अंबपवाडी येथील मिटर जोडणीस आलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांना हाकलले
कोल्हापुर/किशोर जासूद :- मागील काही दिवसांपासून अंबपवाडीसह परिसरातील गावांमध्ये स्मार्ट मीटर जोडणी मोहीम महावितरणे सुरू केली आहे. ग्राहकाला स्मार्ट मीटरचा विरोध असतानाही स्मार्ट मीटर जोडले जात होते. मंगळवारी अंबपवाडी (ता. हातकणंगले) येथे स्मार्ट मीटर जोडणीस आलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांना येथील महिलांनी हाकलून लावले.
ग्राहकाला एखादी वस्तू नको असताना विनाकारण त्याच्या माथी मारणे हे कोणत्या कायद्यात बसते. स्मार्ट मीटर बसवायचे असल्यास अगोदर धन दांडग्यांच्या बंगल्यावर मोठमोठ्या कंपन्यांत बसवा शेतकऱ्यांच्या माथी मारू नका. असा पवित्रा घेत गावातील नागरिक व महिलांनी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मिटर जोडणीपासून रोखत धारेवर धरले.


0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home