Posts

Showing posts from May, 2025

केएमसी एनसीसी कॅडेट राज्यस्तरीय कॅम्पमध्ये अव्वल

Image
  कॅप्टन शितल गायकवाड यांच्या मार्गदर्शन, कौशल्य आणि मेहनतीची प्रशंसा  खोपोली/मानसी कांबळे : - 5 महाराष्ट्र गर्ल्स बटालियन मुंबई ग्रुप A यांनी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय कॅम्प व त्या अनुषंगाने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये खोपोली येथील केएमसी (KMC) कॉलेजच्या एनसीसी कॅडेट यांनी कॅप्टन शितल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहभाग घेत एक मोठे यश मिळवले आहे. या यशाने कॅडेटच्या शिस्तबद्धता, नेतृत्व आणि देशभक्तीच्या भावनांवर प्रकाश पडला आहे. एनसीसी कॅडेटच्या या राज्यस्तरीय कॅम्पमध्ये केएमसी एनसीसी कॅडेटने प्रथम क्रमांक पटकाविला आहे.  दरम्यान, एनसीसी कॅडेटचा राज्यस्तरीय कॅम्पमध्ये प्रथम क्रमांक मिळविणे हे केवळ एक यश नाही, तर ते विद्यार्थ्यांच्या विकासासाठी एक प्रेरणादायी उदाहरण आहे, जे त्यांच्यात शिस्त, नेतृत्व आणि देशभक्तीच्या भावना वाढवते जो एनसीसी (NCC) च्या मुख्य मूल्यांपैकी एक आहे. एनसीसी आत्मविश्वास, शिस्त, जबाबदारी आणि स्वावलंबन यासारखे गुण जोपासते, जे कॅडेटच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात, अशी प्रतिक्रिया कॅप्टन शितल गायकवाड यांनी व्...

खोपोली शहरात खोपोली खालापूर तालूका संघर्ष समिती राबविणार नवीन संघर्ष पॅटर्न...

Image
  * शहराप्रती असणाऱ्या मागण्याचा गांभीर्याने विचार करून सुधारणा न केल्यास समस्याची काढणार प्रतिकात्मक अंत्ययात्रा व नागरिकांचा मोर्चा.. * सुविधा देत नसल्यास कर घेऊ नका यासाठी खोपोली शहरातील समस्यांबाबत संघर्ष समिती आक्रमक....  *समस्या न सोडविल्यास जबाबदार अधिकारी यांच्यावर कारवाईची मागणी... खोपोली/मानसी कांबळे :- खोपोली शहरात समस्यांचे पेव फुटलेले आहे.नागरी समस्या सोडविण्यात प्रशासन सपशेल अपयशी ठरत आहे.खोपोली खालापूर संघर्ष समितीच्या माध्यमातून नेहमीच प्रशासनाकडे विनम्र पाठपुरावा करीत असतो. परंतु बऱ्याच वेळा आश्वासन देऊन नंतर पाठ फिरविली जाते असा अनुभव वाढत आहे.तत्परतेने काम केल्यास खोपोली नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी यांचा सन्मानही समितीकडून राखला जातो. गेल्या काही महिन्यात शहराची अवस्था दयनीय झालेली आहे. पाण्याची समस्या,रस्त्याच्या समस्या,गटाराच्या समस्या,आरोग्याच्या समस्या,वाढत्या अनधिकृत टपऱ्या समस्या,वाहतूक समस्या,घंटा गाडी समस्या,नदी प्रदूषण समस्या,पार्किंग समस्या,गार्डनची समस्या,मुलांसाठी स्विमिंग पूल,क्रिडांगण समस्या,भाड्याने दिलेल्या मिळकत वरील आकरण्यात येणाऱ्या करा...

खोपोलीत पार पडली पाताळगंगा आरती

Image
   सहज सेवा फाउंडेशनचा उपक्रम  महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी आरती खोपोली / मानसी कांबळे :- खोपोली शहराची औद्योगिक तसेच नागरी जीवनाची तहान पाताळगंगा नदीमुळे भागत आहे. आपल्या शहरात लाभलेल्या या वरदानाचे महत्त्व जनमानसात पोहोचविण्यासाठी नवीन संकल्प म्हणून खोपोली येथील गगनगिरी आश्रमासमोरील नदी भोवतालच्या पटांगणात नदीच्या स्वच्छतेबाबत जागरुकता निर्माण होण्यासाठी सहज सेवा फाऊंडेशनच्या माध्यमातून नदी आरती व पूजन महोत्सव उत्साहात पार पडले. या वेळी नदीचे संवर्धन व स्वच्छता ठेवण्याचा संकल्प करण्यात आला. खोपोली येथील उगम पावणाऱ्या पाताळगंगा नदीपात्रात अनेक ठिकाणी कचरा टाकण्यात येतो. बऱ्याच ठिकाणी सांडपाणी नदीत सोडले जाते. कंपनीच्या दूषित पाण्यामुळे बारमाही वाहणारी पाताळगंगा नदी प्रदूषित होत चालली आहे. प्रशासनाने जागरूक राहून नदी प्रदूषित होण्यापासून कठोर पावले उचलावीत. वाया जाणाऱ्या पाण्याचे जतन करावे. नदीवर शहराच्या सौंदर्यात भर घालणारे सुशोभिकरण करावे, अशी मागणी सहज सेवा फाऊंडेशनतर्फे करण्यात येत आहे. तसेच जनसामान्यात जागरुकता येण्यासाठी 'आपली नदी, आपली जबाबदारी' या उपक्रमाचे आयोजन ...

खोपोली शहरातील समस्यांबाबत प्रतिकात्मक अंत्ययात्रा

Image
  * खोपोली खालापूर संघर्ष समितीचा पुढाकार खोपोली / प्रतिनिधी :- खोपोली शहरात समस्यांचे पेव फुटलेले आहे. नागरी समस्या सोडविण्यास खोपोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक सपशेल अपयशी ठरले आहेत. खोपोली खालापूर संघर्ष समितीच्या माध्यमातून नेहमीच प्रशासनाकडे विनम्र पाठपुरावा होत असतो, परंतु बऱ्याच वेळा आश्वासन देऊन नंतर पाठ फिरविली जाते असा अनुभव समितीस येत आहे. गेल्या काही महिन्यात शहराची अवस्था दयनीय झालेली आहे. पाण्याची समस्या, रस्त्याच्या समस्या, गटाराच्या समस्या, आरोग्याच्या समस्या, वाढत्या अनधिकृत बांधकामाच्या समस्या, वाहतूक समस्या, घंटागाडीची समस्या, नदी प्रदूषण समस्या, पार्किंग समस्या, गार्डनची समस्या, मुलांसाठी स्विमिंग पूल, शहरातील वृक्षतोड यासारख्या समस्या सोडविण्यात खोपोली नगर परिषद प्रशासन अपयशी ठरले आहे. वेळेत कर न भरल्यास दंडात्मक कारवाई करणारे प्रशासन सुविधा देण्यात कमी पडत आहे. नागरिक कर भरतात तर त्यांना सुविधा मिळणे हा हक्क आहे. नगर परिषदेने नागरिकांची सनद म्हणून तक्रार आल्यानंतर कार्यवाही करताना निश्चित कालावधीत पूर्ण करीत नसल्याने त्या काळात ते काम न झाल्यास कर्...

प्रदूषण नियंत्रण कार्यालयासमोर बंडखोर सेना पक्षा तर्फे जोरदार निदर्शने

Image
    कोल्हापुर प्रतिनिधी/ किशोर जासुद :- कुपवाड औद्योगिक वसाहतीतील केमिकल कंपन्यांवर कारवाईच्या मागणीसाठी बंडखोर सेना पक्षातर्फे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली.यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करून संबंधितांवर कारवाई करावी अन्यथा २७ मेपासून बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. कुपवाड एमआयडीसीतील बेकायदेशीर केमिकल इंडस्ट्रीजमधून सोडण्यात येणाऱ्या विषारी पाण्यामुळे सावळी,बामणोळी,काननवाडी, मिरज, कुपवाड गावांतील जमिनी खराब होत आहेत नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.यामुळे या केमिकल इंडस्ट्रीज कंपन्यांचे परवाने रद्द करावेत,अशी मागणी केली. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्रीय अधिकारी संजीव रेदासनी यांना निवेदन देण्यात आले.यावेळी प्रदेश उपाध्यक्ष नीलेश मोहिते,कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष विजय लोखंडे,हातकणंगले तालुका अध्यक्ष सुरेश आवळे,हातकणंगले तालुका युवक अध्यक्ष अभिषेक भंडारे,अजय साळवे,राहुल देडे, नारायन गाडे,सुशीला जाधव,गौतम कांबळे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

सम्राटबाबा महाडीक यांनी घेतले डॉ. नायकवडी समाधीचे दर्शन; गौरवभाऊ नायकवडी यांच्याकडून सत्कार*

Image
  वाळवा प्रतिनिधी/किशोर जासूद :- भाजप सांगली जिल्हाध्यक्षपदी नुकतीच निवड झालेल्या मा. सम्राटबाबा महाडीक यांनी वाळवा येथे पद्मभूषण क्रांतीवीर डॉ. नागनाथ आण्णा नायकवडी यांच्या समाधीस्थळी पुष्पहार अर्पण करत दर्शन घेतले आणि अभिवादन केले. त्यांच्या या सन्मानपर भेटीने राजकीय वर्तुळात सकारात्मक चर्चेला उधाण आले आहे. या प्रसंगी शिवसेना इस्लामपूर विधानसभा प्रभारी मा. गौरवभाऊ नायकवडी यांनी स्वतः पुढे येऊन सम्राटबाबांचा सन्मान केला व त्यांना शुभेच्छा देत राजकीय पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या सौहार्दपूर्ण वातावरणात एकोप्याचा संदेश दिला गेला. कार्यक्रमाला मा. नंदू पाटील, मा. पिंटू माळी, डॉ. राजेंद्र मुळीक, मा. इसाकभैय्या वलांडकर, उमेशभैया घोरपडे, मा. सनी अहिर यांचीही विशेष उपस्थिती होती. सम्राटबाबांच्या या साधेपणाच्या आणि संस्कारित राजकारणाच्या शैलीला स्थानिक कार्यकर्त्यांनी भरभरून दाद दिली.या भेटीने फक्त भाजपच नव्हे तर संपूर्ण सांगली जिल्ह्यातील राजकीय वातावरणात एक सकारात्मक ऊर्जा संचारली आहे, हे निश्चित!

आंचल दलाल रायगडच्या नव्या पोलिस अधीक्षक

Image
   पोलिस अधीक्षक घार्गे यांची अहिल्यानगरला बदली  कोल्हापूर, सातारा, सिंधुदुर्गच्या एसपी देखील बदलले  राज्य पोलिस दलातील 22 अधिकाऱ्यांची खांदेपालट  खालापुर/ प्रतिनिधी :- राज्य पोलिस दलातील 22 पोलिस अधीक्षक आणि पोलिस उपायुक्त पदांवरील बदल्या करण्यात आल्या आहेत. कोल्हापूरचे पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांची ठाणे पोलिस दलात उपायुक्तपदी नेमणूक करण्यात आली आहे. साताऱ्याचे पोलिस अधीक्षक समीर शेख यांची बृहन्मुंबई पोलिस दलात उपायुक्तपदी नेमणूक करण्यात आली आहे. रायगड पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची अचानक बदली करण्यात आल्याने भूवया उंचावल्या आहेत. रायगड पोलिस अधीक्षकपदी पुण्याच्या पोलिस बल गट क्रमांक 1 मधील आचल दलाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रायगडचे पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची अहिल्यानगर पोलिस अधीक्षकपदी निवड करण्यात आली आहे.  लोकाभिमुख आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून सोमनाथ घार्गे ओळखले जायचे. आपल्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी पोलिस दलाच्या अधुनिकीकरणावर मोठा भर दिला. जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांना स्मार्ट पोलिस ठाणे बनविण्यासाठी त्यांनी व्यापक ...

खोपोली शहरात एकेरी वाहतूक सुरू

Image
  * सूचना, हरकतींची वाट न पाहता पोलिसी बळाचा वापर करीत एकेरी वाहतुकीची अमंलबजावणी खोपोली / खलील सुर्वे :- खोपोली शहरात वाहतूक कोंडी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर खोपोली नगर परिषद प्रशासनाकडून खोपोली बाजारपेठ परिसरात एकेरी वाहतुकीचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याची अधिसूचना जारी केल्यानंतर 30 दिवसांत लेखी स्वरूपात हरकती व सूचना सादर कराव्यात, त्यानंतर या वाहतूक नियमाची अमंलबजावणी करण्यात येईल, असे आवाहन करण्यात आले होते. परंतु अधिसूचना जारी झाल्यापासून 10 दिवस उलटत नाही, तोच आज शनिवार, 17 मे 2025 पासून खोपोली शहरात एकेरी वाहतूक नियमनाची अमंलबजावणी सुरू करण्यात आली आहे.  15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देश स्वतंत्र झाला. यानंतर लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशातील सर्व संस्थाने रद्द करीत भारत देशात सामावून घेतली. त्यानंतर महामानव डॉं. बाबासाहेब यांनी जगातील सर्वात मोठी राज्यघटना लिहिली आणि 26 जानेवारी 1950 पासून भारत देश प्रजाकसत्ताक म्हणून गणला जावू लागला. पण आज 67 वर्षानंतर संपूर्ण खोपोली शहराला प्रश्न पडला आहे की, खरंच खोपोली शहर लोकशाही देशात अथवा राज्यघटना मानली जाणाऱ्या देशात आ...

एकेरी वाहतूक : आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी

Image
  * वाहतूक कोंडी फोडायची आहे की, खोपोलीकरांना बंदीस्त करायचे आहे ?  * अतिक्रमण हटविण्याची हिंमत नाही मात्र छोट्याशा शहरात जागोजागी नो एंट्री ? खोपोली/प्रतिनिधी :- खोपोली बाजारपेठेतील वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर खोपोली नगर परिषदेकडून उपाय योजना करण्यात येत असून त्याच अनुषंगाने खोपोली बाजार पेठ परिसरात एकेरी वाहतूक राबविण्याची संकल्पना समोर आली आहे. या संदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली असून 1 महिन्याच्या आत नागरीकांनी हरकती व सूचना लेखी स्वरूपात सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. परंतु अजून सूचना व हरकतींसाठी वेळ शिल्लक असला तरी खोपोली नगर परिषद प्रशासनाकडून शहरात ठिकठिकाणी 'नो एंट्री'चे फलक लावण्यास सुरूवात करण्यात आली आहे. अर्थात खोपोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉं. पंकज पाटील व खोपोली पोलिस प्रशासन बळजबरी व दमदाटी करीत शहरात 'एकेरी वाहतूक' राबविणारच असे दिसून येत आहे.  नविन एकेरी वाहतूक संदर्भातील अधिसुचनेनुसार खोपोली बाजार पेठेमध्ये प्रवेश करण्याचे फक्त दोन मार्ग ठेवण्यात आले आहेत. यातील एक मार्ग म्हणजे खोपोली पोलिस स्टेशन समोरून आणि दुसरा मार्ग आह...

हळद रक्ताने रंगली..!

Image
  * नाचण्यावरील वादातून एकाचा जीव गेला खोपोली / खलील सुर्वे :- खोपोली पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या बीड गावाच्या इस्टूल वाडीमध्ये काल रात्री लग्न समारंभात डीजेच्या तालावर कपडे काढून बेधुंद नाचणाऱ्यांना अडविणे दोन भावांना महागात पडले असून झालेल्या भांडणात एका भावाचा जीव गेला तर दुसरा भाऊ गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान, या प्रकरणी खोपोली पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून दुसरा अद्याप फरार असून त्याचा शोध सुरु आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार 13 मेच्या रात्री बीड गावाच्या आदिवासी वाडीत लग्नसमारंभानिमित्त हळदीचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमात बाळू मुकणे आणि प्रकाश पवार मंदधुंद होऊन नाचत होते व त्यांनी नाचताना शर्ट काढला. ते अती उत्साहात नाचू लागले म्हणून आदिवासी वाडीतील विलास वाघमारे यांनी त्यांना अडवले व येथे मुली, महिला नाचत आहेत. त्यामुळे तुम्ही कपडे काढून नाचू नका, असे सांगितले. तेव्हा त्या गोष्टीचा मनात राग धरून बाळू मुकणे व प्रकाश पवार यांनी विलास वाघमारे याला मारहाण करायला सुरुवात केली. तेव्हा विलास वाघमारे याचा भाऊ अनंता वाघमारे हा भांडण मिटवायला मध्ये पडला, तेव्हा प्...

खालापुरात एक दिवसीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिर संपन्न

Image
  खालापूर / प्रतिनिधी : - रायगड जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रायगड अलिबाग यांनी उपनियंत्रक नागरी संरक्षण दल उरण यांच्या पथकामार्फत खालापूर तालुक्यात एक दिवसीय आपत्ती प्रशिक्षण शिबिराचे आयोजन सरनौबत नेताजी पालकर सभागृह येथे आयोजित केले होते. या शिबिराचे उद्घाटन खालापूर तालुक्याचे तहसीलदार अभय चव्हाण यांच्या हस्ते झाले. प्रास्ताविक नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांनी केले. नागरी संरक्षण दल उरणचे प्रशिक्षक शशिकांत शिरसाट यांनी शिबिरार्थींना युद्धजन्य परिस्थितीत कोणकोणत्या उपाययोजना राबवाव्यात याबाबतीत तंत्रशुद्ध मार्गदर्शन करताना दृकश्राव्य प्रणालीचा वापर केला. आपत्तीचे विविध प्रकार विस्तृतपणे समजावून सांगताना प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण दिले. प्रथमोपचार आणि कोणत्या प्रसंगी कसे मदतकार्य करायचे याबाबतीत प्रशिक्षणार्थींना सहभागी करून मार्गदर्शन केले. कोणत्याही आपत्तीला सामोरे जाण्यासाठी मनाच्या तयारीसोबत तांत्रिक बाबींचे ज्ञान असणे आवश्यक असल्याने अशा शिबिराचे आयोजन केल्याचे सांगत तहसीलदार अभय चव्हाण यांनी या शिबिरानंतर शिबिरार्...

साप्ताहिक खालापूर वार्ताचा 5 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

Image
  * न्यूज जर्नालिस्ट असोसिएशन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र वितरण * महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुधीर माने यांचा अभिष्टचिंतन सोहळा * खालापूर तालुक्यातील मान्यवरांचा पुरस्कार देवून सत्कार खालापूर / मानसी कांबळे :- साप्ताहीक खालापूर वार्ताचा 5 वा वर्धापन दिन सोहळा, संपादक तथा न्यूज जर्नालिस्ट असोसिएशन महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुधीर गोविंद माने यांचा 55 वा वाढदिवस तसेच न्यूज जर्नालिस्ट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र प्रदान सोहळा खोपोली नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष डॉं. सुनील गोटीराम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बौध्द पौर्णिमेदिवशी वावोशी फाटा येथील हरीओम मंगल कार्यालयात पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटक खोनपचे माजी शिक्षण व आरोग्य सभापती मधुकर किसन दळवी होते.  यावेळी व्यासपिठावर न्यूज जर्नालिस्ट असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष खलील सुर्वे, शिवसेना रायगड जिल्हा महिला प्रमुख सुप्रिया साळुंखे, शिवसेना खालापूर तालुका अध्यक्ष एकनाथ पिंगळे, न्यूज जर्नालिस्ट असोसिएशन राष्ट्रीय संघटक तथा उपक्रम प्रमुख डॉं. शेखर जांभळे, आम आदमी पार्टी खोपोली शहर अध्यक्ष गयासुद्दीन खान, जेष्ठ पत्रकार दिनकर ...

वाठार येथे रक्तदान शिबीर उत्साहात संपन्न....

Image
वाठार /किशोर जासूद :- वाठार येथील जनसुराज्य शक्ती पक्ष, उज्वल ध्येय युथ फाउंडेशन व उज्वल ध्येय सखी मंच यांच्या संयुक्त विद्यमानाने उज्वल ध्येय युथ फाऊंडेशन संस्थापक,युवा उद्योजक शरद बेनाडे यांच्या वाढदिवसानिमित्त हनुमान मंदिर येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिराचा उद्घाटन सोहळा  हातकणंगले मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार दलितमित्र डॉ. अशोकराव माने(बापू ) यांच्या शुभहस्ते व जिल्हा बँकेचे संचालक विजयसिंह माने भैय्या व युवा नेते सागर खोत यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला . यावेळी सरपंच सचिन कांबळे, भाजपा तालुकाध्यक्ष अमरसिंह पाटील, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष विश्वास माने,स्विय सहायक सुहास राजमाने,ग्रा. प सदस्य सुहास पाटील, ग्रा. प सदस्य सचिन कुंभार, ग्रा. प सदस्य गजेंद्र माळी, ग्रा. प सदस्य सुरज नदाफ, ग्रा.प सदस्य संजय मगदूम यासह ग्रामस्थ रक्तदाते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

खेळाडूंना क्रीडा कौशल्याच्या बळावर वेगवेगळ्या क्षेत्रांत संधी

Image
  * अप्पर पोलिस अधीक्षक रायगड अभिजीत शिवथारे यांचे प्रतिपादन रायगड / प्रतिपादन :- जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय रायगड यांच्या वतीने उन्हाळी क्रीडा कौशल्य व व्यक्तिमत्व विकास शिबिराचे आयोजन अलिबाग येथील भव्य क्रीडा संकुलात करण्यात आले आहे. या शिबाराच्या उद्घाटनानिमित्त रायगडचे अप्पर पोलिस अधीक्षक रायगड अभिजीत शिवथारे, रायगड जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी (माध्य) महारुद्र नाळे यांच्या हस्ते झाले. यावेळी हेल्प फाउंडेशनचे गुरुनाथ साठेलकर, सामाजिक कार्यकर्ते रिकी अगरवाल हे देखील उपस्थित होते.  साधारण दीड महिना चालणाऱ्या या शिबिरात लगोरी सारख्या पारंपारिक खेळापासून आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या नेमबाजी सारख्या विविध खेळ प्रकारांचे प्रशिक्षण तंत्रशुद्ध पद्धतीने देण्यात येणार आहे. साधारणता दीडशेपेक्षा अधिक प्रशिक्षणार्थींचा सहभाग या शिबिरात असणार आहे. यानिमित्ताने रायगड जिल्हा क्रीडा अधिकारी प्रकाश वाघ यांनी अशा शिबिरातून प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षणार्थींमधून उद्याचे राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरचे खेळाडू निर्माण व्हावेत याच उद्देशाने हे आयोजन असल्याचे आपल्या प्रस्ताविकात ...

सहज सेवा फाऊंडेशनची स्लो सायकल स्पर्धा उत्साहात

Image
                   * सहज सेवा फाऊंडेशनच्या आगळ्यावेगळ्या उपक्रमात लहानमोठ्या सायकलस्वारांनी लुटला मनमुराद आनंद खोपोली / मानसी कांबळे : - सहज सेवा फाऊंडेशन सातत्याने सेवाभावी उपक्रम राबवित असते. यातील एक आगळावेगळा उपक्रम म्हणजे स्लो सायकल स्पर्धा (सावकाश सायकल चालविणे स्पर्धा) 4 मे 2025 रोजी खोपोली येथील पंत मोरेश्वर पाटणकर क्रीडांगणावर उत्साहात पार पडली. या स्पर्धा दोन वयोगटात घेण्यात आली. पहिला गट 15 वर्षांखालील स्पर्धकांचा तर दुसरा 15 वर्षांवरील म्हणजेच खुला वयोगट. विशेष म्हणजे लहानांपासून ते थोरांपर्यंत सर्वांनी उत्साहाने सहभाग घेतला. या स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्वांना संस्थेतर्फे सहभाग प्रमाणपत्र तसेच प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक आलेल्या स्पर्धकांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देण्यात आले.       15 वर्षांखालील वयोगटात प्रथम क्रमांक देवर्ष गुरव, द्वितीय क्रमांक आरुष साळुंखे तर तृतीय क्रमांक निहारीका जांभळे हिने पटकावला. तसेच खुल्या वयोगटामध्ये प्रथम क्रमांक देव बांद्रे, द्वितीय क्रमांक युवराज साळुंखे तर तृतीय क्रमांक संदीप दु...

खालापुरातील शिक्षक नक्षलवादी

Image
  * "लॅपटॉप" नक्षलवादी अखेर ठाण्यात जेरबंद * न्यायालयाकडून 13 मेपर्यंत पोलिस कोठडी * सहा वर्षांपासून शिक्षकी वेशात होता लपून   खालापूर / जतिन मोरे :- राज्यातील दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) मोठी कारवाई करीत नक्षलवाद्यांशी संबंधित गंभीर गुन्ह्यांमध्ये फरार असलेला कुख्यात आरोपी प्रशांत जालिंदर कांबळे ऊर्फ लॅपटॉप याला अखेर अटक करण्यात आली आहे. गेल्या 6 ते 7 वर्षांपासून तो रायगड जिल्ह्यातील खोपोली, खालापूर परिसरात शिक्षकाच्या वेशात वास्तव्य करीत होता आणि खालापूर व रायगड पोलिसांना याचा थांगपत्ताच नव्हता.               प्रशांत कांबळे याच्यावर मुंबईतील काळाचौकी पोलिस ठाण्यात 2011 साली भारतीय दंड विधान संहितेतील कलम 387, 419, 465, 467, 468, 120 (ब) तसेच बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) अधिनियम 1967 (संशोधित 2008) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात तो तब्बल 14 गंभीर कलमांखाली आरोपी होता आणि त्यास न्यायालयाने फरार घोषित करीत निरंतर अटक वॉरंट व जाहीरनामा जारी केला होता.  एसटीएस (ATS) सूत्रांच्या माहितीनुसार, प्रशांत कांबळे हा आदि...

12 मेला साप्ताहीक खालापूर वार्ताचा 5 वा वर्धापन दिन

Image
  * न्यूज जर्नालिस्ट असोसिएशन पदाधिकारी नियुक्तीपत्र वितरण * महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुधीर माने यांचा अभिष्टचिंतन सोहळा * खालापूर तालुक्यातील मान्यवरांचा पुरस्कार देवून सत्कार होणार खालापूर / मानसी कांबळे :- अन्याय, अत्याचाराविरोधात पेटून उठणाऱ्या...रंजल्या गांजल्यांचा बुलंद आवाज असलेल्या साप्ताहीक खालापूर वार्ताचा 5 वा वर्धापन दिन सोहळा 12 मे 2025 रोजी वावोशी फाटा येथील हरीओम मंगल कार्यालयात साजरा होणार आहे. यावेळी न्यूज जर्नालिस्ट असोसिएशन पदाधिकारी नियुक्तीपत्र वितरण, साप्ताहीक खालापूर वार्ताचे मुख्य संपादक तथा न्यूज जर्नलिस्ट असोसिएशन महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुधीर गोविंद माने यांचा अभिष्टचिंतन सोहळा तसेच खालापुर तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा पुरस्कार सन्मान सोहळा कार्यक्रमाचे उद्घाटक कर्जत पंचायत समितीचे माजी उपसभापती मनोहर (शेठ) सदाशिव थोरवे व कार्यक्रमाचे अध्यक्ष न्यूज जर्नालिस्ट असोसिएशनचे राष्ट्रीय संयोजक डॉं. शरीफ बागवान यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.  सा. खालापुर वार्ता हे साप्ताहिक कर्जत व खालापुर तालुक्यातील उपेक्षित समाज घटक, शेतकरी, कष्ट...

महात्मा जोतिबा फुले यांच्या जीवनावरील फुले चित्रपट टॅक्स फ्री करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

Image
  मुंबई / प्रतिनिधी :- महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जीवनावरील 'फुले' सिनेमा हा ऐतिहासिक आणि क्रांतिकारक सिनेमा आहे. देशभरात नव्या पिढीला महात्मा फुले यांच्या जीवनकार्याची माहिती मिळणे आवश्यक आहे. जे इतिहास विसरतात ते इतिहास घडवू शकत नाहीत, त्यामुळे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या क्रांतीचा इतिहास नव्या पिढीला समजला पाहिजे. त्यासाठी फुले चित्रपट हा देशभरात टॅक्स फ्री झाला पाहिजे, अशी आपली मागणी असून त्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. अंधेरी येथे ना. रामदास आठवले यांच्यासाठी फुले सिनेमाचे स्पेशल स्क्रिनिंग दाखविण्यात आले. फुले चित्रपट पाहिल्यानंतर ना. रामदास आठवले यांनी हा चित्रपट देशभरात पोहोचला पाहिजे, त्यासाठी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित व्हावा आणि फुले या चित्रपटाला करमुक्त करावे, अशी आपली मागणी असून त्या बाबतचे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देणार असल्याची माहिती ना. रामदास आठवले यांनी दिली. यावेळी फुले चित्रपटाचे दिग्दर्शक अनंत ...

रात्रीस कार्डधारकांचा 'अंगठा' घेण्याचा प्रताप !

Image
  * सुभाषनगरच्या रेशन दुकानदाराचा मनमानी कारभार * हमालांच्या संपामुळे उशिरा धान्य आले - तहसिलदार * तहसिलदार, कोकण आयुक्त यांच्याकडून दखल * तालुका पुरवठा अधिकारी मनोज पवार कोमात ?  खोपीली / प्रतिनिधी :- केंद्र व राज्य सरकार, जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, तहसील कार्यालय, पंचायत समिती व स्थानिक स्वराज्य संस्था आदी विविध उपक्रम राबवित नागरीकांचे 'भले' करण्यासाठी प्रयत्नशील आहे. भारत सरकार नागरिकांसाठी अनेक योजना राबवते. देशातील गरीबातील गरीब नागरीकाला दोन वेळच्या जेवणाची चिंता भासू नये, यासाठी स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून धान्य वितरण केले जाते. या सरकारी योजनांचा लाभ देशातील कोट्यवधी नागरिकांना मिळत आहे, परंतु सुभाषनगर परिसरात रेशन दुकानदाराचा मनमानी कारभार सुरु असल्याचे दिसुन येत आहे. 30 एप्रिल रोजी सायंकाळी 6 ते रात्री 11 वाजेपर्यंत थम्ब (अंगठा) घेण्यासाठी नागरिकांची रेशन दुकानात मोठी गर्दी झाली होती. सुत्रांच्या माहितीनुसार धान्य वाटप देखील रेशन दुकानदाराच्या सोयीनुसार रविवार किंवा सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी व सोयीच्या वेळेत केले जाते. काही जणांचा अंगठा (थम्ब) येत नसल्या...