Posts

Showing posts from October, 2025

देगलूर नगर परिषदेच्या निवडणुकीत अनुभवी युवकांना संधी मिळाली पाहिजे - सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद अमीर

Image
                                         नां देड /जावेद अहमद :- आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये देगलूर नगर परिषदेच्या निवडणुकीत अनुभवी युवकांना सर्वच राजकीय पक्षांनी सामाजिक कार्याच्या अनुषंगाने जे युवक अनेक वर्षापासून सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत ते लोकांच्या अडीअडीचणी सोडवितात सदैव सामाजिक कार्यात तत्पर असतात.  अनुभवी युवकांना सर्वच राजकीय पक्षांनी संधी द्यावी असे प्रतिपादन देगलूर येथील सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद अमीर यांनी केले आहे. हल्ली उठ सूट कोणीही युवक आपल्याला पक्षाकडून तिकीट भेटावं यासाठी प्रयत्न करीत आहेत. अनुभवी युवांना जर राजकीय पक्षांनी संधी दिली तर शहराचा विकास होईल. सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद अमीर यांनी सांगितले.

खोपोली नगर परिषदेत जनसेवा की जनछळ ?

Image
  * जन्म-मृत्यू दाखल्यांत मनमानी, नागरिकांवर अरेरावीचे सावट * लिपिकांच्या वागणुकीवर प्रश्नचिन्ह ; तक्रारी असूनही प्रशासन मौन खोपोली / खलील सुर्वे :- खोपोली नगर परिषदेमधील नागरी सुविधा केंद्राचा उद्देश नागरिकांना सहज, सुलभ आणि सन्मानपूर्वक सेवा देण्याचा आहे, पण प्रत्यक्षात या केंद्रात नागरिकांशी अरेरावी, दुर्लक्ष, विलंब व मनमानी अशी चित्रे दिसत असून, “लोकसेवक की लोकत्रासक ? असा प्रश्न नागरिक उपस्थित करू लागले आहेत. खोपोली नगर परिषद नागरी सुविधा केंद्रातील जन्म-मृत्यू दाखला विभागातील कर्मचारी कैलास देशमुख यांच्या मनमानीच्या तक्रारी अनेक नागरिकांनी केल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी पत्रकार संघटनेच्या वतीने लेखी तक्रार देखील करण्यात आली होती.  जन्म-मृत्यू दाखले नोंदीचे योग्यरीत्या परीक्षण न करता “नोंद नाही” असे उत्तर देणे, नावातील अक्षरे वगळणे /दुरुस्तीच्या नावाखाली मनमानी बदल करणे, वरिष्ठ आदेश न पाळणे तसेच नागरिकांशी उद्धट वर्तन करणे असे आरोप त्यांच्याविरुद्ध आहेत. * जेवणाची वेळ 1 ते 4 ? :- केंद्राच्या अधिकृत वेळेतही सेवा न देता, दुपारी 1 ते 4 दरम्यान जेवणाचा ब्रेक घेतल्याचा आरोप...

दिलीप भोईरांसह 21 जणांना सात वर्षे सक्तमजुरी जिल्हा न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Image
रायगड | जिल्हा प्रतिनिधी :- चोंढी नाक्यावर घातक शस्त्राने मारहाण केल्याप्रकरणी शिंदे गटातील दिलीप भोईर उर्फ छोटमशेठ यांच्यासह 21 जणांना जिल्हा न्यायालयाने दोषी ठरवत सात वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्येकी तीन हजार रुपये दंड अशी शिक्षा गुरुवारी (दि.30) सुनावली. एकूण 25 आरोपींपैकी चार आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. जिल्हा प्रमुख न्यायाधीश राजेंद्र सावंत यांनी ही शिक्षा सुनावली. या प्रकरणात विशेष सरकारी अभियोक्ता म्हणून ॲड. प्रसाद पाटील यांनी काम पाहिले. या निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते.  मिळालेल्या माहितीनुसार, बहिरोळे येथील रुपाली थळे या चोंढी येथील व्हिटेवा कॉम्प्युटर क्लासमध्ये 11 सप्टेंबर 2012 रोजी सायंकाळी 60 मुलांचे वर्ग घेत होत्या. त्यांच्याकडे काम करणारा भूषण साबळे याला चहासाठी काही वस्तू आणण्यासाठी पाठविले होते. भूषणसोबत शाहबाज खानही गेला होता. ते दोघे बराच वेळ परत आले नाही. त्यामुळे त्यांना बाहेर पाहण्यासाठी थळे या गेल्या होत्या. त्यावेळी चोंढी नाक्यावर भूषण साबळे व शाहबाज खान यांना अतिष सुर्वे, सज्जाद मुल्ला, विक्रम साळुंखे व विक्रांत कुरतडक...

खोपोलीत नागरिकांच्या एकतेचा विजय!

Image
  सभागृहापासून रस्त्यावरच्या लढ्यापर्यंत * डंपिंग ग्राउंड हटवून पर्यटन स्थळाची घोषणा * सुभाषनगरवासीयांनी लिहिला नवा इतिहास खोपोली / मानसी कांबळे :- “एकता हीच शक्ती” हा केवळ बोधवाक्य नसून सुभाषनगर परिसरातील ग्रामस्थांनी तो प्रत्यक्षात सिद्ध केला आहे. खोपोलीतील डंपिंग ग्राउंडच्या विरोधात नागरिकांनी सुरू केलेला संघर्ष अखेर यशस्वी ठरला असून, संबंधित जागेवर कचरा डेपो रद्द करून पर्यटन स्थळाचा आराखडा मंजूर झाल्याची माहिती नगरसेवक मंगेश नारायण दळवी यांनी दिली. सुभाषनगर परिसरात कचरा डेपोसाठी प्रस्ताव दाखल झाला होता. दुर्गंधी, प्रदूषण, आरोग्याच्या धोक्याचा प्रश्न आणि नागरिकांच्या नाराजीला खतपाणी घालणारा हा निर्णय रद्द करण्यासाठी नागरिक गेली अनेक महिने संघर्ष करीत होते. अखेर सर्व ग्रामस्थ एकत्र आले आणि आवाज बुलंद केला व निर्णय बदलला. * जनतेच्या एकतेचा पराक्रम :- “आम्ही हक्क मागितला, सरकारने ऐकले” डंपिंग ग्राउंडविरोधातील चळवळीचे नेतृत्व स्थानिक नागरिकांसोबत नगरसेवक मंगेश दळवी यांनी केले. त्यांचा ठाम दावा आहे की, आपण एकत्र आल्यानंतर काय होऊ शकते याचे हे उदाहरण आहे. निवेदने, बैठका, स्थानिक प्रश...

100 कोटीचा भुयारी गटार प्रकल्प, पण शहराच्या माथी उचलली चिखल-खड्ड्यांची शिक्षा!

Image
  * खोपोलीत विकासाचा दावा, वास्तवात रस्ते व्हेंटिलेटरवर    दोन वर्षे उलटली, काम अजूनही अर्धवट ; नागरिकांचा संताप उसळला खोपोली / खलील सुर्वे :- खोपोली शहरातील बहुचर्चित 100 कोटींच्या भुयारी गटार प्रकल्पाने शहरवासीयांच्या संयमाची परीक्षा घेतली आहे. ठेकेदाराने रस्ते खोदून पाईप टाकले, मात्र त्यानंतर त्या जागेची दुरुस्ती न केल्याने शहरातील रस्ते खड्ड्यांच्या छत्रछायेखाली गेले आहेत. रस्त्यावर मोठमोठे दगड, मातीचे ढीग, चिखल आणि पावसाच्या पाण्यात साचणारे प्रदूषण यामुळे खोपोलीकर त्रस्त झाले आहेत. योजनेला सुरुवात होऊन साधारण दोन वर्षांचा काळ उलटला, तरीही काम वरकरणी ‘आय.सी यू.मध्ये’ आणि रस्त्यांची अवस्था ‘व्हेंटिलेटर’वर असल्याचे चित्र दिसत आहे. * रस्ते की रणांगण ? :- शहरातील अनेक भागांमध्ये, चिंचवली शेकीन (DP रोड) सह शहरातील अनेक रस्त्याच्या अगदी मध्यभागी चर खोदण्यात आले. पूर्वी चांगल्या स्थितीत असलेले रस्ते आता खड्डे, माती आणि चिखलाने विद्रूप झाले आहेत. पाईपच्या जागी बसविलेल्या मातीचे बांधकाम खचत असल्याने चेंबर आडवे टांगलेल्या स्थितीत ‘डोके वर काढून’ दिसत आहेत. वाहनधारकांचे नाकीनऊ ...

पहिल्याच प्रयत्नात शिवसेनेसाठी ऐतिहासिक विजय नोंदविन्यास सज्ज...

Image
  संदीप राम पाटील हे खोनपा प्रभाग क्रमांक 1 मधील ( सर्वसाधारण ) नंबर 1 चा ठरणार विजयी उमेदवार : खोपोली/प्रतिनिधी :- तरुणांच्या गळ्यातील ताईत संदीप राम पाटील हे खोपोली नगरपालिका परिषद प्रभाग क्रमांक 1 चे नंबर 1 चे उमेदवार ठरत आहेत.हक्काने मदतीला येणारा त्यांचा स्वभाव व जोडलेला प्रचंड जनसंपर्क हा त्यांच्या जमेची बाजू आहे. सुभाषनगर, जगदीशनगर,लौजी, वासरंग येथील मोठा जनसमुदाय सोबत असुन शिवसेना ( शिंदे गट ) मध्ये कुलदीपक शेंडे, दिलीप जाधव यांच्या सोबतीने त्यांचा शेकडो समर्थकासह झालेला प्रवेश हा लक्षनीय आहे.आमदार महेंद्र थोरवे यांच्या विजयात पडद्याआडून योगदान देणाऱ्या चेहऱ्यात संदीप पाटील यांचे नाव अग्रणी आहे.अजातशत्रू असलेले संदीप पाटील यांच्या रूपाने विकासाचा चेहरा स्थानिक जनतेला मिळणार असुन एव्हाना त्यांनी प्रचाराची पहिली फेरी पूर्ण केल्याची चर्चा मतदारसंघात पहावयास मिळत आहे. अचूक निर्णयक्षमता व सर्वाना सोबत घेऊन कार्य करण्याची त्यांची तत्परता खोपोली नगरपालिका निवडणुकीत 2025 मधील पहिले सर्वसाधारण गटातील विजयी उमेदवार ठरून ऐतिहासिक चेहरा ठरतील या उत्साहाने खोपोली परिसरातील समर्थक व पक्ष...

रामदास पाटील सुमठाणकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

Image
                                  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शेकडो पदाधिकाऱ्यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश आगामी निवडणुकांसाठी नांदेड जिल्हा पक्ष संघटनेत उत्साह देगलूर/ प्रतिनिधी :- नांदेड हा काँग्रेस विचाराचा जिल्हा असून काँग्रेस पक्ष कार्यकर्त्यांचा पक्ष आहे तो नेत्यांचा पक्ष नाही. आजही नांदेड जिल्हा काँग्रेस विचाराचाच आहे व उद्याही काँग्रेस विचाराचाच राहिल. काँग्रेस पक्षात इतर पक्षातून येणाऱ्यांचा ओघ वाढत आहे. काल गडचिरोलीत आज नांदेड जिल्ह्यात तर उद्या जालना जिल्ह्यात पक्ष प्रवेश होत आहे.  यावेळी हर्षवर्धन सकपाळ म्हणाले कि, हा राहुल गांधी यांच्या संघर्षाचा परिणाम असून काँग्रेस विचारावर विश्वास ठेवून हे पक्ष प्रवेश होत आहेत याने पक्षाला बळ मिळत असून महाराष्ट्रात काँग्रेसला गतवैभव प्राप्त होतील. तसेच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत विरोधकांचा सुपडासाफ करा, या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या विधानावर बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत त्यांचेच दात त...

खोपोलीत स्वच्छतेचा बोजवारा आणि भ्रष्टाचाराचा झोळा!

Image
  * वर्षाला 12 कोटी स्वच्छतेवर खर्च, तरी शहरात दुर्गंधीचा डंका! * मुख्याधिकारी जोमात...पण जिल्हाधिकारी कोमात ? आपचे शहराध्यक्ष खान यांचा सडेतोड सवाल! खोपोली / खलील सुर्वे :- “स्वच्छतेचे मिशन मोठे, पण शहर दुर्गंधीने गच्च!” असे चित्र सध्या खोपोली शहराचे झाले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दरवर्षी तब्बल 12 कोटी रुपये खर्च करूनही शहरात अस्वच्छतेचा ‘राजा’ मिरवतोय, आणि प्रशासन मात्र फाईलच्या सावलीत झोपलेले दिसते. खोपोलीकरांना विचारायचे आहे, हे स्वच्छतेचे पैसे गटारात गेलेत का की, अधिकाऱ्यांच्या वातानुकूलित कॅबिनमध्ये ? कधी जागे होणार.  * 12 कोटींचा खर्च...पण शहर दुर्गंधीत बुडालंय :- नगर परिषद लेखापाल संतोष तळपे यांनी कबूल केलंय की, दरवर्षी 10 ते 12 कोटी रुपये स्वच्छतेसाठी खर्च होतात. मग प्रश्न असा की, या पैशांनी नेमके काय स्वच्छ केले जाते ? शहरात गटारे तुडुंब भरलेली, नाल्यांमधून दुर्गंधीचा महोत्सव आणि मोकाट जनावरांनी कचऱ्यावर मेजवानी लावलीय! हे सगळं पाहून खोपोलीकर म्हणतात की, स्वच्छ भारत मिशन इथे नाही, इथे ‘घाणेरडे शहर मिशन’ सुरू आहे. * सकाळी थम लावा, दुपारी घरी पळा :- नगर ...

पेट्रोलचा दर वाढतोय…पण पंपावर सुविधा घटल्यात !

Image
  खालापूरच्या भारत पेट्रोलियम पंपावर ग्राहकांचा आक्रोश  * पंपावर खड्ड्यांची राज्यश्री, डबक्यांमध्ये पेट्रोल भरा म्हणणारे कर्मचारी मोबाईलवर गप्पा मारत व्यस्त...स्थानिक प्रशासन झोपेत की ‘पंपात’ हिस्सा आहे ? खालापूर / खलील सुर्वे :- खालापूर तालुक्यातील पेट्रोल पंपांवर सुरक्षा, सुविधा आणि स्वच्छता या तिन्ही गोष्टींची अवस्था “भारतीय रस्त्यांसारखीच...खड्ड्यांनी भरलेली!" शासनाचे नियम म्हणजे फक्त ग्राहकांसाठीच काय ? पंप मालक आणि कर्मचारी हे “सुविधा अपवाद” आहेत का ? असा सवाल नागरिकांनी थेट तहसिलदार व स्थानिक प्रशासनाला केला आहे. * भारत पेट्रोलियमचा कृष्णा पंप की खड्ड्यांचा तलाव ? :- खालापूर तहसील कार्यालयापासून अवघ्या दोनशे मीटर अंतरावर असलेल्या भारत पेट्रोलियमच्या कृष्णा पेट्रोलियम पंपावर सध्या पाण्याचे राज्य आहे...पेव्हर ब्लॉक खचले, टेमक्या उखडल्या, आणि खड्डे इतके खोल की पंपाच्या नावाऐवजी “कृष्णा तलाव” म्हणावे असेच चित्र आहे. ग्राहक वाहन पेटवतात तेवढ्यातच गाडी खड्ड्यात बुडते आणि पेट्रोल भरण्यासाठी डबक्यांमध्ये उभे राहणे म्हणजे दररोजचा व्यायाम! गाडी स्वच्छ आणली तरी परत निघेपर्यंत मात...

देगलूर शहरात ऑनलाइन विवाह प्रमाणपत्र प्रक्रिया सुरू करण्याची नागरिकांची मागणी

Image
  देगलूर/जावेद अहमद :- देगलूर शहरात विवाह प्रमाणपत्रासाठी अद्यापही सुरू असलेल्या ऑफलाइन प्रक्रियेमुळे नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणीं विरोधात आता आवाज उठू लागला आहे. या प्रक्रियेला शक्य तितक्या लवकर ऑनलाइन स्वरूप दिले जावे, अशी मागणी शेख मुजममील अहमउल्ला यांनी उपविभागीय अधिकारी देगलूर यांना निवेदनाद्वारे केली आहे. सध्या शहरात विवाह प्रमाणपत्र हस्तलिखित पद्धतीने देण्यात येत असल्याने, प्रमाणपत्रासाठी अतिरिक्त कागदपत्रांची मागणी, कार्यालयीन दौरे तसेच विविध शासकीय कार्यालयांमध्ये प्रमाणपत्र नाकारले जाणे, अशा प्रकारच्या अनेक समस्या नागरिकांसमोर निर्माण होत आहेत. विशेष म्हणजे देगलूर तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये ही प्रक्रिया ऑनलाइन स्वरूपात सुरू असतानाही, शहरात मात्र अद्याप जुनीच प्रक्रिया कायम आहे. त्यामुळे नवविवाहितांना प्रमाणपत्र मिळविण्यासाठी वारंवार फेऱ्या माराव्या लागत असून वेळ आणि खर्चात टपट वाढ होत आहे. ऑफलाइन स्वरूपातील विवाह प्रमाणपत्र अनेक शासकीय योजनांमध्ये, मतदार नोंदणी, आधार अद्ययावतीकरण, पासपोर्ट तसेच अन्य कागदपत्रांमध्ये मान्य नसल्याने नागरिकांना अर्ज नाकारला जातो....

गिरड - सिर्सी रस्त्यावर कार - ट्रकची भीषण धडक

Image
  * 24 वर्षीय तरुण चालक जागीच ठार, तीन जखमी * तुळजापूर दर्शनावरून परततांना घडला अपघात  * वडील, बहीण व दीड वर्षांचा भाचा गंभीर जखमी नागपूर /  प्रतिनिधी :- दिवाळीच्या भाऊबीजेच्या आनंदावर शोककळा ओढणारी दुर्दैवी घटना गिरड - सिर्सी रस्त्यावर रविवारी रात्री घडली. तुळजापूर दर्शन करून परत येत असलेल्या एका कुटुंबाचा कार अपघातात भीषण मृत्यू झाला, तर त्याच कुटुंबातील तीन जण गंभीर जखमी झाले. हा अपघात रविवार 27 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास गिरड - सिर्सी मार्गावरील ‘सॅटीस्फॅक्शन बार’ जवळ झाला. * अपघातात तरुण चालकाचा जागीच मृत्यू :- प्रा थमिक माहितीनुसार, एम. एच. 30 ए. झेड. 5192 क्रमांकाच्या एर्टिगा कारने एम. एच. 32 क्यू. 2362 क्रमांकाच्या आयसर ट्रकला समोरून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात हिमांशू आत्माराम गोन्नाडे (वय 24, रा. आरमोरी, जि. गडचिरोली) यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रसंगी सोबत असलेले वडील आत्माराम सोनाजी गोन्नाडे (वय 58), बहीण शिवानी द्रोहीत धकाते (वय माहित नाही), भाचा एशित द्रोहीत धकाते (वय दीड वर्ष) हे सर्व गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने कस्तुरबा हॉस...

भ्रष्टाचारमुक्त भारतासाठी पत्रकारांचा संकल्प!

Image
  प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि सुशासन यांची शपथ * न्यूज जर्नालिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष फिरोज पिंजारी यांचा पुढाकार रायगड / प्रतिनिधी :- भ्रष्टाचारमुक्त आणि नैतिकतेवर आधारित भारत घडविण्याच्या दिशेने ‘न्यूज जर्नालिस्ट असोसिएशन’ ने ऐतिहासिक पाऊल टाकत ‘Integrity Pledge’ (प्रामाणिकतेची शपथ) घेतली आहे. या शपथपत्रावर संस्थापक अध्यक्ष फिरोज पिंजारी यांच्या स्वाक्षरीने समाजात प्रामाणिकतेचा आणि जबाबदारीचा संदेश देण्यात आला आहे. हा उपक्रम महाराष्ट्रातील पत्रकार आणि सामाजिक संस्थांसाठी नव्या नैतिक दिशादर्शनाचा प्रारंभ ठरत आहे. * पत्रकारांचा प्रामाणिकतेचा संकल्प - भ्रष्टाचार नाही, जबाबदारी आणि पारदर्शकता आमचा धर्म :- पत्रकार संघटनेच्या या शपथपत्रात नमूद करण्यात आले आहे की, भ्रष्टाचार हा देशाच्या आर्थिक, सामाजिक आणि राजकीय प्रगतीसाठी मोठा अडथळा आहे. शासन, नागरिक आणि खाजगी क्षेत्र या सर्वांनी मिळून त्याचे उच्चाटन करणे ही काळाची गरज आहे. संघटनेने या शपथेतून नैतिक मूल्यांचे पालन, पारदर्शकता, न्याय्य व्यवसाय पद्धती आणि जबाबदार पत्रकारिता या तत्त्वांचे पालन करण्याचा निर्धार केला आहे. * शपथपत्रातील प्र...

खोपोली नगराध्यक्षपदासाठी डॉं. सुनील पाटील यांचा झंझावात

Image
  * राष्ट्रवादीतून दमदार एन्ट्री, कार्यालय उद्घाटनाने निवडणुकीचा ज्वर चढला! * शिंदे गटातून राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर डॉं. पाटील झाले ‘गेमचेंजर’ * ताकई येथे खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन खोपोली / मानसी कांबळे :- आगामी खोपोली नगर परिषद निवडणुकीच्या रणशिंगावर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आणि खोपोली नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष डॉं. सुनील गोटीराम पाटील यांचे नाव जोरदार चर्चेत आहे. राष्ट्रवादीत प्रवेश केल्यापासूनच डॉं. सुनील पाटील यांनी खोपोलीच्या राजकारणात नवा ‘पॉलिटिकल झंझावात’ निर्माण केला आहे. त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन ताकई येथे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते झाले. या उद्घाटन सोहळ्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत आता डॉं. पाटील हे ‘हॉट फेव्हरेट’ बनले आहेत. * राष्ट्रवादीत नवसंजीवनी :- अलीकडेच शिवसेना शिंदे गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करताच डॉं. सुनील पाटील यांना प्रदेश उपाध्यक्षपद देऊन पक्षाने त्यांच्यावर ...

विघ्नहर्ता सार्वजनिक उत्सव मंडळ ( नियोजित ) म्हाडा वसाहत शिरढोण आधारस्तंभ व पत्रकार सामाजिक कार्यकर्ते तथा पशू प्रेमी यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा...

Image
  ठाणे/प्रतिनिधी :- ठाणे जिल्ह्यातील व कल्याण तालुक्यातील मौजे शिरढोण येथे सामाजिक बांधिलकी जपणारा विघ्नहर्ता सार्वजनिक उत्सव मंडळाचे आधारस्तंभ यांचा वाढदिवस म्हाडा वसाहत शिरढोण परिसरातील “ आधारस्तंभ ” म्हणून परिचित असलेले सुबोध सावंत यांनी यंदाचा आपला वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपत अत्यंत साधेपणाने आणि जनसेवेच्या माध्यमातून 43 वा साजरा केला. शुभदिनी (ता. 25 ) त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांमध्ये युवा पिढीसाठी क्रिकेट च संपूर्ण साहित्य देण्यात आले. तसेच उद्घाटन म्हाडा वसाहत येथे पार पडले. नागरिकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला. तसेच वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्याच्या हेतूने ठिकाणी सेवा उपक्रम राबविण्यात आले. त्यात या प्रसंगी परिसरातील नागरिक, कार्यकर्ते व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक भगवान पोपळे कार्याध्यक्ष गणेश यावलकर खजिनदार गणेश महाजन सचिव गणेश पारेकर संतोष किर्ते बाळू यावलकर गणेश वटे दिनेश नागणे अक्षय चालखोर संदीप कदम अमोल कुळवेकर रांजणे प्रज्वल पाटील भितेश पवार अमोल टोपे श...

नायगाव ते शेळगाव छत्री रस्ता खड्डेमय — हजारो विद्यार्थ्यांचे जीव धोक्यात

Image
  नागरिकांकडून मुख्यमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांना तातडीने कारवाईची मागणी, अन्यथा मतदानावर बहिष्काराचा इशारा नांदेड/ जावेद अहमद : - नायगाव ते शेळगाव छत्री हा मुख्य मार्ग सध्याखड्डेमय झाल्यामुळे नागरिक, शेतकरी, विद्यार्थी व नोकरदार वर्ग प्रचंड त्रस्त झाला आहे. दररोज हजारो विद्यार्थी या मार्गाने शाळा आणि महाविद्यालयात जातात. रस्त्याची अत्यंत वाईट अवस्था झाल्यामुळे अपघातांची शक्यता वाढली असून जनजीवन धोक्यात आले आहे. स्थानिक नागरिकांनी सांगितले की, “गेल्या अनेक महिन्यांपासून रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय आहे. प्रशासन व लोकप्रतिनिधी यांचे लक्ष वेधूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे आता जनतेचा संयम संपत चालला आहे.”  शेळगाव छत्री येथील नागरिक अविनाश विठ्ठलराव अनेराये यांनी मुख्यमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री यांना ई-मेलद्वारेअर्ज पाठवून रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. त्यांनी अर्जात नमूद केले आहे की, जर रस्त्याचे काम लवकर हाती घेण्यात आले नाही तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नागरिक मतदानावर बहिष्कार टाकतील.या विषयावर सार्वजनिक ...

संरक्षित वन्यजीव प्राण्याचे मांस वाडगाव येथून जप्त!

Image
  अलिबाग वन विभाग आणि पोलिसांची संयुक्त कारवाई * आरोपीला अटक ; वन्यजीव संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल रायगड / प्रतिनिधी :- वन्यजीवांच्या संरक्षणासाठी सक्त कायदे असूनही बेकायदेशीररीत्या मांस विक्री आणि साठवणुकीच्या घटना सुरूच आहेत. अशीच एक धक्कादायक घटना अलिबाग तालुक्यातील वाडगाव येथे उघडकीस आली आहे. संरक्षित वन्यजीव प्राण्याचे सुमारे 1 किलो वजनाचे मांस बाळगल्याप्रकरणी अलिबाग वन विभागाने पोलिसांच्या मदतीने छापा टाकून एकाला अटक केली आहे. या कारवाईमुळे वन्यजीव तस्करीविरोधातील मोहिमेला मोठे यश मिळाले असून परिसरात खळबळ उडाली आहे. * संयुक्त कारवाई - गुप्त माहितीवरून छापा :- 23 ऑक्टोबर 2025 रोजी अलिबाग पोलिस ठाण्याच्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे वाडगाव येथील जयेंद्र काशिनाथ भगत (वय 49) यांच्या घरावर छापा टाकण्यात आला. या कारवाईदरम्यान घरातून संशयास्पद वन्यजीव प्राण्याचे मांस जप्त करण्यात आले. सदर मांसाचा नमुना सिल करून प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे, ज्यातून कोणत्या प्रजातीच्या प्राण्याचे मांस आहे हे स्पष्ट होणार आहे. * वन्यजीव संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा ...

फक्त एका तासांत कर्जत ते पनवेल प्रवास

Image
  पनवेल–कर्जत रेल कॉरिडॉर अंतिम टप्प्यात मार्च 2026 पर्यंत सुरू होणार नवी लाईन ! प्रवाशांचा 30 मिनिटांचा प्रवास वेळ वाचणार आधुनिक रेल्वे तंत्रज्ञान आणि कनेक्टिव्हिटीच्या नव्या युगाकडे वाटचाल  कर्जत / राजेंद्र शिवाजी जाधव :- पनवेल ते कर्जत हा प्रवास लवकरच अधिक वेगवान, सोयीस्कर आणि अखंड होणार आहे. कारण पनवेल - कर्जत रेल्वे कॉरिडॉर प्रकल्प आता आपल्या अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. एकूण 2,782 कोटी रुपयांचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प 79 टक्के पूर्ण झाला असून, मार्च 2016 पर्यंत तो जनतेसाठी सुरू केला जाणार आहे, अशी अधिकृत माहिती मिळाली आहे. * फक्त एक तासात कर्जत - पनवेल प्रवास :- प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर प्रवाशांना सुमारे 30 मिनिटांचा वेळ वाचणार आहे. सध्या पनवेल - कर्जत दरम्यानचा प्रवास साधारण दीड तासांचा असतो, पण या नव्या कॉरिडॉरमुळे प्रवासाचा वेळ फक्त एक तासावर येणार आहे. या रेल्वे लाईनची एकूण लांबी 29.6 किलोमीटर असून पनवेल, चिखले, मोहोपे, चौक आणि कर्जत या पाच प्रमुख स्थानकांवर काम जवळपास पूर्णत्वास आले आहे. प्रवाशांसाठी अत्याधुनिक सुविधा, स्वच्छ प्लॅटफॉर्म, डिजिटल माहिती फलक आणि ऑपर...

नगरदेवळ्यात “अल-खिदमत फाउंडेशन”तर्फे 2 नोव्हेंबर रोजी भव्य इज्तेमाई निकाह सोहळा

Image
फाउंडेशनच्या प्रतिनिधींकडून जिल्हा पोलिस अधीक्षक डॉं. महेश्वर रेड्डी यांना विशेष आमंत्रण नगरदेवळा / फिरोज पिंजारी :- नगरदेवळा येथे येत्या 2 नोव्हेंबर 2025 रोजी “अल-खिदमत फाउंडेशन” या सामाजिक संस्थेच्या वतीने पहिल्यांदाच भव्य इज्तेमाई निकाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याचे आमंत्रण फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतेच जळगाव जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक डॉं. महेश्वर रेड्डी यांना प्रत्यक्ष भेट देऊन दिले. यावेळी सैय्यद अय्याज अली, फरीद खान, सुफियान शेख, अनिस बागवान, दानिश सय्यद, अबरार खान आदी उपस्थित होते. * धर्म, समाज आणि ऐक्याचा संगम :- “अल-खिदमत फाउंडेशन” ही सामाजिक संस्था समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी विविध सेवा उपक्रम राबवते. आगामी इज्तेमाई निकाह कार्यक्रम हा सामाजिक एकात्मता, साधेपणा आणि मानवी मूल्ये यांचे प्रतिक ठरणार आहे. या कार्यक्रमात एकाच मंचावर अनेक जोडप्यांचे विवाह इस्लामी रीतीने संपन्न होतील. * सामाजिक जबाबदारीची नवी व्याख्या :- फाउंडेशनचे पदाधिकारी म्हणाले की, आम्ही विवाहासारख्या महत्त्वाच्या सोहळ्याला साधेपणाने साजरा करण्याचा संदेश देत आहोत. समाजातील गरजू ...

फलटण डॉंक्टर तरुणी मृत्यू प्रकरणावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया!

Image
  कोणताही दोषी असो - प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष, त्याला सोडणार नाही ; पण घटनेचे राजकारण करू नका - देवेंद्र फडणवीस सातारा / प्रतिनिधी :- फलटण उपजिल्हा रुग्णालयातील तरुण महिला डॉंक्टरच्या आत्महत्येने संपूर्ण राज्य हादरले असून, या प्रकरणाने आता राजकीय वादळाचे रूप घेतले आहे. या घटनेनंतर विरोधकांकडून राज्य सरकार आणि पोलिस प्रशासनावर तीव्र टीका केली जात आहे. दरम्यान, या प्रकरणात भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे नाव जोडले गेल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखेर यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्र्यांचे आश्वासन - कोणालाही वाचवणार नाही :- मुख्यमंत्री तथा गृहमंत्री फडणवीस म्हणाले की, या प्रकरणात योग्य ती आणि निष्पक्ष चौकशी केली जाईल. कोणीही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष या प्रकरणात सहभागी असल्याचे पुरावे मिळाल्यास, त्याला सोडले जाणार नाही. परंतु, या घटनेचे राजकारण करणे योग्य नाही. त्यांनी पुढे स्पष्ट केले की, विरोधकांकडून या दुर्दैवी घटनेला जाणीवपूर्वक राजकीय रंग दिला जात आहे. आम्ही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, न्याय मिळवण्यासाठी सर्व आवश्यक ती पावले उचलली ज...

नदी उशाला कोरडं घशाला...सुभाषनगर ग्रामस्थ पाण्याविना त्रस्त!

Image
    आठ दिवसांपासून नळ कोरडे ; कर आणि पाणीबिल भरूनही नागरिकांना मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवणाऱ्या नगर परिषद प्रशासनावर ग्रामस्थ संतप्त! खोपोली / मानसी कांबळे :- खोपोली नगर परिषद हद्दीत येणाऱ्या सुभाषनगर परिसरातील नागरिक गेल्या आठ दिवसांपासून तीव्र पाणीटंचाईने त्रस्त झाले आहेत. “नदी जवळ, टाक्या भरल्या... पण नळ कोरडेच!” अशा शब्दांत रहिवाशांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. * बिल वेळेवर, पण पाणी वेळेवर नाही :- सुभाषनगर मधील रहिवाशांनी पाणी बिल आणि कर वेळेवर भरलेले असतानाही, नियमित पाणीपुरवठा मिळत नसल्याचा आरोप केला आहे. आम्ही प्रामाणिकपणे सर्व कर भरतो, मग आमचे पाणी कुठे जाते ? अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिली. * नगर परिषदेच्या निष्क्रीयतेवर टीका :- या तक्रारी अनेक वेळा पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांना दिल्या गेल्या, तरीही कोणतीही कारवाई झालेली नाही. कर्मचारी फक्त उडवाउडवीची उत्तरे देतात, ‘उद्या येईल, परवा येईल’ म्हणतात, पण पाणी येत नाही, असे नागरिकांनी सांगितले. नगर परिषदेच्या प्रशासनाला प्रत्येक घराचे पाणी बिल भरले आहे की नाही हे माहीत असते, मात्र कोणत...

भारतीय जनता पार्टी धामणी तर्फे दीपावलीच्या औचित्याने भव्य रांगोळी स्पर्धा

Image
    35 हून अधिक महिलांचा उत्स्फूर्त सहभाग सृजनशीलतेचा आणि संस्कृतीचा सुंदर संगम रंगला खोपोली / खलील सुर्वे :- दिवाळी म्हणजे आनंद, प्रकाश आणि कलात्मकतेचा उत्सव आणि त्याच उत्सवाला अधिक रंगतदार बनवत भारतीय जनता पार्टी धामणी तर्फे भव्य रांगोळी स्पर्धा 2025 चे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेला स्थानिक महिलांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला असून 35 ते 40 महिला सहभागी झाल्या. रांगोळ्यांच्या माध्यमातून पारंपरिकतेसोबतच सामाजिक संदेश देणाऱ्या कल्पक कलाकृती साकारण्यात आल्या आणि संपूर्ण परिसर रंगीबेरंगी सौंदर्याने उजळून निघाला. सृजनशीलतेचा उत्सव - महिलांचा उत्स्फूर्त सहभाग :- धामणी गावातील महिला कलाकारांनी आपल्या कल्पकतेचा आणि परंपरेचा सुंदर मिलाफ सादर करीत दिवाळीच्या मंगल वातावरणात रंगांची उधळण केली. रांगोळ्या केवळ सजावटीपुरत्या मर्यादित न राहता, त्यांनी सामाजिक संदेश, व्यक्तिचित्रे आणि राष्ट्रभक्तीपर थीम्स साकारल्या. रंग म्हणजे भावना आणि रांगोळी म्हणजे त्या भावनांचे कलात्मक प्रदर्शन, असे एका सहभागी महिलेने सांगितले. महिलांच्या कल्पकतेला मिळाले बक्षीस :- या भव्य रांगोळी स्पर्धेत महिलांनी सादर ...

“बच्चों ने बनाया रायगढ़ किला, पर बगल में लगे बैनर ने भड़काई सियासी बहस!”

Image
रायगढ़ / अमुलकुमार जैन  :- रायगढ़ ज़िले के रोहा तालुका के तळाघर महादेववाड़ी में बच्चों ने अपनी कल्पना और मेहनत से रायगढ़ किले की शानदार प्रतिकृति बनाई है। लेकिन इस किले के ठीक पास मंत्री आदिती तटकरे का बैनर लगने से अब ये कला सियासी चर्चा का केंद्र बन गई है। ‘शिव समर्थ नगर’ इलाके में बच्चों ने बड़ी लगन से रायगढ़ किले की झांकी तैयार की है। इस किले को देखने के लिए लोगों की भारी भीड़ उमड़ रही है। लेकिन बगल में लगा बैनर — जिस पर लिखा है “रायगढ़ किले और ज़िले की रखवाली करने वाली” — अब चर्चा का कारण बना हुआ है। कुछ लोगों का कहना है कि यह मंत्री आदिती तटकरे के काम का सम्मान है, जबकि दूसरों का कहना है कि “बच्चों की रचनात्मकता में राजनीति को नहीं मिलाना चाहिए।” एक तरफ बच्चों की कल्पकता ने सबका दिल जीत लिया है, तो दूसरी तरफ उसी किले के पास लगा बैनर रायगढ़ की सियासत में नई हलचल मचा रहा है।  

“पेहचान प्रोजेक्ट” – आदिवासी समाजाच्या ओळखीचा प्रवास

Image
  खालापुर कर्जत / सुधीर देशमुख : टाटा स्टील फाऊंडेशन यांच्या उपक्रमा अंतर्गत व अश्वपरीस फाऊंडेशन, खोपोली यांच्या सहकार्याने “पेहचान प्रोजेक्ट” अंतर्गत निशुल्क जात प्रमाणपत्र वितरण व जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचा शुभारंभ २३ सप्टेंबर २०२५ रोजी खोपोली येथे करण्यात आला असून, हा प्रकल्प खालापूर तालुक्यातील आदिवासी कुटुंबांना स्वतःची ओळख निर्माण करून देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आला आहे. या प्रकल्पाचे प्रमुख उद्दिष्टे खालीलप्रमाणे आहेत : जात प्रमाणपत्राच्या महत्त्वाबाबत जागरूकता निर्माण करणे.,लक्ष्यित कुटुंबांना प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी महसूल विभागाशी समन्वय साधणे., शासनाच्या विविध सेवा व सवलतींचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचवणे., वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणून त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणे., समान हक्क, सन्मान आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश समाजात पोहोचवणे., प्रत्येक घटकाला स्वावलंबी बनवून समाजाच्या प्रगतीसाठी एकत्र आणणे. या उपक्रमात अश्वपरीस फाऊंडेशनचे कार्यकर्ते गावोगावी व वाड्यावाड्यांत जाऊन आदिवासी समाजाशी संवाद साधत आहेत व त्यांना शासन योजनांचा लाभ मिळव...

जोरदार वादळ-पावसाने झोपडी जमीनदोस्त

Image
  सुदैवाने सर्व कुटुंब वाचले : देवतारी त्याला कोण मारी!* वावंढळ गावातील कातकरी कुटुंबाचा थरारक अनुभव ; नशिबाने वाचला जीव, पण उडाला निवारा खालापूर / अर्जुन कदम :- खालापूर तालुक्यातील वावंढळ या आदिवासी वस्तीत काल संध्याकाळी आलेल्या अचानक वादळ-पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला. सुरेश बारकू कातकरी यांच्या झोपडीवर वाऱ्याने कहर करत क्षणात ती जमीनदोस्त केली. सुदैवाने कुटुंबातील सदस्य त्या वेळी बाहेर असल्याने मोठी जीवितहानी टळली. मात्र, झोपडी उद्ध्वस्त झाल्याने हे संपूर्ण कुटुंब आता बेघर झाले आहे.   डोळ्यांसमोर घर कोसळले :- सुरेश बारकू कातकरी यांचे छोटेसे कुटुंब रोजंदारी करून उदरनिर्वाह करते. मोलमजुरीचा दिवस संपवून आई घरी परतली होती. रात्र झाली तशी झोपडीत उकाडा जाणवू लागल्याने ती नातवंडांना घेऊन अंगणात आली. मुले खेळत होती, आजोबा बारकू गणपत कातकरी ओसरीवर बसून त्यांचा खेळ पाहत होते. तेवढ्यातच आकाशात काळेकुट्ट ढग जमले आणि जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाची हजेरी लागली. काही क्षणांतच झोपडी हलू लागली, छपरावरील कौल व ताडपत्री उडू लागली आणि धाडकन आवाज करीत संपूर्ण झोपडी कोसळली.   देवतारी त्याल...

शिवाजी जाधव : लोकांमध्ये राहून काम करणारा नेता

Image
  पत्रकार जाधव यांचा जनसंपर्कातून प्रभाव वाढला   यशवंतनगर परिसरातील विकासकामांत महत्त्वाची भूमिका खोपोली / प्रतिनिधी :- खोपोली शहरातील यशवंतनगर व शिळफाटा परिसराचा चेहरा पालटविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या स्थानिक नेत्यांपैकी पत्रकार शिवाजी जाधव यांचे नाव गेल्या काही काळात विशेष चर्चेत आले आहे. समाजकार्य, लोकसंपर्क आणि परिसरातील प्रत्येक समस्येवर थेट काम करणारा नेता म्हणून शिवाजी जाधव यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. परिसरातील रस्ते, गटारे आणि सार्वजनिक सोयीसुविधांच्या कामांत त्यांनी सातत्याने पाठपुरावा करून लोकांपर्यंत विकास पोहोचविण्याचे काम केले आहे. स्थानिक रहिवासी सांगतात की, शिवाजी जाधव हे आमच्यातलेच आहेत. ते प्रत्येक कार्यक्रमात, सामाजिक उपक्रमात, अगदी लोकांच्या दुःखद प्रसंगातही हजर असतात. लोकांशी त्यांचा संवाद आणि आत्मीयता हीच त्यांची खरी ताकद आहे. यशवंतनगर परिसरात आज अनेक विकासकामांना गती मिळाली असून, नागरिकांमध्ये “आपल्या भागातील बदलामागे शिवाजी जाधव यांचा मोठा वाटा आहे” अशी चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे, जाधव यांनी कोणतेही राजकीय पद नसतानाही परिसरातील व...

युवा नेते रुपेश सुधा सुरेश देशमुख खोनपा प्रभाग क्रमांक 10 ( सर्वसाधारण ) मधील प्रबळ दावेदार

Image
  खोपोली/प्रतिनिधी :- आमदार महेंद्र थोरवे यांचे विश्वासू शिलेदार म्हणून ज्यांना पाहिले जाते असे युवा सैनिक रुपेश सुधा सुरेश देशमुख हे खोपोली नगरपालिका परिषद प्रभाग क्रमांक 10 चे बलाढ्य उमेदवार ठरत आहेत.हसमुख चेहरा, सर्वाना समजुन घेण्याची आकलन शक्ती आणि मदतीसाठी नेहमी तत्पर असणारे रुपेश देशमूख सर्व समाजात आवडते व्यक्तिमत्व असुन युवा वर्गात ते युथ आयकॉन म्हणून ओळखले जातात.रोट्रॅक्ट क्लब ऑफ खोपोलीच्या माध्यमातून सामाजिक कार्य केलेले असल्याने तसेच विविध सामाजिक संस्था मधुन कार्यरत असुन प्रभावी जनसंपर्क असलेले रुपेश देशमुख यांना ऍडमिन कामाची पद्धत चांगल्या प्रकारे अवगत आहे. कमी तेथे आम्ही या उक्तीप्रमाणे पडद्यामागे मोलाची भूमिका ते नेहमीच बजावतात त्यांच्या दिलदार स्वभावामुळे अल्पवधितच त्यांनी सर्वांची मने जिंकली आहेत. आमदार महेंद्र थोरवे हे रुपेश देशमुख यांच्या चाणक्यनितीने प्रभावीत असुन पक्ष संघटन वाढविण्यात रुपेश देशमुख अग्रस्थानी असतात. खोपोली शहरातून युवा सेनेच्या माध्यमातून कार्यरत असणारे युवा सेना सचिव रुपेश देशमुख यांच्या कामाचा प्रचंड व्याप पाहता प्रभाग क्रमांक 10 मधुन सर्वसाधा...

आमदार महेंद्र थोरवे यांची राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे साहेब यांची दिवाळी निमित्त सदिच्छा भेट....

Image
  साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेला सण म्हणजे दिवाळी पाडवा आज दिवाळी पाडव्यानिमित्त शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे साहेब यांना आमदार महेंद्र थोरवे यांनी भेटून मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. यावेळी आमदार थोरवे म्हणाले कि, साहेबांच्या सहवासात लोकसेवा विकास आणि जनहिताची नवी प्रेरणा मिळाली, दिपावली च्या शुभेच्छा देऊन जनतेच्या मनात असलेल्या अनेक लोकाभिमुख योजना पूर्ण करण्यासाठी सतत कार्यरत आहे ह्याची खात्री करून दिली.

आमदार श्री महेंद्र थोरवे यांच्याकडून आशा वर्कर्सचा दिवाळी सन्मान...

Image
  आशा वर्कर च्या मानधनाचा विषय येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये मांडणार .... आमदार श्री महेंद्र थोरवे   खालापुर कर्जत /सुधीर देशमुख :- कर्जत–खालापूर मतदारसंघातील आरोग्य सेवेचा कणा मानल्या जाणाऱ्या आशा वर्कर्सचा दिवाळीनिमित्त आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. आरोग्य क्षेत्रात, विशेषतः कोरोना काळात मोलाची भूमिका बजावणाऱ्या आशा वर्कर्सच्या सेवाभाव आणि निष्ठेबद्दल आमदारांनी कृतज्ञता व्यक्त केली. या प्रसंगी आमदार थोरवे यांनी प्रत्येक आशा वर्करला मानधन आणि मिठाई देऊन शुभेच्छा दिल्या. “ग्रामीण भागात आरोग्य सेवेसाठी तुम्ही देवदूत आहात. कठीण परिस्थितीतही सेवाभावाने काम करणाऱ्या आशा वर्कर्समुळेच सरकारची आरोग्य व्यवस्था सक्षम राहिली आहे  आशा वर्कर्सना केवळ अल्प मानधनावर काम करावे लागते, तरीही त्या समाजातील प्रत्येक घटकापर्यंत आरोग्यसेवा पोहोचवतात. या पार्श्वभूमीवर त्यांच्या मानधनवाढीसाठी आणि आवश्यक सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून आरोग्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा सुरू असून येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये मानधनाचा मुद्दा हा सभागृहामध्ये मांडणार असल्याचे सांगितले. “आपल...

धरण लबालब, तरी नळ कोरडेच !

Image
नगरदेवळा ग्रामपंचायतीच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह ! पूरानंतरही पाण्याची टंचाई ; सणासुदीला नागरिकांच्या सहनशक्तीची कसोटी! नगरदेवळा / प्रतिनिधी :- नगरदेवळा गावाने सप्टेंबर महिन्यात तुफान पावसाचा तडाखा सोसला. ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये अग्नावंती नदीच्या उगमस्थानावर मुसळधार पाऊस झाल्याने धरण अक्षरशः लबालब भरले. मात्र, धरण भरल्याने एकीकडे नदीला दोन वेळा भीषण पूर आला. इतका की मुख्य बाजारपेठेत पाणी शिरले आणि व्यवहार पूर्ण ठप्प झाले. पण आज, त्याच गावात दिवाळीसारख्या सणासुदीतही नागरिकांच्या नळाला कोरडाच प्रतिसाद मिळतोय. पूराचे भय गेले, पण पाण्याचा तुटवडा कायम :- पूर ओसरल्यानंतर गावकऱ्यांना वाटले की आता तरी नळाला वेळेवर पाणी येईल, पण उलटे घडले. उन्हाळ्यासारखेच आता पावसाळ्यानंतरही 5 ते 10 दिवसांनी नळातून पाणी येते. काही घरांमध्ये तर दोन आठवडे पाणी दिसले नाही. धरण लबालब असूनही गावात पाण्याची टंचाई का निर्माण झाली, हा ग्रामस्थांचा ज्वलंत प्रश्न आहे.   दिवाळीचा आनंद की त्रास ? :- दिवाळीचा सण, सुट्ट्यांचा काळ- घराघरात माहेरवाशीण मुली, मुंबई-पुणे, नाशिकहून परतलेले मुलगे, नातवंडांचा गोतावळा अशा वातावरणात पा...

विनय कदम प्रकरणात केंद्रीय मंत्री डॉं. रामदास आठवले यांचा हस्तक्षेप!

Image
  तुषार तानाजी कांबळे यांच्या अखंड पाठपुराव्यामुळे नॅशनल इन्शुरन्स कंपनीने दिला न्यायाचा शब्द ; सात वर्षांच्या प्रतीक्षेनंतर न्याय मिळण्याची आशा मुंबई / प्रतिनिधी :- विक्रोळी (पूर्व) येथील रहिवासी विनय साहेबराव कदम हे गेल्या सात वर्षांपासून सहानुभूतीच्या नियुक्तीच्या (Compassionate Appointment) प्रकरणात न्याय मिळविण्यासाठी झगडत आहेत. त्यांच्या या सातत्यपूर्ण संघर्षात आता केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉं. रामदास आठवले यांनी थेट हस्तक्षेप केला असून, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) श्रमिक ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश सचिव तुषार तानाजी कांबळे यांच्या अखंड पाठपुराव्यामुळे प्रकरणाला नवा न्यायाचा मार्ग मिळाल्याची चिन्हे आहेत. सात वर्षांचा संघर्ष आणि प्रशासनाचा मौन प्रतिसाद :- विनय कदम यांच्या मोठ्या भावाचा, स्व. सुधीर साहेबराव कदम यांचा 2 मे 2018 रोजी अपघाती मृत्यू झाला. ते नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड येथे डेप्युटी मॅनेजर पदावर कार्यरत होते. भावाच्या निधनानंतर त्यांच्या वडिलांनी 5 जुलै 2028 रोजी कंपनीकडे विनय कदम यांना सहानुभूती नियुक्तीवर घेण्याची विनंती केली. विनय कदम यांनी ...

सौ. शिल्पा कैलास पाटील यांना रायगड जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त

Image
  खालापुर कर्जत/सुधीर देशमुख :- अलिबाग – रायगड जिल्हा परिषदेच्या नारंगी तोंडली केंद्र शाळेच्या केंद्रीय मुख्याध्यापक सौ. शिल्पा कैलास पाटील यांना “आदर्श शिक्षक सन्मान २०२३-२४” पुरस्काराने कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले व आदिती ताई तटकरे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. हा सन्मान सोहळा सोमवार, दिनांक १३ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी २.३० वा. RCF हॉल, कुरूळ, अलिबाग येथे संपन्न झाला. सौ. शिल्पा कैलास पाटील यांनी आपल्या शिक्षक कारकिर्दीची सुरुवात राजीप शाळा चांभार्ली येथून केली. आठ वर्षे त्यांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासावर भर देत उल्लेखनीय काम केले. त्यानंतरच्या बारा वर्षांच्या काळात त्यांनी राजिप शाळा होराळे येथे कार्यरत राहून आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी विशेष प्रयत्न केले. सलग तीन वर्षे शाळेचा शंभर टक्के शिष्यवृत्ती निकाल लावण्याचा मान त्यांच्या नेतृत्वाखाली शाळेला मिळाला. मुख्याध्यापक म्हणून काम करत असताना शाळेच्या विविध क्षेत्रांतील उत्कृष्ट कामगिरीमुळे अनेक पुरस्कार मिळवले.  सन २०२३ पासून त्यांनी केंद्रीय मुख्याध्यापक म्हणून नारंगी तोंडली केंद्र शाळेचा पदभा...

खोपोली नगर परिषदेत ‘महासामना’ रंगणार !

Image
    शिवसेना, राष्ट्रवादी, भाजप, महाविकास आघाडी - सगळेच रिंगणात उमेदवारीच्या स्पर्धेत ‘कौन कुणाचा, आणि कुणाचा कोण?’ खोपोली / फिरोज पिंजारी :- खोपोली नगर परिषद निवडणुकीचा बिगुल वाजला आहे आणि शहरात राजकीय तापमान चांगलेच चढले आहे. नगराध्यक्ष पद सर्वसाधारण असल्याने इच्छुकांची रांग एवढी लांब झाली की, उमेदवार ठरवणे म्हणजे आता निवडणुकीपूर्वीचे युद्ध ... असे स्थानिक राजकीय वर्तुळात म्हटले जात आहे. एकीकडे शिवसेना शिंदे गट, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, भाजप आणि महाविकास आघाडी अशा सगळ्याच गटांनी आपल्या घोडदौडीला सुरुवात केली आहे. कौन कुणाचा आणि कुणाचा कोण ? :- शिवसेना शिंदे गटात उमेदवारीसाठी चुरस तीव्र झाली आहे. माजी उपनगराध्यक्ष कुलदीपक शेंडे, माजी उपनगराध्यक्ष राजू गायकवाड, वैद्यकीय आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉं. शेखर जांभळे ही नावे जोरदार चर्चेत आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून माजी नगराध्यक्ष डॉं. सुनील पाटील, माजी नगराध्यक्ष दत्तात्रेय मसुरकर, गटनेते मंगेश दळवी ही नावे चर्चेत आहेत. भाजपकडून युवा नेते विक्रम साबळे आणि अश्विनीताई पाटील या दोघांमध्ये स्पर्धा...