासाठी राज्यभर आंदोलन करतात. परंतू त्यांनी या प्रकरणाची कागदपत्रे तपासून माझ्या विरोधात आरोप करायला हवे होते अशी भूमिका मांडली आहे. माझ्यावरील आरोप सूडभावनेने केले आहेत याबाबत मी अब्रू नुकसानीचा दावा करणार आहे असे ज्ञानेश्वर गायकवाड यांनी खुलासा करताना सांगितले आहे...



0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home